शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

अलायन्स एअरला मालवणी दणका, प्रवाशांनी विमानातच मांडली ठाण

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 14, 2023 20:51 IST

चिपीकडे येणारे विमान अचानक रद्द केल्यानंतर पवित्रा, रात्री उशिरा कंपनीने केली राहण्याखाण्याची व्यवस्था

सिंधुदुर्ग : मोठा गाजावाजा करून दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर गेल्या वर्षभरात सातत्याने अचानक फ्लाइट रद्द करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. १ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दररोज विमान धावेल, अशी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेली घोषणा हवेतच विरली.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीच्या उड्डाण क्रमांक ९ आय ६६१ हे ५१ प्रवासी बसलेले असताना सकाळी ११:४० वाजता सुटणारे विमान अचानक रद्द केल्याचे कंपनीने जाहीर केले. त्यामुळे विमानात बसलेल्या प्रवास करणाऱ्या चाकरमानी प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत विमानातून न उतरण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११ पासून रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ९ तास प्रवासी या विमानातच बसून होते. रात्री उशिरा या प्रवाशांची राहणा, खाण्याची व्यवस्था करून उद्या त्यांना चिपीत आणले जाणार आहे. त्यामुळे एअर लाइन्सला मालवणी दणका देत या प्रवाशांनी दाखविलेल्या धैर्याचे मालवणी मुलखात, सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत होते.

दरम्यान, हे विमान पहिले रद्द केले. त्यानंतर प्रवाशांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर एक खासगी विमान मुंबई विमानतळावर कोसळल्यानंतर अनेक विमानांची उड्डाणे रद्द केली. त्यात हे विमानही रद्द केल्याचे सांगण्यात आले. मात्र, आतील प्रवासी विमानातून न उतरताच आम्ही हलणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर पहिला एसी बंद करून त्यानंतर, लाईट बंद करून प्रवाशांना आतून बाहेर काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, प्रवासी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हे विमान रद्द होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी अनेक लोकप्रतिनिधींना संपर्क केला. त्यानंतर ते सोडण्यासाठी यंत्रणा तयार झाली होती.

चिपीतून प्रवाशांनाही मागे पाठविलेमुंबईकडे जाण्यासाठी चिपी विमानतळावर आलेल्या प्रवाशांनाही विमान रद्द झाल्याचे सांगून मागे पाठविण्यात आले. त्यामुळे सणासुदीच्या काळात अचानक विमान रद्द केल्याने मागे फिरणाऱ्या प्रवाशांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

वृद्ध, रुग्ण प्रवाशांना फटकाविमान सकाळी ११:४० चे असल्याने पहाटेपासूनच वसई, विरार, डहाळू आदी लांबपल्ल्याच्या प्रवासी चाकरमान्यांनी विमानतळावर येण्यासाठी घर सोडले होते. त्यातच काही प्रवासी हे वृद्ध आणि रुग्ण असल्याने त्यांना या विमानातील ठिय्या आंदोलनाचा मोठा फटका बसला.

नाईट लँडिंगचेही कारणदरम्यान, सायंकाळी उशिरा हे विमान सोडले तर चिपी येथे नाईट लँडिंगची व्यवस्था नसल्याचे कारणही कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, प्रवाशांनी मागे न हटता आम्हाला मोपाला सोडा आणि तेथून सिंधुदुर्गात नेण्याची व्यवस्था करा, अशीही आग्रही मागणी लावून धरली होती.

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळ