शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

ओरोस येथे मराठा बांधवांचा २३ आॅक्टोबरला ‘एल्गार’

By admin | Updated: September 25, 2016 23:22 IST

मराठा समाजातील तीन लाख बांधवांचा मूक मोर्चा काढण्यात येणार

सिंधुदुर्गनगरी : कोपर्डी अत्याचाराचा निषेध, आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, यासाठी २३ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजातील तीन लाख बांधवांचा मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हा नियोजन बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी यांच्यासह एक हजार जणांची उपस्थिती होती. ‘ना कोणत्या पक्षाचा, ना कोणत्या संघटनेचा, एक मराठा लाख मराठा’ या घोषणांनी येथील शरद कृषी भवनातील सभागृह दणाणून सोडले. कोपर्डी घटनेनंतर राज्यात मोर्चाची मालिका सुरू झाली आहे. हा मोर्चा सिंधुदुर्गात कधी निघणार, याबाबत जिल्ह्याला उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर रविवारी येथील शरद कृषी भवन येथे मराठा क्रांती मोर्चा नियोजनाच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. पाऊस असतानाही मोठ्या प्रमाणात मराठा बांधव बैठकीला उपस्थित होते.