शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महावितरण कंपनीच्या थकबाकीमध्ये कमालीची घट

By admin | Updated: November 30, 2015 01:08 IST

आॅनलाईनचा परिणाम : परजिल्ह्यात राहणाऱ्या ग्राहकांसाठीही चांगला पर्याय--महाप्रकाश आशेचा- ३

मेहरून नाकाडे --रत्नागिरी  -कोकण परिमंडलात चांगल्या सुविधा येण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी वेळ व पैशांचा अपव्यय टाळण्याकरिता आॅनलाईन सुविधा सुरु करण्यात आली. शिवाय स्वयंचलीत वीजबिल केंद्रदेखील सुरु करण्यात आली. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीमध्ये आता बऱ्यापैकी घट झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती ४३ हजार ७१५, वाणिज्यचे ६ हजार २२४, औद्योगिकचे १४०१, शेतीपंप १३८७, सार्वजनिक पाणीपुरवठा ८९०, अन्य ७६५, पथदिवे २०६ मिळून एकूण ५४ हजार ५८८ ग्राहक आहेत. साधारणत: जिल्ह्यात ६ कोटी १३ लाखांच्या आसपास थकबाकी आहे. महावितरणचे वाढलेले ग्राहक व वीज युनिटचे वाढलेले दर यामुळे थकबाकीची संख्या आकड्यात अधिक असली तरी प्रत्यक्षात थकबाकीदार मात्र कमी झाले आहेत. घरगुती ग्राहकांची ३ कोटी ३२ लाख, वाणिज्यचे १ कोटी १८ लाख, औद्योगिकचे ७१ लाख, शेतीपंपचे ११ लाख २० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे ५४ लाख ४० हजार, अन्य ११ लाख, तर पथदिव्यांची १३ लाख ७१ हजार थकबाकी शिल्लक राहाते. घरगुती ग्राहकांकडील थकबाकी कमी झाली आहे. औद्योगिक व सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांचीच थकबाकी अधिक आहे. थकबाकी कमी करण्यासाठी महावितरणने २०१० साली देयक आॅनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच नेटबँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आदी पर्याय देण्यात आले. सुरुवातीला ३१० इतके ग्राहक या योजनेचा लाभ घेत होते. मात्र, ही संख्या आता वाढली असून, १८ हजार ५२३ इतकी झाली आहे. त्यामुळे सन २0१0मध्ये आॅनलाईनद्वारे महावितरणला ९ लाख २४ हजार ७८० इतका महसूल प्राप्त होत होता. त्यामध्ये आता कमालीची वाढ झाली आहे. सध्या आॅक्टोबर २०१५मध्ये आॅनलाईन वीजबिल भरल्याने महावितरणला २ कोटी ५० लाख ६६ हजार १२५ लाखाचा महसूल प्राप्त झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात घर असूनही नोकरी, व्यवसायानिमित्त परगावी राहणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय महावितरणकडून उपलब्ध करुन देण्यात आल्याने महावितरणच्या महसूलामध्ये भर पडली आहे.बँकेच्या ग्राहकाला आपल्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी एटीएमचा पर्याय दिला. त्याप्रमाणे महावितरणकडून जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी सप्टेंबर २०१२मध्ये नाचणे रोड येथे पहिले एटीपी केंद्र सुरु करण्यात आले. सुरुवातीला या एटीपी केंद्राची कार्यक्षमता मर्यादित ठेवण्यात आली होती. परंतु आता विस्तार वाढविण्यात आला आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, कणकवली, मालवण येथेही एटीपी केंद्रे उभारण्यात आली आहेत. दापोली व खेड येथील एटीपी केंद्र ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी जूनपासून बंद करण्यात आली. परंतु रत्नागिरी, चिपळूण, कणकवली व मालवण येथील एटीपी केंद्रांवर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ती केंदॅ सुरु ओत. सुरुवातीला एटीपी केंद्रावरील ग्राहकांची दररोजची संख्या हजार ते १२०० इतकी मर्यादित होती. या केंद्रांवरील ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आॅक्टोबरमध्ये ३८ हजार ३३७ ग्राहकांनी एटीपी केंद्रावर वीजबिल भरल्यामुळे ५ कोटी ६६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. नोकरदार, व्यावसायिक, सेकंड होम धारक ग्राहक वर्षातून एक-दोनदा गावी येत असत. त्यावेळीच त्यांना थकबाकी भरणे शक्य होत असे. परंतु आता आॅनलाईनमुळे कुठूनही बिल भरणे सोयीचे झाले आहे. शिवाय एटीपीमुळे सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणे शक्य होत आहे. महावितरणच्या ग्राहक संख्येत वाढ होत आहे, तसेच आॅनलाईन, एटीपीमुळे महसुलात वाढ होऊन दिवसेंदिवस थकबाकी कमी होऊ लागली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती ४३ हजार ७१५, वाणिज्यचे ६ हजार २२४ ग्राहक.जिल्ह्यात ६ कोटी १३ लाखांच्या आसपास थकबाकी.आॅनलाईन बिल भरण्याकडे ग्राहकांचा वाढता कल.आॅक्टोबरमध्ये आॅनलाईन वीजबिल भरल्याने महावितरणला २ कोटी ५० लाख ६६ हजार १२५ लाखांचा महसूल प्राप्त.