शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

अलायन्स एअरला मालवणी दणका, प्रवाशांनी विमानातच मांडली ठाण

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 14, 2023 20:51 IST

चिपीकडे येणारे विमान अचानक रद्द केल्यानंतर पवित्रा, रात्री उशिरा कंपनीने केली राहण्याखाण्याची व्यवस्था

सिंधुदुर्ग : मोठा गाजावाजा करून दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर गेल्या वर्षभरात सातत्याने अचानक फ्लाइट रद्द करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. १ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दररोज विमान धावेल, अशी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेली घोषणा हवेतच विरली.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीच्या उड्डाण क्रमांक ९ आय ६६१ हे ५१ प्रवासी बसलेले असताना सकाळी ११:४० वाजता सुटणारे विमान अचानक रद्द केल्याचे कंपनीने जाहीर केले. त्यामुळे विमानात बसलेल्या प्रवास करणाऱ्या चाकरमानी प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत विमानातून न उतरण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११ पासून रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ९ तास प्रवासी या विमानातच बसून होते. रात्री उशिरा या प्रवाशांची राहणा, खाण्याची व्यवस्था करून उद्या त्यांना चिपीत आणले जाणार आहे. त्यामुळे एअर लाइन्सला मालवणी दणका देत या प्रवाशांनी दाखविलेल्या धैर्याचे मालवणी मुलखात, सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत होते.

दरम्यान, हे विमान पहिले रद्द केले. त्यानंतर प्रवाशांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर एक खासगी विमान मुंबई विमानतळावर कोसळल्यानंतर अनेक विमानांची उड्डाणे रद्द केली. त्यात हे विमानही रद्द केल्याचे सांगण्यात आले. मात्र, आतील प्रवासी विमानातून न उतरताच आम्ही हलणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर पहिला एसी बंद करून त्यानंतर, लाईट बंद करून प्रवाशांना आतून बाहेर काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, प्रवासी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हे विमान रद्द होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी अनेक लोकप्रतिनिधींना संपर्क केला. त्यानंतर ते सोडण्यासाठी यंत्रणा तयार झाली होती.

चिपीतून प्रवाशांनाही मागे पाठविलेमुंबईकडे जाण्यासाठी चिपी विमानतळावर आलेल्या प्रवाशांनाही विमान रद्द झाल्याचे सांगून मागे पाठविण्यात आले. त्यामुळे सणासुदीच्या काळात अचानक विमान रद्द केल्याने मागे फिरणाऱ्या प्रवाशांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

वृद्ध, रुग्ण प्रवाशांना फटकाविमान सकाळी ११:४० चे असल्याने पहाटेपासूनच वसई, विरार, डहाळू आदी लांबपल्ल्याच्या प्रवासी चाकरमान्यांनी विमानतळावर येण्यासाठी घर सोडले होते. त्यातच काही प्रवासी हे वृद्ध आणि रुग्ण असल्याने त्यांना या विमानातील ठिय्या आंदोलनाचा मोठा फटका बसला.

नाईट लँडिंगचेही कारणदरम्यान, सायंकाळी उशिरा हे विमान सोडले तर चिपी येथे नाईट लँडिंगची व्यवस्था नसल्याचे कारणही कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, प्रवाशांनी मागे न हटता आम्हाला मोपाला सोडा आणि तेथून सिंधुदुर्गात नेण्याची व्यवस्था करा, अशीही आग्रही मागणी लावून धरली होती.

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळ