शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

माफियांनी उखडले किनारे

By admin | Updated: March 9, 2015 23:55 IST

नागरिकांत संताप : शेकडो टन वाळूचे होतेय उत्खनन...

रत्नागिरी : पर्यटनवृध्दिसाठी जिल्ह्यातील ज्या सागरी किनाऱ्यांकडे पाहिले जात आहे, ते किनारेच वाळूमाफियांकडून उखडले जात आहेत. दिवसाढवळ्या रत्नागिरीतील विविध किनाऱ्यांवरील शेकडो टन पांढरी वाळू (सिलिका) वाळूमाफियांकडून उत्खनन करून चोरली जात आहे. रत्नागिरीतील पांढरा समुद्र, काळबादेवी, आरे-वारे, ढोकमळे याठिकाणची वाळू राजरोसपणे काढली जात असून, महसूल विभाग मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष का करत आहे? सागरी किनाऱ्यावरील वाळूउपसा करण्याचे परवाने देण्यात आले आहेत काय? असे संतप्त सवाल आता नागरिकांतून विचारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नद्यांमधील वाळू उपसा करण्यावर शासनाचे निर्बंध आल्यानंतर वाळूमाफियांनी आता किनाऱ्याकडे मोर्चा वळविला आहे. तालुक्यात किनारपट्टीवर अनेक ठिकाणी शेकडो टन वाळूचे साठे करण्यात आले आहेत. दररोज हे सागरी किनारे वाळू उत्खननाच्या नावाखाली उखडले जात आहेत. त्यामुळे सागरी लाटांमुळे धूप होण्याऐवजी वाळू उत्खननामुळे सागराच्या शेजारील वस्तींना धोका निर्माण होणार आहे. रत्नागिरीजवळील पांढरा समुद्र येथे दररोज शेकडो टन वाळू काढली जात असून, वाहने व बैलगाड्यांद्वारे ही वाळू वाहून नेली जात आहे. त्यामुळे ज्याठिकाणी काही समाजसेवी संस्थांनी स्वच्छतेचा नारा देणारे फलक लावले आहेत, त्या भागातच खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मिरकरवाडा बंदरातील गाळ म्हणून काढलेली वाळूही चोरीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे हा ढिगाराही सर्वत्र पोखरलेला असून, त्यातील शेकडो टन वाळूची चोरी झाली आहे. बेकायदा उपसा केलेली किनाऱ्यावरील वाळू वाहनांबरोबरच बैलगाड्यांमधूनही वाहून नेली जात आहे. काळबादेवी येथील किनाऱ्यावर बैलगाड्यांचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे. रोज येथे दहा बैलगाड्या वाळू वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या दिवसाला ६० ते ७० फेऱ्या होतात. बैलगाड्यांमधील वाळू ५०० रुपयांना विकली जात आहे. कोकणच्या किनाऱ्यांचा ऱ्हास केला जात आहे. (प्रतिनिधी)गॉडफादर कोण?किनाऱ्यावरील वाळू उपसा सुरू असताना काहीजणांनी त्याबाबत महसूलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. परंतु तक्रार केल्यानंतर महसूलचे अधिकारी कधीच त्या ठिकाणी तातडीने पोहोचत नाहीत, अशी ग्रामस्थांचीच तक्रार आहे. याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांचे गॉडफादर आहेत तरी कोण, असा सवाल केला जात आहे.