शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कंपनीच्या थकबाकीमध्ये कमालीची घट

By admin | Updated: November 30, 2015 01:08 IST

आॅनलाईनचा परिणाम : परजिल्ह्यात राहणाऱ्या ग्राहकांसाठीही चांगला पर्याय--महाप्रकाश आशेचा- ३

मेहरून नाकाडे --रत्नागिरी  -कोकण परिमंडलात चांगल्या सुविधा येण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी वेळ व पैशांचा अपव्यय टाळण्याकरिता आॅनलाईन सुविधा सुरु करण्यात आली. शिवाय स्वयंचलीत वीजबिल केंद्रदेखील सुरु करण्यात आली. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीमध्ये आता बऱ्यापैकी घट झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती ४३ हजार ७१५, वाणिज्यचे ६ हजार २२४, औद्योगिकचे १४०१, शेतीपंप १३८७, सार्वजनिक पाणीपुरवठा ८९०, अन्य ७६५, पथदिवे २०६ मिळून एकूण ५४ हजार ५८८ ग्राहक आहेत. साधारणत: जिल्ह्यात ६ कोटी १३ लाखांच्या आसपास थकबाकी आहे. महावितरणचे वाढलेले ग्राहक व वीज युनिटचे वाढलेले दर यामुळे थकबाकीची संख्या आकड्यात अधिक असली तरी प्रत्यक्षात थकबाकीदार मात्र कमी झाले आहेत. घरगुती ग्राहकांची ३ कोटी ३२ लाख, वाणिज्यचे १ कोटी १८ लाख, औद्योगिकचे ७१ लाख, शेतीपंपचे ११ लाख २० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे ५४ लाख ४० हजार, अन्य ११ लाख, तर पथदिव्यांची १३ लाख ७१ हजार थकबाकी शिल्लक राहाते. घरगुती ग्राहकांकडील थकबाकी कमी झाली आहे. औद्योगिक व सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांचीच थकबाकी अधिक आहे. थकबाकी कमी करण्यासाठी महावितरणने २०१० साली देयक आॅनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच नेटबँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आदी पर्याय देण्यात आले. सुरुवातीला ३१० इतके ग्राहक या योजनेचा लाभ घेत होते. मात्र, ही संख्या आता वाढली असून, १८ हजार ५२३ इतकी झाली आहे. त्यामुळे सन २0१0मध्ये आॅनलाईनद्वारे महावितरणला ९ लाख २४ हजार ७८० इतका महसूल प्राप्त होत होता. त्यामध्ये आता कमालीची वाढ झाली आहे. सध्या आॅक्टोबर २०१५मध्ये आॅनलाईन वीजबिल भरल्याने महावितरणला २ कोटी ५० लाख ६६ हजार १२५ लाखाचा महसूल प्राप्त झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात घर असूनही नोकरी, व्यवसायानिमित्त परगावी राहणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय महावितरणकडून उपलब्ध करुन देण्यात आल्याने महावितरणच्या महसूलामध्ये भर पडली आहे.बँकेच्या ग्राहकाला आपल्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी एटीएमचा पर्याय दिला. त्याप्रमाणे महावितरणकडून जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी सप्टेंबर २०१२मध्ये नाचणे रोड येथे पहिले एटीपी केंद्र सुरु करण्यात आले. सुरुवातीला या एटीपी केंद्राची कार्यक्षमता मर्यादित ठेवण्यात आली होती. परंतु आता विस्तार वाढविण्यात आला आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, कणकवली, मालवण येथेही एटीपी केंद्रे उभारण्यात आली आहेत. दापोली व खेड येथील एटीपी केंद्र ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी जूनपासून बंद करण्यात आली. परंतु रत्नागिरी, चिपळूण, कणकवली व मालवण येथील एटीपी केंद्रांवर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ती केंदॅ सुरु ओत. सुरुवातीला एटीपी केंद्रावरील ग्राहकांची दररोजची संख्या हजार ते १२०० इतकी मर्यादित होती. या केंद्रांवरील ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आॅक्टोबरमध्ये ३८ हजार ३३७ ग्राहकांनी एटीपी केंद्रावर वीजबिल भरल्यामुळे ५ कोटी ६६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. नोकरदार, व्यावसायिक, सेकंड होम धारक ग्राहक वर्षातून एक-दोनदा गावी येत असत. त्यावेळीच त्यांना थकबाकी भरणे शक्य होत असे. परंतु आता आॅनलाईनमुळे कुठूनही बिल भरणे सोयीचे झाले आहे. शिवाय एटीपीमुळे सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणे शक्य होत आहे. महावितरणच्या ग्राहक संख्येत वाढ होत आहे, तसेच आॅनलाईन, एटीपीमुळे महसुलात वाढ होऊन दिवसेंदिवस थकबाकी कमी होऊ लागली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती ४३ हजार ७१५, वाणिज्यचे ६ हजार २२४ ग्राहक.जिल्ह्यात ६ कोटी १३ लाखांच्या आसपास थकबाकी.आॅनलाईन बिल भरण्याकडे ग्राहकांचा वाढता कल.आॅक्टोबरमध्ये आॅनलाईन वीजबिल भरल्याने महावितरणला २ कोटी ५० लाख ६६ हजार १२५ लाखांचा महसूल प्राप्त.