शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

खंबाटातील मराठी कामगारांना देशोधडीला लावले! आमदार नीतेश राणे यांची  विनायक राऊतांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 19:05 IST

खंबाटा एव्हीएशन कंपनीमध्ये भारतीय कामगार सेना मान्यताप्राप्त संघटना आहे.  मान्यताप्राप्त संघटनेची सही  कामगार करारावर असते. त्यामुळे विनायक राऊत यांनी जनतेला अर्धसत्य सांगू नये. खंबाटा

ठळक मुद्देकणकवलीत पत्रकार परिषद

 

कणकवली : खंबाटा एव्हीएशन कंपनीमध्ये भारतीय कामगार सेना मान्यताप्राप्त संघटना आहे.  मान्यताप्राप्त संघटनेची सही  कामगार करारावर असते. त्यामुळे विनायक राऊत यांनी जनतेला अर्धसत्य सांगू नये. खंबाटा कंपनीतील पगारवाढ महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेमुळे झाली होती. मात्र, भारतीय कामगार सेना व विनायक राऊत यांनी या कंपनीतील मराठी कामगारांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप  आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.

कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र  समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस विहंग दळवी उपस्थित होते.       यावेळी आमदार नीतेश राणे म्हणाले, खंबाटा कंपनीतील कामगारांच्या घामाचा पैसा त्यांना मिळू शकला नाही. याला  विनायक राऊतच जबाबदार आहेत. या कामगारांच्या पैशासंदर्भात महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने कामगार न्यायालयात दावा  दाखल केला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार किरण पावसकर, अंजली दमानिया यांनीसुद्धा राऊत यांनीच खंबाटामधील कामगारांना देशोधडीला लावल्याचा आरोप यापूर्वी केला आहे.

असे सांगतानाच आमदार राणे यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची याबाबतची व्हिडीओ क्लिप तसेच खंबाटा कंपनीच्या कामगारांचा सुमारे २ हजार कोटींचा पगार दिला नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता त्याची  व्हिडीओ क्लिपही यावेळी पत्रकार परिषदेत दाखविली. आमदार नीतेश राणे पुढे म्हणाले, भारतीय कामगार सेना या  मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाºयांची  सही  कामगार करारावर आहे.  खंबाटा कंपनीतील पगारवाढ महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेमुळे झाली होती.  कामगारांना  पगारावाढीचा तिसरा हप्ता मिळणार होता.

मात्र, भारतीय कामगार सेना युनियन लीडर विनायक राऊत यांनीच पगारवाढ देऊ नये असे पत्र व्यवस्थापनाला दिले आहे. त्यामुळे २०१४ सालचे प्रतिकामगार २ हजार रुपये असे १ हजार ६७३ कामगारांचे पैसे शिल्लक राहिले आहेत.  राऊत यांनी दिलेले पत्र लवकरच जाहीर करू तसेच त्या  पत्राच्या ५ लाख प्रति मतदारसंघात आम्ही वाटू. त्यामुळे नेमके सत्य जनतेसमोर येईल.

खंबाटा प्रकरणी सध्या ईडीची चौकशी सुरू आहे. त्यातूनही सत्य बाहेर येईल.   खंबाटा कंपनीच्या गरीब कामगारांच्या पगाराचे पैसे राऊत यांनी त्यांना मिळवून द्यावेत. अन्यथा राऊतांच्या जाहीर सभेतच खंबाटा कामगार त्यांना त्याबाबत जाब विचारतील, असेही  आमदार नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.