शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तालुका काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

By admin | Updated: March 20, 2017 23:54 IST

नीतेश राणे : वैभववाडीतील अपयश पदाधिकाऱ्यांचे ; कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा फटका

वैभववाडी : तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तळागाळात कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. पदाधिकारी लोकसंपर्कात कमी पडले. अनेक वर्षे सतत पदे मिळाल्यामुळे पदाधिकारी आळसावले. त्याचाच एवढया मोठ्या प्रमाणात पक्षाला फटका बसला आहे. हे माझं अपयश नसून पदाधिकाऱ्यांचे अपयश आहे, असे स्पष्ट करीत तालुका काँग्रेसमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल झालेले दिसतील, असे आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी दुपारी येथील संपर्क कार्यालयात आमदार नीतेश राणे यांनी पदाधिकाऱ्यांची बंद खोलीत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, नगराध्यक्ष संजय चव्हाण, नगरपंचायत सभापती दीपा गजोबार, जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, नासीर काझी, हुसेन लांजेकर, संजय सावंत, बाळा हरयाण, शुभांगी पवार, वैशाली रावराणे, प्राची तावडे, नगरसेविका अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर आदी उपस्थित होते.आमदार नीतेश राणे म्हणाले की, अनेकवर्षे पदे मिळत गेल्यामुळे पदाधिकारी आळसावले होते. पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये संवाद राहिला नाही. जनसंपर्कात पदाधिकारी कमी पडले. विशेष म्हणजे निवडणुकीत ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत. याचा फायदा विरोधकांनी घेतला. शेंबड्या पोराप्रमाणे रडत बसणारे आम्ही नाही. संघटनात्मक फेरबदल करुन पक्षाची बांधणी पुन्हा नव्या उमेदीने केली जाईल. संघटना बांधणीत यापूर्वी राहिलेल्या त्रुटी दूर करून संघटनेची घडी आपण पुन्हा बसविणार आहोत. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, स्नेहलता चोरगे यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा आपण निषेध करतो. असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून चोरगेंना न्याय द्यावा. माझ्या मतदारसंघातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करुन पोलिसांकडे सुपूर्द केली. सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल करणाऱ्या एजन्सीचे संपर्क क्रमांक पोलिसांना दिले आहेत. मग दोन महिने सीसीटीव्ही बंद राहत असतील तर पोलीसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेचे नियंत्रण करणे पोलिसांना जमणार नसेल तर त्यांनी तसे लेखी द्यावे, त्याचीही व्यवस्था करण्याची आपली तयारी आहे. नंतर मात्र त्याबाबत कुणी शंकाकुशंका काढू नयेत.आपल्या घरावर राजकीय वैमनस्यातून हल्ला झाला, असा आरोप स्नेहलता चोरगे यांनी केला होता त्याबाबत विचारले असता, राजकारणात इतकी वर्षे काढलेल्या कार्यकर्त्यांचे कुणाशी ना कुणाशी राजकीय वैमनस्य असते. तसे स्नेहलता चोरगे यांचेही असू शकते. त्या बरीच वर्षे आमच्या सोबत होत्या. परंतु, राणेंसोबत असल्यामुळे त्यांच्या घरावर दगड मारण्याची कुणाची हिंमत झाली नाही. याचाच अर्थ राणे आपल्या कार्यकर्त्यांचे संरक्षण करतात. राणेंचा हात डोक्यावरुन बाजूला गेल्यावर ‘खिशातले दगड’ बाहेर येतात. यावरुन ‘राणे’ नावाचे ‘वजन’ चोरगेंना कळले असेल, असे मिश्किल उत्तर आमदार नीतेश राणे यांनी दिले.आमदार म्हणून मी आणि तालुका काँग्रेसच्यावतीने १ एप्रिलपासून ‘योजना तुमच्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ करीत आहोत. केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या लोकोपयोगी योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.यासाठी आवश्यक कागदपत्रे आणून दिली तर प्रस्ताव पूर्ण करुन लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक दररोज सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत पक्ष कार्यालयात उपलब्ध असतील असे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रात्रभर दगड मोजत होत्या का?स्नेहलता चोरगे यांच्या घरावर रात्री दगडफेक झाली असे त्यांनीच तक्रारीत म्हटले आहे. रात्री दगडफेक झालेली असताना तक्रार सकाळी का दिली? यावरुन हल्ल्याबाबत आपल्या मनात संशय आहे. रात्री घरावर हल्ला झाल्यानंतर सकाळपर्यंत त्या दगड मोजत होत्या का? असा खोचक प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित करीत पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने चालू करुन घ्यावेत. कधी कुणावर दगडफेक होईल हे काही सांगता येत नाही, असा टोला आमदार नीतेश राणे यांनी लगावला.