शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

दोडामार्गमधील ग्रामीण मार्ग चिखलाने माखले

By admin | Updated: August 29, 2014 23:09 IST

गणेशोत्सवातही प्रशासन सुस्तच

वैभव साळकर - दोडामार्ग -गणेशोत्सवाच्या कालावधीतही तालुक्यातील जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्गांची जिल्हा परिषद बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशरक्ष: वाताहात झाली आहे. तालुक्यातील झोळंबे-कुडासे, मणेरी- कुडासे, भेडशी- उसप- पिकुळे, साटेली, खोक्रल- मांगेली, वझरे-तळेखोल आदी महत्त्वपूर्ण रस्त्यांची देखभाल दुरूस्तीच होत नसल्याने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झाडी आणि डांबरीकरण रस्त्यावर मातीची मलमपट्टी केली जात असल्याने हे सर्व मार्ग पावसाळ्यात सर्वत्र चिखलाने माखल्याने दयनीय अवस्था झाली आहे.दोडामार्ग तालुका निर्मितीच्या एका तपानंतरही अद्याप रस्ते निर्मिती आणि रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करणारे जिल्हा परिषदचे बांधकाम विभाग कार्यालय दोडामार्गात कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याचा कार्यभार ५० ते १०० किलोमीटर अंंतरावरून म्हणजेच पूर्वीच्या सावंतवाडी तालुक्यातून हाकला जात आहे. परिणामी नागरिकांच्या पायाभूत सुविधेतील रस्ते सुविधेच्या मूळ उद्देशालाच खो घातला जात असल्याचे चित्र आहे. गतिमान प्रशासन आणि पालकमंत्र्यांचे वजन यामुळे नवख्या दोडामार्ग तालुक्यातील खेडोपाड्यात नवीन रस्त्यांची निर्मिती झपाट्याने होत असली तरी पूर्वी साकारलेल्या जिल्हा आणि ग्रामीण मार्गांची वाताहात सुरू आहे. झोळंबे-तळकट, कुंब्रल ते कुडासे हा तळकट दशक्रोशीतील अनेक गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेला रस्ता आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, त्याकडे बांधकामने साफ दुर्लक्ष केले आहे. डांबरीकरण रस्त्यावरील खड्डे मातीने बुजविले. रस्त्याची साईडपट्टी उखडल्याने आणि रस्त्यावरील मोऱ्याही ढासळल्याने या मार्गावरील वाहतूकही धोक्यात आहे.तर भेडशी ते उसप-पिकुळे, मणेरी-कुडासे आणि साटेली-खोक्रल मांगेली या रस्त्यांचीही अवस्था देखभाल दुरूस्तीअभावी कमालीची बिकट बनली आहे. यामार्गावरही खड्यांचेच जाळे विणले गेल्याने रस्त्यांची चाळण बनली आहे. उसप-पिकुळे रस्त्याच्या डागडुजीसाठी गतवर्षी रस्त्याच्या कडेला खडी टाकण्यात आली. मात्र, त्या रस्त्यांची डागडुजी झालेली नाही. त्यामुळे बांधकाम खात्याची बेपर्वाई याठिकाणी अधोरेखित होते. दिवसेंदिवस गतिमान होणारे प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी अनेकाअंगी योजना राबवित असताना संबंधित खात्याचे अधिकारी मात्र सुस्तच असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.