शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द

By admin | Updated: June 2, 2016 00:59 IST

आरोग्यमंत्र्यांकडे शिफारस : कोकणातील डॉक्टरांचा अनुशेष भरून काढण्यासाठी घेतला निर्णय

सुभाष कदम / चिपळूण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याची जिल्ह्याबाहेर बदली न करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे ही मागणी केली होती. ही मागणी तत्त्वत: मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. कोकणात अनेक गावे दऱ्या खोऱ्यात व शहरापासून लांब डोंगराळ भागात आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असते. राहायला चांगल्या खोल्या नाहीत की, गावात कोणत्या सोयीसुविधा नाहीत. जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहून प्रामाणिकपणे सेवा करतात, त्यांच्याच नशिबी हा वनवास आलेला असतो. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा नसतात. ग्रामीण भागात रुग्ण कधीही येतात. त्यांना सेवा द्यावीच लागते. एखाद्याला नाही म्हटले तर वेळप्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाणही होते. तरीही अनेक वैद्यकीय अधिकारी आपल्या नोकरीला प्राधान्य देत इमानेइतबारे सेवा करतात. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अनेक वैद्यकीय अधिकारी मोठ्या शहरात किंवा सोयीच्या ठिकाणी काम करायला प्राधान्य देतात. शासनाने नुकत्याच नियुक्त केलेल्या ४८२ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासन पाठवेल तेथे काम करू असे करारपत्र शासनाला दिले आहे. त्यांच्या कराराप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हे वैद्यकीय अधिकारी काम करू शकतात; परंतु त्या ४८२ पैकी एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याला रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नियुक्ती दिलेली नाही. जर यापैकी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली असती तर येथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबाकडे जाता आले असते. वर्षानुवर्षे कुटुंबापासून लांब राहून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या या अधिकाऱ्यांची आता अडचण झाली आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या किंवा संवेदनशील किंवा अडचणीच्या भागात जे वैद्यकीय अधिकारी काम करतात, त्यांना एक स्तर वेतन श्रेणी वाढ व प्रवास भत्ता दिला जातो. मात्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्थितीही तशी नाही. या भागात नवीन वैद्यकीय अधिकारी येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने ही सुविधा द्यायला हवी, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमध्येही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अनेक नवीन वैद्यकीय अधिकारी या भागात येऊ इच्छित नाहीत आणि आले तरी तत्काळ बदली करून निघून जातात. काही येथे सोयीसुविधा नसल्याने सोडून जातात. त्यामुळे येथील प्रश्न कायम आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा असल्याने पालकमंत्री वायकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या न करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यानुसार हा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रामाणिक अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न येथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक स्तर वेतन श्रेणीचा लाभ नाही किंवा बदल्याही नाहीत हे धोरण अयोग्य आहे. शासनाने यापेक्षा संपूर्ण राज्यातील बदल्या रद्द करायला हव्या होत्या. केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न असल्याचे काहींनी सांगितले.