शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

अनेक ऐतिहासिक निर्णय

By admin | Updated: December 23, 2014 23:42 IST

जिल्हा परिषद आंब्रड मतदारसंघात रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया यामुळे २०१४ हे वर्ष जिल्हा परिषदेसाठी निवडणुकांचेच वर्ष गेले.

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड, जिल्हा परिषद समिती सभापती निवड, जिल्हा परिषद आंब्रड मतदारसंघात रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया यामुळे २०१४ हे वर्ष जिल्हा परिषदेसाठी निवडणुकांचेच वर्ष गेले. त्यामुळे सर्व जबाबदारी ही जिल्हा परिषद प्रशासनावर पडली होती. त्यातही काही ऐतिहासिक निर्णयही घेण्यात आले. मात्र, त्यातील काही निर्णय यशस्वी तर काही बारगळलेले दिसून आले.सन २०१४ या वर्षाच्या सुरूवातीला तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते व उपाध्यक्ष मधुसुदन बांदिवडेकर यांनी आपल्या पदाची धुरा सांभाळताना काही चांगले निर्णयही त्यावेळी घेतले. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्याने त्यासाठी सप्टेंबरमध्ये निवडणुका लागल्या. या निवडणुकीत अध्यक्षपदी संदेश सावंत तर उपाध्यक्षपदी रणजीत देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमध्ये सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नाराजी दिसून आली.जिल्हा परिषद सदस्यांना शासन निर्णयांची तसेच बैठकीची माहिती मिळावी यासाठी प्रशासनाच्यावतीने ५ लाख खर्च करून ५० जिल्हा परिषद सदस्यांना टॅब पुरविले. जिल्हा परिषदेचा हा निर्णय योग्य आहे, मात्र सद्यस्थितीत एकाही सदस्यांच्या हातात तो टॅब दिसत नसल्याने ५ लाख रूपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ही योजना बारगळली आहे.यावर्षी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व म्हणजे १४७० शाळांमध्ये स्वच्छता मिशन राबविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला व तो राबविण्यातही आला. जिल्हा परिषदेने कुपोषणमुक्त जिल्हा करण्याचा निर्णयही घेतला. अद्यापही जिल्ह्यात शेकडो बालके ही कुपोषणग्रस्त आहेत. म्हणून कुपोषणमुक्त अभियान हे केवळ कागदावरच राहिलेला पहावयास मिळत आहे. तसेच जिल्हा निर्मल करण्याचे स्वप्न असून अद्यापही ३० ग्रामपंचायती या निर्मल होणे बाकी आहेत.गणवेशाचा रंग बदलणारसरत्या वर्षात काही ऐतिहासिक निर्णयही जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आले. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील मुलांचा गणवेशाचा रंग बदलाचा निर्णय घेण्यात आला. तसा रंगही निश्चित करून आगामी २०१५च्या शैक्षणिक वर्षामध्ये तो वापरण्यात येणार आहे. गावातील कमी होणारी पटसंख्या लक्षात घेता व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ‘एक गाव, एक शाळा’ हे धोरण राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, त्या निर्णयाचा अद्यापपर्यंत अंमलबजावणी न झाल्याने तो बासनात गुंडाळून ठेवला आहे.