शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

माफियांनी उखडले किनारे

By admin | Updated: March 9, 2015 23:55 IST

नागरिकांत संताप : शेकडो टन वाळूचे होतेय उत्खनन...

रत्नागिरी : पर्यटनवृध्दिसाठी जिल्ह्यातील ज्या सागरी किनाऱ्यांकडे पाहिले जात आहे, ते किनारेच वाळूमाफियांकडून उखडले जात आहेत. दिवसाढवळ्या रत्नागिरीतील विविध किनाऱ्यांवरील शेकडो टन पांढरी वाळू (सिलिका) वाळूमाफियांकडून उत्खनन करून चोरली जात आहे. रत्नागिरीतील पांढरा समुद्र, काळबादेवी, आरे-वारे, ढोकमळे याठिकाणची वाळू राजरोसपणे काढली जात असून, महसूल विभाग मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष का करत आहे? सागरी किनाऱ्यावरील वाळूउपसा करण्याचे परवाने देण्यात आले आहेत काय? असे संतप्त सवाल आता नागरिकांतून विचारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नद्यांमधील वाळू उपसा करण्यावर शासनाचे निर्बंध आल्यानंतर वाळूमाफियांनी आता किनाऱ्याकडे मोर्चा वळविला आहे. तालुक्यात किनारपट्टीवर अनेक ठिकाणी शेकडो टन वाळूचे साठे करण्यात आले आहेत. दररोज हे सागरी किनारे वाळू उत्खननाच्या नावाखाली उखडले जात आहेत. त्यामुळे सागरी लाटांमुळे धूप होण्याऐवजी वाळू उत्खननामुळे सागराच्या शेजारील वस्तींना धोका निर्माण होणार आहे. रत्नागिरीजवळील पांढरा समुद्र येथे दररोज शेकडो टन वाळू काढली जात असून, वाहने व बैलगाड्यांद्वारे ही वाळू वाहून नेली जात आहे. त्यामुळे ज्याठिकाणी काही समाजसेवी संस्थांनी स्वच्छतेचा नारा देणारे फलक लावले आहेत, त्या भागातच खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मिरकरवाडा बंदरातील गाळ म्हणून काढलेली वाळूही चोरीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे हा ढिगाराही सर्वत्र पोखरलेला असून, त्यातील शेकडो टन वाळूची चोरी झाली आहे. बेकायदा उपसा केलेली किनाऱ्यावरील वाळू वाहनांबरोबरच बैलगाड्यांमधूनही वाहून नेली जात आहे. काळबादेवी येथील किनाऱ्यावर बैलगाड्यांचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे. रोज येथे दहा बैलगाड्या वाळू वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या दिवसाला ६० ते ७० फेऱ्या होतात. बैलगाड्यांमधील वाळू ५०० रुपयांना विकली जात आहे. कोकणच्या किनाऱ्यांचा ऱ्हास केला जात आहे. (प्रतिनिधी)गॉडफादर कोण?किनाऱ्यावरील वाळू उपसा सुरू असताना काहीजणांनी त्याबाबत महसूलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. परंतु तक्रार केल्यानंतर महसूलचे अधिकारी कधीच त्या ठिकाणी तातडीने पोहोचत नाहीत, अशी ग्रामस्थांचीच तक्रार आहे. याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांचे गॉडफादर आहेत तरी कोण, असा सवाल केला जात आहे.