शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

यांत्रिकीकरण योजना बंद

By admin | Updated: November 27, 2014 00:25 IST

राष्ट्रीय फलोत्पादन योजना : शेतकऱ्यांचे २४० प्रस्ताव रखडले

रत्नागिरी : राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत सुरू असलेली यांत्रिकीकरण योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रास कटर, पॉवर स्प्रेअरचे मिळून जिल्हाभरातील सुमारे २४० शेतकऱ्यांचे प्रस्ताव रखडले आहेत.राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत पंचायत समितीची यांत्रिकीकरण योजना चालू वर्षापासून शासनाने बंद केली आहे. या योजनेंतर्गत ५० ते ७५ टक्के अनुदानाने शेतकऱ्यांना यांत्रिक अवजारे पुरविण्यात येत होती. ही योजना शासनाने बंद केली असली तरी पॉवर टिलर व मोठ्या ट्रॅक्टरकरिता अनुदान सुरू ठेवले आहे. पॉवर टिलरचा वापर जिल्ह्यात नांगरणीकरिता करण्यात येत असला तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. तर मोठ्या ट्रॅक्टरचा वापर जिल्ह्यात करण्यात येत नाही. एकूणच शासनाच्या निरूत्साही धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत.ग्रासकटर व पॉवर स्पेअरसारख्या यांत्रिक अवजारांमुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत व मजूरीचा खर्च वाचत होता. ग्रासकटरमुळे बागेतील गवत कटाई कमी वेळेत पूर्ण होत होती. शिवाय सफाईसाठी मजुरांवर केला जाणारा खर्चदेखील वाचत होता. तसेच पॉवर स्प्रेअरमुळे कीटकनाशक फवारणी योग्यरित्या व वेळेत पूर्ण करणे शक्य होत होते.ग्रासकटरची किंमत १८००० रूपयांपासून ४५ हजार रूपयांपर्यंत आहे. पॉवर स्पेअरची किंमत ३४ हजारांपासून ५० हजारांपर्यंत आहे. ५० टक्के सबसिडीमुळे शेतकऱ्यांना निम्मी, तर ७५ टक्के सबसिडीमुळे शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम मिळत असे. वास्तविक सवलतीच्या दरात मिळणाऱ्या अवजारामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत होता.गतवर्षी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे यांत्रिक अवजारांसाठी २ कोटी ३० लाखाचे थेट अनुदान वितरीत करण्यात आले होते. परंतु अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांना आता पूर्ण किमतीने पंप किंवा कटर खरेदी करावा लागणार आहे. यावर्षी ४५० शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले होते. मात्र, योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर विरजन पडले आहे. (प्रतिनिधी)