शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
3
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
4
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
5
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
6
SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र
7
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
8
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
9
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
10
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
11
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
12
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
13
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
14
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
15
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
16
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
17
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
18
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
19
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
20
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

वाशी फळ मार्केटमध्ये आंब्याच्या दरात घसरण

By admin | Updated: March 14, 2017 22:55 IST

आवक वाढली : पेटीमागे चक्क दीड हजार रुपयांचा फरक

रत्नागिरी : वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी मार्केटमध्ये २२ हजार आंबा पेट्या आल्या होत्या. रविवारी व सोमवारी मार्केटला सुटी असल्याने मार्केटमध्ये शुकशुकाट होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा लवकर बाजारात आला आहे, शिवाय प्रमाणही अधिक आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारभाव कमी आहे. पेटीमागे १५०० रूपयांचा फरक असल्यामुळे शेतकरी बंधंूचे आर्थिक नुकसान होत आहे.सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान होऊनसुध्दा लवकर थंडी सुरू झाली. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच मोहोर प्रक्रियेला प्रारंभ झाला. दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढले. परिणाम पुनर्मोहोराच्या संकटामुळे आधीच्या मोहोराला आलेल्या फळांची गळ झाली. थंडी सुरू असल्यामुळे प्रत्येक झाडाला सलग तीन वेळा मोहोर आला. त्यामुळे पहिल्या दोन मोहोराचा आंबा गळून पडला. त्याचदरम्यान थ्रीप्स व कीटकांचा परिणाम आंबा पिकावर झाला. आंब्याच्या व मोहोराच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करावी लागते. कीटकनाशकांचा वापर झाडांची देखभाल यामुळे काही प्रमाणात बचावलेला आंबा उष्णतेमुळे लवकर तयार झाला. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच आंबा बाजारात आला. सुरूवातीला त्याचे प्रमाण अल्प होते. यावर्षी आंब्याचे प्रमाण नक्कीच अधिक आहे. पंधराशे ते चार हजार रूपये दराने आंबा पेटी विक्री सुरू आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत हा दर कमी आहे. गतवर्षीपेक्षा पेटीमागे दीड हजार रूपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नोटाबंदीचा परिणाम आंबा विक्रीवर झाला आहे. कार्पोरेट सेक्टरमधून आंब्याची मागणी खालावली आहे. सध्या आखातील प्रदेशातून आंब्याची निर्यात सुरू आहे. आखाती प्रदेशातून आंब्याला चांगली मागणी असल्याने दर टिकून आहेत. पुढच्या आठवड्यापासून युरोप व अमेरिकेची निर्यात सुरू होईल. शिवाय मुंबईमध्ये उत्तरप्रदशातील भैय्येच आंब्याची विक्री करतात. उत्तरप्रदेशमधील निवडणूक नुकतीच संपली असून, होळी सण झाल्यानंतर या मंडळींचे मुंबईत आगमन होणार आहे. त्यामुळे आंब्याचा उठाव पुढच्या आठवडयापासून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सध्यातरी आंबा चांगला आहे. परंतु सुरूवातीच्या आंब्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे २० मार्चनंतर कोकणातील हापूस निर्यातीची संख्या घटेल. शेतकऱ्यांना ब्रेक घेऊन आंबा काढवा लागणार असल्याची प्रतिक्रिया आंबा बागायतदार एम. एम. गुरव यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)चांगल्या दर्जाच्या आंब्याला चांगला भाव आहे. कर्नाटक तसेच केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधून दररोज दहा ते पंधरा हजार पेट्यांची आवक होत आहे. हापूस, लालबाग, तोतापुरी, बदामी, गुहा आदी विविध प्रकारचा आंबा विक्रीस येत आहे. मात्र, हा आंबा किलोवर विकण्यात येत आहे. कर्नाटकसह व दक्षिण भारतातील आंबा कोकण हापूसच्या बरोबर सुरू झाला. आंब्याचा दर्जा व उत्पादन दोन्ही बाबतीत कोकणच्या हापूसपेक्षा सरस आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल, अशा दरात आंबा विक्री सुरू आहे.