शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अनेक ऐतिहासिक निर्णय

By admin | Updated: December 23, 2014 23:42 IST

जिल्हा परिषद आंब्रड मतदारसंघात रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया यामुळे २०१४ हे वर्ष जिल्हा परिषदेसाठी निवडणुकांचेच वर्ष गेले.

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड, जिल्हा परिषद समिती सभापती निवड, जिल्हा परिषद आंब्रड मतदारसंघात रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया यामुळे २०१४ हे वर्ष जिल्हा परिषदेसाठी निवडणुकांचेच वर्ष गेले. त्यामुळे सर्व जबाबदारी ही जिल्हा परिषद प्रशासनावर पडली होती. त्यातही काही ऐतिहासिक निर्णयही घेण्यात आले. मात्र, त्यातील काही निर्णय यशस्वी तर काही बारगळलेले दिसून आले.सन २०१४ या वर्षाच्या सुरूवातीला तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते व उपाध्यक्ष मधुसुदन बांदिवडेकर यांनी आपल्या पदाची धुरा सांभाळताना काही चांगले निर्णयही त्यावेळी घेतले. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्याने त्यासाठी सप्टेंबरमध्ये निवडणुका लागल्या. या निवडणुकीत अध्यक्षपदी संदेश सावंत तर उपाध्यक्षपदी रणजीत देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमध्ये सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नाराजी दिसून आली.जिल्हा परिषद सदस्यांना शासन निर्णयांची तसेच बैठकीची माहिती मिळावी यासाठी प्रशासनाच्यावतीने ५ लाख खर्च करून ५० जिल्हा परिषद सदस्यांना टॅब पुरविले. जिल्हा परिषदेचा हा निर्णय योग्य आहे, मात्र सद्यस्थितीत एकाही सदस्यांच्या हातात तो टॅब दिसत नसल्याने ५ लाख रूपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ही योजना बारगळली आहे.यावर्षी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व म्हणजे १४७० शाळांमध्ये स्वच्छता मिशन राबविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला व तो राबविण्यातही आला. जिल्हा परिषदेने कुपोषणमुक्त जिल्हा करण्याचा निर्णयही घेतला. अद्यापही जिल्ह्यात शेकडो बालके ही कुपोषणग्रस्त आहेत. म्हणून कुपोषणमुक्त अभियान हे केवळ कागदावरच राहिलेला पहावयास मिळत आहे. तसेच जिल्हा निर्मल करण्याचे स्वप्न असून अद्यापही ३० ग्रामपंचायती या निर्मल होणे बाकी आहेत.गणवेशाचा रंग बदलणारसरत्या वर्षात काही ऐतिहासिक निर्णयही जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आले. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील मुलांचा गणवेशाचा रंग बदलाचा निर्णय घेण्यात आला. तसा रंगही निश्चित करून आगामी २०१५च्या शैक्षणिक वर्षामध्ये तो वापरण्यात येणार आहे. गावातील कमी होणारी पटसंख्या लक्षात घेता व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ‘एक गाव, एक शाळा’ हे धोरण राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, त्या निर्णयाचा अद्यापपर्यंत अंमलबजावणी न झाल्याने तो बासनात गुंडाळून ठेवला आहे.