शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

सागरी सुरक्षा धोक्यात?

By admin | Updated: July 27, 2014 00:38 IST

मच्छिमारांचा पुनरूच्चार : मालवणात नौदलाची विशेष बैठक

मालवण : अनधिकृत मासेमारीमुळे सागरी सुरक्षा धोक्यात आली असल्याचा पुनरूच्चार शनिवारी नौदलाच्या बैठकीत मच्छिमारांनी केला. स्थानिक मच्छिमार नेहमीच सतर्क असतात. मात्र, शासनाचा मत्स्य आणि बंदर विभागाच्या नाकर्तेपणामुळे भविष्यात सागरी सुरक्षितता धोक्यात येवू शकते, असा आरोप मच्छिमारांनी केला. दरम्यान, नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांना बगल देत बैठकीचे सोपस्कार पूर्ण केले.शनिवारी पोलीस वसाहतीनजिक लोकमान्य बहुउद्देशीय हॉल येथे सागरी सुरक्षिततेबाबत नौदलाच्यावतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपिठावर नौदलाचे लेप्टनंट संचित कौशीक, पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, संजय कुमार, आर. एस. उपाध्याय, कस्टमचे एस. पी. धनावडे, रवींद्र उघाडे, मत्स्य विभागाचे रवींद्र मालवणकर यांसह मच्छिमारांमधून छोटू सावजी, दिलीप घारे, मिथुन मालंडकर, बाबी जोगी, जयहरी कोचरेकर, सदानंद मालंडकर, नरहरी टिकम, मोहन केळुसकर आदी उपस्थित होेते. यावेळी लेप्टनंट कौशीक म्हणाले, सागरी किनाऱ्यावरील नागरिकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. समुद्रात अथवा किनाऱ्यावर संशयास्पद हालचाल आढळल्यास त्याची तत्काळ पोलीस यंत्रणेला माहिती द्या. अलीकडच्या काळात सागरी मार्गाने अतिरेकी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. अतिरेकी जेव्हा घातपाताची योजना आखतात तेव्हा ते पूर्ण तयारीनीशी यामध्ये उतरलेले असतात. अतिरेक्यांचा डाव मोडून काढण्यासाठी प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. किनाऱ्यावरील प्रत्येक नागरिक सुरक्षा साखळीचा घटक आहे. आपली छोटीशी मदत देश वाचवू शकते असेही कौशीक म्हणाले. पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मासेमारीसाठी समुद्रात जाताना अनोळखी बोट अथवा अनोळखी खलाशी आढळल्यास संपर्क साधा. बोटीवर खलाशांची ओळखपत्रे तसेच बोटीच्या नोंदणीची कागदपत्रे जवळ ठेवा. अधिकाऱ्यांनी बोटीची कागदपत्रे तपासल्यास त्यांना सहकार्य करा, असेही श्री. बुलबुले म्हणाले. (प्रतिनिधी)