शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजू विमा हप्त्यात कपात

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

विमा संरक्षणाचे काम टाटा एआयजी कंपनी पाहणार

ओरोस : जिल्ह्यातील काजू व आंबा बागायतदारांना देण्यात येणाऱ्या विमा संरक्षणासाठी वार्षिक हप्ता कमी करण्यात आला असून हा निर्णय बागायतदारांसाठी फायदेशीर आहे. विमा संरक्षणाचे काम आता कृषी विमा कंपनीऐवजी टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनी पाहणार आहे.पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता व वेगाचे वारे यापासून आंबा व काजू या फळपिकांना निर्धारीत कालावधीत विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य दिले जाते. आंबा बागायतदारांचे नुकसान झाल्यास १ लाख रूपये तर काजू बागायतदारांना ७५ हजार रूपये नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी आंबा बागायतदारांना वर्षाला ४ हजार ८७६ रूपये तर काजू बागायतदारांना ३ हजार ६०१ रूपये हप्ता भरावा लागणार आहे. यापूर्वी आंबा बागायतदारांना वर्षाला ६ हजार रूपये तर काजू बागायतदारांना ४ हजार ५०० रूपये हप्ता भरावा लागत होता. आता या हप्त्याची रक्कम कमी करण्यात आली आहे.या विमा योजनेत भाग घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देय राहील. विमा हप्ता प्रति हेक्टरी भरावयाचा आहे. आंबा बागायतदारांना विमा हप्ता भरण्याची ३१ डिसेंबर तर काजू बागायतदारांसाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. १ जानेवारी २०१५ ते १५ मे २०१५ या कालावधीत अवेळी पाऊस झाला. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीच्या कालावधीत जास्त तापमान झाले तर आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. (वार्ताहर)काजूला नुकसान भरपाई१ डिसेंबर २०१४ ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत अवेळी पाऊस तसेच जास्त तापमान झाले तर काजू बागायतदारांना ७५ हजार रूपये विमा संरक्षण दिले जाणार आहे. या विमा योजनेचा बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षकांच्यावतीने करण्यात आले आहे.