शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

देणमध्ये आंबा, काजू बाग आगीत खाक

By admin | Updated: January 16, 2015 23:45 IST

५0 लाखांची हानी : ३४ एकर क्षेत्र आगीत भस्मसात; विद्युत वाहिनी तुटल्याने आग

फुणगूस : संगमेश्वर तालुक्यातील खाडीभागातील देण-धनगरवाडा येथे महावितरणची ४४० विद्युतभारित वाहिनी तुटून आंबा व काजू बागेवर पडल्याने लागलेल्या आगीत ३४ एकर क्षेत्रांतील ३५०० काजू कलमे, १०० आंबा कलमे आणि पाच लाखांचा ठिबक सिंचन प्रकल्प जळून खाक झाले. घटनास्थळी आलेले महावितरणचे कर्मचारी आणि शाखा अभियंत्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. जोपर्यंत वरिष्ठ येथे येऊन पाहणी करून पंचनामा करत नाहीत, तोपर्यंत येथून जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने सायंकाळपर्यंत पंचनामा होऊ शकला नाही. या आगीत ४० ते ५० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथून जवळच असलेल्या देण गावातील धनगरवाडा परिसरात कातळी जमिनीवर प्रसाद काशीनाथ मुळ्ये, कृष्णा मेवे, तसेच दिलीप देसाई यांनी आंबा-काजूची बाग फुलवली होती. आज, शुक्रवारी याच बागेवर महावितरणची वाहिनी तुटून आग लागली.दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास धनगरवाडा भागातील ‘बिवळाचा सखल’ या भागातून धुराचे प्रचंड लोळ बाहेर पडत असल्याचे देण ग्रामस्थांच्या नजरेस पडले. भयंकर अशा आगीने संपूर्ण परिसरालाच वेढा घातला होता. वारा अन् कडकडीत ऊन असल्याने आग चारही बाजूला वेगाने पसरली होती. प्रसाद मुळ्ये, कृष्णा मेवे, देसाई यांच्याबरोबर शेकडो ग्रामस्थ मदतीला धावले. (वार्ताहर)हलगर्जीपणाच कारणीभूतमहावितरणची ४४० दाबाची विद्युत वाहिनी पूर्णपणे जीर्ण झाली होती. याची कल्पना वर्षभरापूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज ही तार तुटून पडली. या आगीत ३४ एकरच्या जागेमधील ३५०० काजू कलमे जळून खाक झाली. त्याचबरोबर पाच लाख रुपयांचे ठिबक सिंचन योजनाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बाजूच्या शेतातील १०० हापूस आंबा कलमांना या आगीचा फटका बसला. महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळेच एवढे मोठे नुकसान झाले.