शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मडुरा गावाला मगरींची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : तेरेखोल नदीकाठी वसलेल्या मडुरा गावात दिवसेंदिवस मगरींची दहशत वाढतच आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर सुकळवाड येथील शेतात आहे. या विहिरीच्या बाजूला मगरींचे वास्तव्य असलेली नदी वाहत असल्यामुळे गेले तीन दिवस गावातील पाच वाड्यांचा पाणीपुरवठा खंडित आहे. ग्रामपंचायत नळकामगार मगरींच्या धास्तीने पाणी सोडण्यासाठी एकटा जाण्यास घाबरत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : तेरेखोल नदीकाठी वसलेल्या मडुरा गावात दिवसेंदिवस मगरींची दहशत वाढतच आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर सुकळवाड येथील शेतात आहे. या विहिरीच्या बाजूला मगरींचे वास्तव्य असलेली नदी वाहत असल्यामुळे गेले तीन दिवस गावातील पाच वाड्यांचा पाणीपुरवठा खंडित आहे. ग्रामपंचायत नळकामगार मगरींच्या धास्तीने पाणी सोडण्यासाठी एकटा जाण्यास घाबरत आहे. याकडे ग्रामपंचायत तसेच वनविभागाने लक्ष देऊन गावात मगरींची असलेली दहशत दूर करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.मडुरा-सुकळवाड येथे शनिवारी सकाळी एक सुमारे बाराफुटी मगर व तीन म्हशींमध्ये सुरू असलेले थरारनाट्य पाणी सोडण्यासाठी गेलेल्या नळकामगार बाबली परब यांनी अनुभवले. अचानक गुरांची झालेली धावपळ पाहून त्यांना जवळपास मगर असल्याचा संशय आला. ‘त्या’ मगरीच्या हल्ल्यात तीन म्हशी जखमी झाल्या होत्या. अशा जीवघेण्या परिसरात गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे.देऊळवाडी, रेडकरवाडी, बाबरवाडी, चौकेकरवाडी, डिगवाडीमध्ये गेले तीन दिवस पाणीपुरवठा खंडित होता. त्यामुळे गावातील महिलांची मोठी पंचाईत झाल्याने त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यासोबतच गावात सुरू असलेले मगरींचे हल्ले पाहून ग्रामस्थ तसेच महिलांनी कोणत्याही प्रकारचा आक्रमक पवित्रा न घेता नळकामगारास सहकार्य केले. मात्र यावेळी वनविभागावर ताशेरे ओढण्यात आले.वनविभाग मगरींसंदर्भात कोणत्याही हालचाली करत नसून हल्ल्याबरोबरच आता आम्हांला पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळणे कठीण झाले असल्याचे काही महिलांनी बोलून दाखविले. याकडे वनविभाग व ग्रामपंचायत यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.दुसºयांसाठी आपला जीव धोक्यातआपला जीव धोक्यात घालून सुकळवाड येथील शेतात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवर पाणी सोडण्यासाठी जावे लागत आहे. प्रत्येक दिवशी एकतरी सोबती घेऊनच याठिकाणी येणे गरजेचे आहे. दबा धरून बसलेल्या मगरी कधी फस्त करतील याचे काही सांगता येत नाही. गेले तीन दिवस विजेच्या समस्या तसेच महत्त्वाचे म्हणजे मगरींच्या दहशतीमुळे पाणी सोडण्यास अडचण येत असल्याचे मडुरा ग्रामपंचायत नळकामगार बाबली परब यांनी सांगितले.