शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक शिक्षण पद्धतीची कास धरा

By admin | Updated: December 27, 2016 01:02 IST

नारायण राणे : बांदा येथे दहावे ‘नवा विद्यार्थी कुमार साहित्य’ संमेलन

बांदा : कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये तल्लख बुध्दीमत्ता आहे. मात्र, दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने आपले विद्यार्थी मागे पडत आहेत. शिक्षकांनी आजच्या तरुण पिढीला विज्ञान, तंत्रज्ञानाची ओळख करुन देतानाच कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. शालेय जीवनातच प्रगतीचे मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यायचे असल्यास आधुनिक शिक्षणपध्दतीची कास धरा असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी येथे केले.येथील खेमराज मेमोरियल प्रशालेत बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्यावतीने आयोजित १० व्या नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय कायदा मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वासराव मेहंदळे, महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, बांदा शहर अध्यक्ष जावेद खतीब, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, अशोक सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाजकल्याण सभापती अंकुुश जाधव, आत्माराम पालयेकर, संदीप कुडतरकर, संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, कल्पना तोरसकर, प्राध्यापक प्रवीण बांदेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, दिनेश साळगावकर, आनंद शिरवलकर, विनायक दळवी, स्वप्निल नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, शशीकांत पित्रे, भाऊ वळंजू, अ‍ॅड. वसंत भणगे आदी उपस्थित होते. नारायण राणे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रमाकांत खलप यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बांदा शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रास्ताविक आबासाहेब तोरसकर यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी नाईक, एस. व्हि. नाईक यांनी केले. आभार संस्थेचे सचिव एल. डी. सावंत यांनी मानले. (प्रतिनिधी)जगाप्रमाणे आपणही गतिमान व्हायावेळी बोलताना राणे म्हणाले की, कोकणात प्रगतीचे बरेच उद्योग आपण आणलेत. मात्र, कोकणी माणूस हा समाधानावर जगणारा असल्यामुळे कोकणची प्रगती झाली नाही. आज आपण शिक्षण घेताना कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतो आहोत, त्याचा भविष्यात काय उपयोग होईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. विविध क्षेत्रात कोकणी माणूस दिसावा हे आपले स्वप्न आहे. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये तल्लख बुध्दिमत्ता आहे, मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच महत्वाकांक्षा बाळगून त्यादृष्टीने शिक्षण घ्यावे. प्रामाणिकपणे मेहनत करुन त्याला बुध्दिमत्तेची जोड दिल्यास हे शक्य आहे. आपली प्रगती ही ज्ञानातूनच होईल. जसे जग गतिमान झाले, तसे आपणही गतिमान व्हा असे आवाहन राणे यांनी केले.