शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

आधुनिक शिक्षण पद्धतीची कास धरा

By admin | Updated: December 27, 2016 01:02 IST

नारायण राणे : बांदा येथे दहावे ‘नवा विद्यार्थी कुमार साहित्य’ संमेलन

बांदा : कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये तल्लख बुध्दीमत्ता आहे. मात्र, दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने आपले विद्यार्थी मागे पडत आहेत. शिक्षकांनी आजच्या तरुण पिढीला विज्ञान, तंत्रज्ञानाची ओळख करुन देतानाच कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. शालेय जीवनातच प्रगतीचे मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यायचे असल्यास आधुनिक शिक्षणपध्दतीची कास धरा असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी येथे केले.येथील खेमराज मेमोरियल प्रशालेत बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्यावतीने आयोजित १० व्या नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय कायदा मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वासराव मेहंदळे, महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, बांदा शहर अध्यक्ष जावेद खतीब, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, अशोक सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाजकल्याण सभापती अंकुुश जाधव, आत्माराम पालयेकर, संदीप कुडतरकर, संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, कल्पना तोरसकर, प्राध्यापक प्रवीण बांदेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, दिनेश साळगावकर, आनंद शिरवलकर, विनायक दळवी, स्वप्निल नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, शशीकांत पित्रे, भाऊ वळंजू, अ‍ॅड. वसंत भणगे आदी उपस्थित होते. नारायण राणे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रमाकांत खलप यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बांदा शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रास्ताविक आबासाहेब तोरसकर यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी नाईक, एस. व्हि. नाईक यांनी केले. आभार संस्थेचे सचिव एल. डी. सावंत यांनी मानले. (प्रतिनिधी)जगाप्रमाणे आपणही गतिमान व्हायावेळी बोलताना राणे म्हणाले की, कोकणात प्रगतीचे बरेच उद्योग आपण आणलेत. मात्र, कोकणी माणूस हा समाधानावर जगणारा असल्यामुळे कोकणची प्रगती झाली नाही. आज आपण शिक्षण घेताना कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतो आहोत, त्याचा भविष्यात काय उपयोग होईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. विविध क्षेत्रात कोकणी माणूस दिसावा हे आपले स्वप्न आहे. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये तल्लख बुध्दिमत्ता आहे, मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच महत्वाकांक्षा बाळगून त्यादृष्टीने शिक्षण घ्यावे. प्रामाणिकपणे मेहनत करुन त्याला बुध्दिमत्तेची जोड दिल्यास हे शक्य आहे. आपली प्रगती ही ज्ञानातूनच होईल. जसे जग गतिमान झाले, तसे आपणही गतिमान व्हा असे आवाहन राणे यांनी केले.