शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... तरीही काहींचं थोडं वेगळं असतं!--वॅलेंटाईन डे स्पेशल

By admin | Updated: February 13, 2015 22:55 IST

भाड्याच्या खोलीत का असेना, परंतु संसार सुखाचा सुरू होता. पण, तेवढ्यात घात झाला. रत्नागिरीचे तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष जैतपाल यांचा अपघाती मृत्यू झाला,

रत्नागिरी : मणभर पोकळ शब्दांपेक्षा कणभर कृतीही दिलासा देते, हे गणित प्रेमात अधिक जिवंतपणा आणतं. ‘त्या’ दोघांचंही तसंच झालं, एका अपघातानं ‘त्या’ कर्त्या पुरूषाला अधू केलं, पण ‘ती’ धीरानं उभी राहिली, तिनं पतीलाच नाही तर पती, मुलं आणि एकूणच संसाराला आधार दिला, ‘तो’ आणि ‘ती’ यांची ही कहाणी तशी अनोखीच. प्रेमाचा झरा विवाहानंतर आटून जाण्याच्या कथा घडताना संसार उभी करणारी ‘ती’ आणि तिच्या या धडपडीचं कौतुक असलेला ‘तो’ थोडेसे दुर्मीळच...!आरती विनायक बापट! रत्नागिरीच्या शेरेनाका येथे राहणाऱ्या! जयगड परिसरातील नामांकित बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स विनायक बापट यांच्या पत्नी! दोन ते पाच वर्षांची दोन मुलं गाठीला होती. भाड्याच्या खोलीत का असेना, परंतु संसार सुखाचा सुरू होता. पण, तेवढ्यात घात झाला. रत्नागिरीचे तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष जैतपाल यांचा अपघाती मृत्यू झाला, त्यांच्या गाडीत विनायक बापट होते. त्या अपघाताने जैतपाल यांना हिरावून नेले आणि बापट यांना गंभीर जखमी केले.आरती यांना गंभीर अपघाताची माहिती मिळाली आणि त्या कोसळल्याच! बापट यांच्या डोक्याला एवढी इजा झाली होती की, डोक्याची कवटीही दिसत होती. त्यांना तत्काळ कोल्हापूरला दाखल करण्यात आले. जीवन-मरणाच्या रेषेवरच बापट उभे होते. आपल्या पतीला मृत्यूशय्येवर बघून त्या कोसळल्याच. त्या काळात विनायक बापट यांचे काका श्रीकांत बापट व अन्य नातेवाईक यांनी आरती यांना धीर दिला. नुसता मानसिक आधारच नाही; तर आर्थिक भारही पेलला. कोल्हापूरच्या किरण धर्माधिकारी यांनी ६ महिने त्यांचा ब्लॉक राहण्यासाठी बापट यांना दिला. बापट यांची परिस्थिती नाजूकच होती. शेवटी सासर-माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या धीराने त्या उठल्या. पदराआड रडू आवरणारी बाई नाही तर ‘सावित्री’ बनायचं ठरवलं आणि मन घट्ट करून पतीची सेवा करण्याबरोबरच संसाराची जबाबदारीही पेलली.आपल्या पत्नीनं हॉस्पिटलमध्ये मला उचलून घेण्याचीही जबाबदारी पार पाडली असल्याचे विनायक बापट सांगतात. यथावकाश बापट बरे झाले, जीवाला असलेला धोका टळला. आंघोळ घालण्यापासून ते अगदी अन्य कामेही आरती यांनीच मन लावून केली. पती अन् संसारात जीव अडकलेल्या आरती यांनी मन खंबीर करून स्वत:ला समजावलं. आपल्या विश्वाशी फारकत घ्यायची नाही, असं ठरवलं. त्याचदरम्यान, त्यांच्या एका मैत्रिणीनं त्यांना सहज विचारलं की, टू व्हिलर शिकवाल का? त्यांनी ‘हो’ म्हटलं. त्या मैत्रिणीला त्यांनी मनापासून शिकवलं आणि त्यांच्या मैत्रिणीनं केलेली ‘माऊथ पब्लिसिटी’ आज एवढी झाली आहे की, कोणत्याही महिलेला टू व्हिलर शिकायचं असेल तर आरती बापटच! दिवसभर बिझी राहणाऱ्या आरती यांच्या आयुष्यात असा काही दैवी प्रसंग आला असेल, असं क्षणभरही वाटत नाही. सर्वस्व गमावण्याची वेळ आलेल्या आरती यांनी पुढे होऊन संसार सावरला अन् वाढवला. मृत्यूशी भांडून आलेल्या त्यांच्या पतीसह त्यांचा सुखाचा संसार आता सुरू झाला आहे.बापट यांना अपघात झाला, त्यावेळी त्यांची मुलं ३ ते ५ वर्षे वयोगटातील होती. आज ती खूप मोठी झाली आहेत. एक मुलगा बीएस्सी तर एक अकरावीत आहे. भाड्याने राहणाऱ्या बापट कुटुंबीयांच्या नावे आता स्वत:चा असा ‘पत्ता’ आहे.बापट दांपत्याच्या प्रेमाचा उत्सव हा एका दिवसाचा नाही. कथा-कादंबरीत सांगतात तसा सात जन्मांचा असावा! (प्रतिनिधी)आयुष्य म्हटले की, देव आणि दैवाचा खेळ हा सुरूच असतो. पण, कोणत्याही स्त्रीने खचून न जाता सावरले पाहिजे. संकट आले की, त्याला सामोरे जायचं बळही आपल्याला देवाने दिलेले असते. मीही हेच केलं. आपले दोन डोळे परस्परांना भेटत नाहीत. पण, एका डोळ्यात अश्रू उभे राहिले की दुसऱ्या डोळ्याला रडल्यावाचून राहावत नाही. पती-पत्नीचं नातं हे असं अभंग असावं आणि प्रेमाचा उत्सव हा आयुष्यभराचा असावा.- आरती बापट, रत्नागिरीमला आरतीसारखी पत्नी मिळाली, हे खरोखरच माझे भाग्य आहे. तिच्यामुळेच मी मृत्यूला हरवून परत आलो. माझ्या अपघातानंतर आरतीनं माझी मनापासून सेवा केली. मला छोट्या मुलासारखं सांभाळलं. सहा महिने मी बेशुध्द होतो, त्या काळातच नव्हे; तर त्यानंतरही तीन-चार वर्षे आंघोळ घालण्यापासून ते अगदी जेवण भरवण्यापर्यंत सारी कामे तीच करायची. मला तिचा खूप अभिमान आहे.- विनायक बापट, रत्नागिरीइच्छाशक्तीनं त्यांना जगवलं अन् पत्नीनं सावरलं...!बापट यांचा सुखाचा संसार सुरू.कोल्हापूरच्या किरण धर्माधिकारी यांनी सहा महिने त्यांचा ब्लॉक बापट यांना राहण्यासाठी दिला.भाड्याने राहणाऱ्या बापट कुटुंबीयांची आता स्वत:ची वेगळी ओळख.कोणत्याही महिलेला टू व्हिलर शिकायची असेल तर आरती बापटच!