शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द

By admin | Updated: June 2, 2016 00:59 IST

आरोग्यमंत्र्यांकडे शिफारस : कोकणातील डॉक्टरांचा अनुशेष भरून काढण्यासाठी घेतला निर्णय

सुभाष कदम / चिपळूण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याची जिल्ह्याबाहेर बदली न करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे ही मागणी केली होती. ही मागणी तत्त्वत: मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. कोकणात अनेक गावे दऱ्या खोऱ्यात व शहरापासून लांब डोंगराळ भागात आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असते. राहायला चांगल्या खोल्या नाहीत की, गावात कोणत्या सोयीसुविधा नाहीत. जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहून प्रामाणिकपणे सेवा करतात, त्यांच्याच नशिबी हा वनवास आलेला असतो. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा नसतात. ग्रामीण भागात रुग्ण कधीही येतात. त्यांना सेवा द्यावीच लागते. एखाद्याला नाही म्हटले तर वेळप्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाणही होते. तरीही अनेक वैद्यकीय अधिकारी आपल्या नोकरीला प्राधान्य देत इमानेइतबारे सेवा करतात. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अनेक वैद्यकीय अधिकारी मोठ्या शहरात किंवा सोयीच्या ठिकाणी काम करायला प्राधान्य देतात. शासनाने नुकत्याच नियुक्त केलेल्या ४८२ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासन पाठवेल तेथे काम करू असे करारपत्र शासनाला दिले आहे. त्यांच्या कराराप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हे वैद्यकीय अधिकारी काम करू शकतात; परंतु त्या ४८२ पैकी एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याला रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नियुक्ती दिलेली नाही. जर यापैकी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली असती तर येथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबाकडे जाता आले असते. वर्षानुवर्षे कुटुंबापासून लांब राहून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या या अधिकाऱ्यांची आता अडचण झाली आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या किंवा संवेदनशील किंवा अडचणीच्या भागात जे वैद्यकीय अधिकारी काम करतात, त्यांना एक स्तर वेतन श्रेणी वाढ व प्रवास भत्ता दिला जातो. मात्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्थितीही तशी नाही. या भागात नवीन वैद्यकीय अधिकारी येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने ही सुविधा द्यायला हवी, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमध्येही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अनेक नवीन वैद्यकीय अधिकारी या भागात येऊ इच्छित नाहीत आणि आले तरी तत्काळ बदली करून निघून जातात. काही येथे सोयीसुविधा नसल्याने सोडून जातात. त्यामुळे येथील प्रश्न कायम आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा असल्याने पालकमंत्री वायकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या न करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यानुसार हा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रामाणिक अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न येथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक स्तर वेतन श्रेणीचा लाभ नाही किंवा बदल्याही नाहीत हे धोरण अयोग्य आहे. शासनाने यापेक्षा संपूर्ण राज्यातील बदल्या रद्द करायला हव्या होत्या. केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न असल्याचे काहींनी सांगितले.