शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

महावितरणला बसणार ५ कोटींचा फटका

By admin | Updated: March 24, 2016 23:39 IST

पर्ससीन बंदी : बर्फ कारखानेही बंद होण्याच्या मार्गावर

रत्नागिरी : शहरातील पर्ससीन नेट मासेमारीवरील बंदीमुळे जिल्ह्यातील बर्फ कारखानेही बंद होण्याच्या स्थितीत आहेत. या बंदीचे दूरगामी परिणाम होणार असून, महावितरणला सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचा फटका यामुळे बसणार आहे. पर्ससीन नेट बंदीमुळे मच्छीमार रडकुंडीला आले आहेत. महिना उलटला तरी पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावरील बंदी उठवण्याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यवसायासाठी पर्ससीन नेटधारकांवर लाखो रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी बँका, व्यापारी आणि खासगी वित्तीय संस्थांकडूनही कर्जाची उचल केली आहे. बंदी लादल्यानंतर सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप मासेमारी सुरु न झाल्याने खलाशांचा खर्च कसा भागवावा, कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. पर्ससीन नेटधारकांनाही यंदाच्या मोसमामध्ये मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने बँकांचे हप्ते थकले आहेत. ते भरण्यासाठी बँकांनी तगादा लावला आहे. त्यामुळे मच्छीमारांना डोक्यावर कर्जाचं ओझं घेऊन जगणे मुश्किल झाले आहे. मासेमारीवर अनेक जोडधंदे व अन्य व्यावसायिक अवलंंबून आहेत. मासे टिकवण्यासाठी महत्वाचा घटक ठरणाऱ्या बर्फ कारखान्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न या बंदीमुळे निर्माण झाला आहे. पर्ससीन नेटने मासेमारी करणाऱ्या नौका आणि मच्छी व्यावसायिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बर्फ कारखान्यातून बर्फाची उचल करण्यात येत होती. रत्नागिरी परिसरामध्ये सुमारे २५ बर्फ कारखाने आहेत. या कारखान्यांमधून हजारो टन बर्फाची उचल होेत होती. या बर्फ कारखान्यांमधून महावितरणला महिन्याला ५० लाख रुपयांचे बिल मिळते. त्यामुळे वर्षाला कारखान्यांमधून बिलापोटी महावितरणला ५ कोटी रुपये मिळतात. त्यामुळे अनेक व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. (शहर वार्ताहर)1उद्योग धोक्यात : विजेचे बिल भरणे न परवडण्यासारखेबर्फ कारखाने बंद झाल्यास महावितरणला वर्षाकाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. पर्ससीन नेटवरील बंदीचे दूरगामी परिणाम दिसू लागले आहेत. बर्फ कारखाने बंद पडल्यास महावितरणचे मोठे नुकसान होणार आहे. मच्छीमारी मंदावल्याने बर्फ कारखाने धोक्यात आले आहेत.2सध्या पर्ससीन नेटने मासेमारीला बंदी असल्याचे बर्फाची उचल अत्यल्प झाली आहे. त्यामुळे या कारखान्यांना विजेचे बिल भरणे न परवडणारे आहे. पर्ससीन नेटवरील बंदीमुळे बर्फ कारखान्यांचा धंदा मंदावला असून, ते बंद होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे हा व्यवसायही धोक्यात आला आहे.उद्योग संकटातबर्फ कारखान्याला जास्त वीज लागते, त्यामानाने बर्फाला मागणी खूपच कमी होणार आहे. त्यामुळे हे कारखाने सुरु ठेवणेही उद्योजकांच्या आवाक्यापलिकडे जाणार असून, त्यामुळे हा उद्योग संकटात सापडला आहे.