शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

‘महालक्ष्मी इन्फ्रा’च्या कार्यालयाला टाळे

By admin | Updated: August 29, 2016 00:40 IST

नीतेश राणे : अरुणा प्रकल्पस्थळी बैठक; प्रकल्पग्रस्तांचा मोबदला, पुनर्वसन रखडले

वैभववाडी : अरुणा प्रकल्पाचे काम ७० टक्के झाले तरी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पत्ताच नाही. त्यामुळे नव्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला आणि पुनर्वसनाचे काम ७० टक्के पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रकल्पस्थळी पानही हलणार नाही, असा इशारा देत आमदार नीतेश राणे यांनी अरुणा प्रकल्पाचा मक्तेदार ‘महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्ट’च्या कार्यालयाला शनिवारी रात्री टाळे ठोकले. हेत-आखवणे दरम्यान सुरु असलेल्या अरुणा पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांची प्रकल्पस्थळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सकपाळ, उपअभियंता एस. व्ही. राठोड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, सभापती शुभांगी पवार, जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम पवार, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, वैशाली रावराणे, उपनगराध्यक्ष संजय चव्हाण, अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष रंगनाथ नागप, सचिव डॉ. जगन्नाथ जामदार आदी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्यावतीने भूमिका मांडण्यासाठी उठलेले संघर्ष कृती समितीचे सचिव डॉ. जामदार यांना खाली बसवून आमदार राणे यांनी प्रकल्पाचे अधिकारी व भूसंपादनचे कर्मचारी तसेच ‘महालक्ष्मी इन्फ्रा’च्या प्रतिनिधींना फैलावर घेतले. धरणाचे काम ७० टक्के झाले. मात्र, प्रकल्पग्रस्तांना मोबदला, पुनर्वसनाचे काम त्या प्रमाणात का होऊ शकले नाही? अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे, असा आरोप आमदार राणे यांनी केला.यावेळी आखवणेतील १६२ कुटुंबांनी हेत गावात पुनर्वसनाची मागणी केली होती. मात्र, ती मागणी फेटाळून त्यांचे पुनर्वसन मांगवली गावठाणात करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मांगवली गावठाणानजीक मोठे डोंगर असल्याने ‘माळीण’सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करुन प्रकल्पग्रस्तांच्या इच्छेनुसार पुनर्वसन करण्याची सूचना आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यावेळी नव्या भूसंपादन कायद्यानुसार प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याचा प्रस्ताव पुढील चार-पाच दिवसात पाठविला जाईल, असे भूसंपादनच्या कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. धरणाच्या तुलनेत पुनर्वसनाचे काम मागे पडल्याने आमदार राणे यांनी भूसंपादन, पुनर्वसन खात्यांबरोबरच मक्तेदार ‘महालक्ष्मी इन्फ्रा’ला जबाबदार धरले. त्यामुळे पुनर्वसनाचे काम धरणाइतके होत नाही. तोपर्यंत प्रकल्पस्थळी पानही हलणार नाही. अगदी मक्तेदाराचे कार्यालयीन कामकाजही बंद राहील, असा इशारा देत आमदार नीतेश राणे यांनी ‘महालक्ष्मी इन्फ्रा’च्या कार्यालयाला टाळे ठोकले. अधिकाऱ्यांची बैठकीकडे पाठ प्रकल्पग्रस्ताच्या बैठकीला पुनर्वसन, भूसंपादन अधिकारी हजर राहणे आवश्यक असताना कर्मचारी प्रतिनिधी पाठवून दोन्ही अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, भूसंपादनासंबंधीचे मुद्दे अनुत्तरीत राहिले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोबदला व पुनर्वसन रखडले असताना आमदार नीतेश राणे यांनी ‘महालक्ष्मी इन्फ्रा’ च्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यामुळे यातून नेमके कधी आणि काय निष्पन्न होणार? याची प्रकल्पग्रस्तांना उत्सुकता आहे.