शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

मेढा ग्रामपंचायत खर्च संशयास्पद

By admin | Updated: August 16, 2016 23:00 IST

वादाच्या भोवऱ्यात : खातेनिहाय चौकशीची मागणी

म्हापण : सन २0१५-१६ मध्ये वेंगुर्ले तालुक्यातील मेढा ग्रामपंचायतीचा जो खर्च दाखविण्यात आला आहे. तो संशयातीत असल्याने १५ आॅगस्टच्या ग्रामसभेने हा खर्च अमान्य करून याला सर्वस्वी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य जबाबदार असल्याने या खर्चाची खातेनिहाय चैकशी करण्यात यावी तसेच दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी असा महत्वपूर्ण ठराव ग्रामसभेने बहुमताने मंजूर केल्याने पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात असलेली मेढा ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.१५ आॅगस्टची वार्षिक ग्रामसभा विठोबा कोचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामसेवक चव्हाण यांनी उपस्थित ग्रामस्थांचे स्वागत करून मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करताना सन २0१५-१६ चा तत्कालीन ग्रामसेवक तुषार हळदणकर यांनी मांडलेला खर्च सभेपुढे ठेवला असता त्यातील काही आक्षेपार्ह बाबींमुळे तो अमान्य करून त्याला जबाबदार असणारे ग्रामसेवक तुषार हळदणकर, सरपंच व सदस्य यांची खातेनिहाय चैकशी करण्यात यावी असा महत्वपूर्ण ठराव करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच गौतम मालंडकर हे गेली सुमारे दोन वर्षे ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सभेला उपस्थित नसताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी त्यांच्या घरी जावून डिसेंबर २0१५ अखेर त्यांच्या सह्या प्रोसिडींगवर घेणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकांवर कारवाई करणे, ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेतील निवती बंदर ते पवार घर रस्त्याच्या दुतर्फा झाडी तोडणे, निवतीबंदर एस. टी. थांब्यावरील धोकादायक सुरुंची झाडे तोडणे, मेढा व श्रीरामवाडीतील सार्वजनिक शौचालये व अंगणवाड्यांची दुरूस्ती करणे, मेढा व श्रीरामवाडीतील धोकादायक बनलेल्या वीजवाहिन्या बदलणे, मेढा व श्रीरामवाडीचा जलशिवार योजनेत समावेश करणे, मेढा गावात दारूबंदी करणे, मेढावाडीतील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बंदीस्त गटार बांधणे आदी महत्वपूर्ण ठराव घेण्यात आले. (प्रतिनिधी)ग्रामस्थ नाराज : ग्रामपंचायत बरखास्तीची मागणीयापूर्वीच्या ग्रामसभेने घेतलेल्या ग्रामपंचायत बरखास्तीच्या ठरावाची कोकण आयुक्तांकडून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. पण आता तीन ते चार महिने उलटूनही त्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याबद्दल ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर निर्णय घेऊन ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सभा संपेपर्यंत ग्रामस्थांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर सरपंच आरती कुडाळकर यांनी दिले नाही. सभा संपल्याचे जाहीर करण्यापूर्वीच सरपंच व काही सदस्य सभागृहातून निघून गेले होते. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता.