शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द

By admin | Updated: June 2, 2016 00:59 IST

आरोग्यमंत्र्यांकडे शिफारस : कोकणातील डॉक्टरांचा अनुशेष भरून काढण्यासाठी घेतला निर्णय

सुभाष कदम / चिपळूण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याची जिल्ह्याबाहेर बदली न करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे ही मागणी केली होती. ही मागणी तत्त्वत: मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. कोकणात अनेक गावे दऱ्या खोऱ्यात व शहरापासून लांब डोंगराळ भागात आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असते. राहायला चांगल्या खोल्या नाहीत की, गावात कोणत्या सोयीसुविधा नाहीत. जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहून प्रामाणिकपणे सेवा करतात, त्यांच्याच नशिबी हा वनवास आलेला असतो. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा नसतात. ग्रामीण भागात रुग्ण कधीही येतात. त्यांना सेवा द्यावीच लागते. एखाद्याला नाही म्हटले तर वेळप्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाणही होते. तरीही अनेक वैद्यकीय अधिकारी आपल्या नोकरीला प्राधान्य देत इमानेइतबारे सेवा करतात. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अनेक वैद्यकीय अधिकारी मोठ्या शहरात किंवा सोयीच्या ठिकाणी काम करायला प्राधान्य देतात. शासनाने नुकत्याच नियुक्त केलेल्या ४८२ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासन पाठवेल तेथे काम करू असे करारपत्र शासनाला दिले आहे. त्यांच्या कराराप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हे वैद्यकीय अधिकारी काम करू शकतात; परंतु त्या ४८२ पैकी एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याला रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नियुक्ती दिलेली नाही. जर यापैकी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली असती तर येथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबाकडे जाता आले असते. वर्षानुवर्षे कुटुंबापासून लांब राहून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या या अधिकाऱ्यांची आता अडचण झाली आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या किंवा संवेदनशील किंवा अडचणीच्या भागात जे वैद्यकीय अधिकारी काम करतात, त्यांना एक स्तर वेतन श्रेणी वाढ व प्रवास भत्ता दिला जातो. मात्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्थितीही तशी नाही. या भागात नवीन वैद्यकीय अधिकारी येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने ही सुविधा द्यायला हवी, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमध्येही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अनेक नवीन वैद्यकीय अधिकारी या भागात येऊ इच्छित नाहीत आणि आले तरी तत्काळ बदली करून निघून जातात. काही येथे सोयीसुविधा नसल्याने सोडून जातात. त्यामुळे येथील प्रश्न कायम आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा असल्याने पालकमंत्री वायकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या न करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यानुसार हा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रामाणिक अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न येथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक स्तर वेतन श्रेणीचा लाभ नाही किंवा बदल्याही नाहीत हे धोरण अयोग्य आहे. शासनाने यापेक्षा संपूर्ण राज्यातील बदल्या रद्द करायला हव्या होत्या. केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न असल्याचे काहींनी सांगितले.