शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

सागरी सुरक्षा धोक्यात?

By admin | Updated: July 27, 2014 00:38 IST

मच्छिमारांचा पुनरूच्चार : मालवणात नौदलाची विशेष बैठक

मालवण : अनधिकृत मासेमारीमुळे सागरी सुरक्षा धोक्यात आली असल्याचा पुनरूच्चार शनिवारी नौदलाच्या बैठकीत मच्छिमारांनी केला. स्थानिक मच्छिमार नेहमीच सतर्क असतात. मात्र, शासनाचा मत्स्य आणि बंदर विभागाच्या नाकर्तेपणामुळे भविष्यात सागरी सुरक्षितता धोक्यात येवू शकते, असा आरोप मच्छिमारांनी केला. दरम्यान, नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांना बगल देत बैठकीचे सोपस्कार पूर्ण केले.शनिवारी पोलीस वसाहतीनजिक लोकमान्य बहुउद्देशीय हॉल येथे सागरी सुरक्षिततेबाबत नौदलाच्यावतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपिठावर नौदलाचे लेप्टनंट संचित कौशीक, पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, संजय कुमार, आर. एस. उपाध्याय, कस्टमचे एस. पी. धनावडे, रवींद्र उघाडे, मत्स्य विभागाचे रवींद्र मालवणकर यांसह मच्छिमारांमधून छोटू सावजी, दिलीप घारे, मिथुन मालंडकर, बाबी जोगी, जयहरी कोचरेकर, सदानंद मालंडकर, नरहरी टिकम, मोहन केळुसकर आदी उपस्थित होेते. यावेळी लेप्टनंट कौशीक म्हणाले, सागरी किनाऱ्यावरील नागरिकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. समुद्रात अथवा किनाऱ्यावर संशयास्पद हालचाल आढळल्यास त्याची तत्काळ पोलीस यंत्रणेला माहिती द्या. अलीकडच्या काळात सागरी मार्गाने अतिरेकी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. अतिरेकी जेव्हा घातपाताची योजना आखतात तेव्हा ते पूर्ण तयारीनीशी यामध्ये उतरलेले असतात. अतिरेक्यांचा डाव मोडून काढण्यासाठी प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. किनाऱ्यावरील प्रत्येक नागरिक सुरक्षा साखळीचा घटक आहे. आपली छोटीशी मदत देश वाचवू शकते असेही कौशीक म्हणाले. पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मासेमारीसाठी समुद्रात जाताना अनोळखी बोट अथवा अनोळखी खलाशी आढळल्यास संपर्क साधा. बोटीवर खलाशांची ओळखपत्रे तसेच बोटीच्या नोंदणीची कागदपत्रे जवळ ठेवा. अधिकाऱ्यांनी बोटीची कागदपत्रे तपासल्यास त्यांना सहकार्य करा, असेही श्री. बुलबुले म्हणाले. (प्रतिनिधी)