शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

खंबाटातील मराठी कामगारांना देशोधडीला लावले! आमदार नीतेश राणे यांची  विनायक राऊतांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 19:05 IST

खंबाटा एव्हीएशन कंपनीमध्ये भारतीय कामगार सेना मान्यताप्राप्त संघटना आहे.  मान्यताप्राप्त संघटनेची सही  कामगार करारावर असते. त्यामुळे विनायक राऊत यांनी जनतेला अर्धसत्य सांगू नये. खंबाटा

ठळक मुद्देकणकवलीत पत्रकार परिषद

 

कणकवली : खंबाटा एव्हीएशन कंपनीमध्ये भारतीय कामगार सेना मान्यताप्राप्त संघटना आहे.  मान्यताप्राप्त संघटनेची सही  कामगार करारावर असते. त्यामुळे विनायक राऊत यांनी जनतेला अर्धसत्य सांगू नये. खंबाटा कंपनीतील पगारवाढ महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेमुळे झाली होती. मात्र, भारतीय कामगार सेना व विनायक राऊत यांनी या कंपनीतील मराठी कामगारांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप  आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.

कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र  समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस विहंग दळवी उपस्थित होते.       यावेळी आमदार नीतेश राणे म्हणाले, खंबाटा कंपनीतील कामगारांच्या घामाचा पैसा त्यांना मिळू शकला नाही. याला  विनायक राऊतच जबाबदार आहेत. या कामगारांच्या पैशासंदर्भात महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने कामगार न्यायालयात दावा  दाखल केला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार किरण पावसकर, अंजली दमानिया यांनीसुद्धा राऊत यांनीच खंबाटामधील कामगारांना देशोधडीला लावल्याचा आरोप यापूर्वी केला आहे.

असे सांगतानाच आमदार राणे यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची याबाबतची व्हिडीओ क्लिप तसेच खंबाटा कंपनीच्या कामगारांचा सुमारे २ हजार कोटींचा पगार दिला नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता त्याची  व्हिडीओ क्लिपही यावेळी पत्रकार परिषदेत दाखविली. आमदार नीतेश राणे पुढे म्हणाले, भारतीय कामगार सेना या  मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाºयांची  सही  कामगार करारावर आहे.  खंबाटा कंपनीतील पगारवाढ महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेमुळे झाली होती.  कामगारांना  पगारावाढीचा तिसरा हप्ता मिळणार होता.

मात्र, भारतीय कामगार सेना युनियन लीडर विनायक राऊत यांनीच पगारवाढ देऊ नये असे पत्र व्यवस्थापनाला दिले आहे. त्यामुळे २०१४ सालचे प्रतिकामगार २ हजार रुपये असे १ हजार ६७३ कामगारांचे पैसे शिल्लक राहिले आहेत.  राऊत यांनी दिलेले पत्र लवकरच जाहीर करू तसेच त्या  पत्राच्या ५ लाख प्रति मतदारसंघात आम्ही वाटू. त्यामुळे नेमके सत्य जनतेसमोर येईल.

खंबाटा प्रकरणी सध्या ईडीची चौकशी सुरू आहे. त्यातूनही सत्य बाहेर येईल.   खंबाटा कंपनीच्या गरीब कामगारांच्या पगाराचे पैसे राऊत यांनी त्यांना मिळवून द्यावेत. अन्यथा राऊतांच्या जाहीर सभेतच खंबाटा कामगार त्यांना त्याबाबत जाब विचारतील, असेही  आमदार नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.