शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

मडुरा गावाला मगरींची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : तेरेखोल नदीकाठी वसलेल्या मडुरा गावात दिवसेंदिवस मगरींची दहशत वाढतच आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर सुकळवाड येथील शेतात आहे. या विहिरीच्या बाजूला मगरींचे वास्तव्य असलेली नदी वाहत असल्यामुळे गेले तीन दिवस गावातील पाच वाड्यांचा पाणीपुरवठा खंडित आहे. ग्रामपंचायत नळकामगार मगरींच्या धास्तीने पाणी सोडण्यासाठी एकटा जाण्यास घाबरत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : तेरेखोल नदीकाठी वसलेल्या मडुरा गावात दिवसेंदिवस मगरींची दहशत वाढतच आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर सुकळवाड येथील शेतात आहे. या विहिरीच्या बाजूला मगरींचे वास्तव्य असलेली नदी वाहत असल्यामुळे गेले तीन दिवस गावातील पाच वाड्यांचा पाणीपुरवठा खंडित आहे. ग्रामपंचायत नळकामगार मगरींच्या धास्तीने पाणी सोडण्यासाठी एकटा जाण्यास घाबरत आहे. याकडे ग्रामपंचायत तसेच वनविभागाने लक्ष देऊन गावात मगरींची असलेली दहशत दूर करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.मडुरा-सुकळवाड येथे शनिवारी सकाळी एक सुमारे बाराफुटी मगर व तीन म्हशींमध्ये सुरू असलेले थरारनाट्य पाणी सोडण्यासाठी गेलेल्या नळकामगार बाबली परब यांनी अनुभवले. अचानक गुरांची झालेली धावपळ पाहून त्यांना जवळपास मगर असल्याचा संशय आला. ‘त्या’ मगरीच्या हल्ल्यात तीन म्हशी जखमी झाल्या होत्या. अशा जीवघेण्या परिसरात गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे.देऊळवाडी, रेडकरवाडी, बाबरवाडी, चौकेकरवाडी, डिगवाडीमध्ये गेले तीन दिवस पाणीपुरवठा खंडित होता. त्यामुळे गावातील महिलांची मोठी पंचाईत झाल्याने त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यासोबतच गावात सुरू असलेले मगरींचे हल्ले पाहून ग्रामस्थ तसेच महिलांनी कोणत्याही प्रकारचा आक्रमक पवित्रा न घेता नळकामगारास सहकार्य केले. मात्र यावेळी वनविभागावर ताशेरे ओढण्यात आले.वनविभाग मगरींसंदर्भात कोणत्याही हालचाली करत नसून हल्ल्याबरोबरच आता आम्हांला पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळणे कठीण झाले असल्याचे काही महिलांनी बोलून दाखविले. याकडे वनविभाग व ग्रामपंचायत यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.दुसºयांसाठी आपला जीव धोक्यातआपला जीव धोक्यात घालून सुकळवाड येथील शेतात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवर पाणी सोडण्यासाठी जावे लागत आहे. प्रत्येक दिवशी एकतरी सोबती घेऊनच याठिकाणी येणे गरजेचे आहे. दबा धरून बसलेल्या मगरी कधी फस्त करतील याचे काही सांगता येत नाही. गेले तीन दिवस विजेच्या समस्या तसेच महत्त्वाचे म्हणजे मगरींच्या दहशतीमुळे पाणी सोडण्यास अडचण येत असल्याचे मडुरा ग्रामपंचायत नळकामगार बाबली परब यांनी सांगितले.