शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

सागरी सुरक्षा रामभरोसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 23:36 IST

रत्नागिरीतील चित्र : १० पैकी दोनच गस्तीनौका कार्यरत; ३६ लॅँडिंग पॉइंटवर सीसीटीव्ही बसविणार : वायकर

रत्नागिरी : दहापैकी केवळ दोनच गस्तीनौका कार्यरत असल्याने रत्नागिरीची सागरी सुरक्षा रामभरोसेच असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केलेल्या पाहणीत पुढे आले. मुंबईतील २६/११ च्या अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी बुधवारी सकाळी दीड तास भगवतीबंदर जेटी परिसरात सागरी सुरक्षिततेची झाडाझडती घेतली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सागरी हद्दीतील ३६ लॅँडिंग पॉइंट व अन्य संवेदनशील ठिकाणी एक कोटी खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी घोषणा वायकर यांनी केली. २६/११ ला अतिरेक्यांनी सागरी सुरक्षा भेदून मुंबईत प्रवेश केला व अंदाधुंद गोळीबार केला होता. त्याआधी रायगडच्या दिघी येथे स्फोटके उतरवून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत सागरी सुरक्षा भक्कम करण्यावर शासनाने भर दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर गस्तीसाठी विविध खात्यांच्या मिळून दहा वेगवान गस्तीनौका पुरविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील केवळ दोन नौका सुरू असल्याचे पालकमंत्र्यांना तपासणीत आढळून आले. जिल्ह्याची सागरी सुरक्षा भक्कम असणे आवश्यक असल्याने पोलीस दलाला आवश्यक साधने उपलब्ध करून दिली जातील. सागरी गस्तीनौकांना इंधन उपलब्ध करून दिले जाईल, असे वायकर यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी गस्तीनौकांवर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी यावेळी जाणून घेतल्या. भगवती बंदरातील विविध खात्यांच्या गस्तीनौका बंद का आहेत, याबाबत त्यांनी त्या खात्यांकडून अहवाल मागविला आहे. तब्बल दीड तास त्यांनी गस्तीनौकेतून सागरी सुरक्षिततेची पाहणी केली. समुद्रात त्यांनी मच्छिमारांशीही संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, तहसीलदार हेमंत साळवी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती खोडके उपस्थित होते.मिरकरवाडा परिसरातील स्वच्छता व्यवस्थेचादेखील त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी या परिसरात नगरपरिषदेने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)आधुनिक शस्त्रे आणि पेट्रोल पंपसागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलास वाढीव मनुष्यबळाबरोबरच आधुनिक हत्यारे उपलब्ध करून देण्यात येतील. गस्तीनौकांसाठी इंधन उपलब्ध व्हावे याकरिता पेट्रोल पंप उभारण्याचा पोलीस दलाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही वायकर यांनी दिले आहे.