शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक शिक्षण पद्धतीची कास धरा

By admin | Updated: December 27, 2016 01:02 IST

नारायण राणे : बांदा येथे दहावे ‘नवा विद्यार्थी कुमार साहित्य’ संमेलन

बांदा : कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये तल्लख बुध्दीमत्ता आहे. मात्र, दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने आपले विद्यार्थी मागे पडत आहेत. शिक्षकांनी आजच्या तरुण पिढीला विज्ञान, तंत्रज्ञानाची ओळख करुन देतानाच कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. शालेय जीवनातच प्रगतीचे मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यायचे असल्यास आधुनिक शिक्षणपध्दतीची कास धरा असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी येथे केले.येथील खेमराज मेमोरियल प्रशालेत बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्यावतीने आयोजित १० व्या नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय कायदा मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वासराव मेहंदळे, महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, बांदा शहर अध्यक्ष जावेद खतीब, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, अशोक सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाजकल्याण सभापती अंकुुश जाधव, आत्माराम पालयेकर, संदीप कुडतरकर, संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, कल्पना तोरसकर, प्राध्यापक प्रवीण बांदेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, दिनेश साळगावकर, आनंद शिरवलकर, विनायक दळवी, स्वप्निल नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, शशीकांत पित्रे, भाऊ वळंजू, अ‍ॅड. वसंत भणगे आदी उपस्थित होते. नारायण राणे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रमाकांत खलप यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बांदा शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रास्ताविक आबासाहेब तोरसकर यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी नाईक, एस. व्हि. नाईक यांनी केले. आभार संस्थेचे सचिव एल. डी. सावंत यांनी मानले. (प्रतिनिधी)जगाप्रमाणे आपणही गतिमान व्हायावेळी बोलताना राणे म्हणाले की, कोकणात प्रगतीचे बरेच उद्योग आपण आणलेत. मात्र, कोकणी माणूस हा समाधानावर जगणारा असल्यामुळे कोकणची प्रगती झाली नाही. आज आपण शिक्षण घेताना कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतो आहोत, त्याचा भविष्यात काय उपयोग होईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. विविध क्षेत्रात कोकणी माणूस दिसावा हे आपले स्वप्न आहे. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये तल्लख बुध्दिमत्ता आहे, मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच महत्वाकांक्षा बाळगून त्यादृष्टीने शिक्षण घ्यावे. प्रामाणिकपणे मेहनत करुन त्याला बुध्दिमत्तेची जोड दिल्यास हे शक्य आहे. आपली प्रगती ही ज्ञानातूनच होईल. जसे जग गतिमान झाले, तसे आपणही गतिमान व्हा असे आवाहन राणे यांनी केले.