शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

निसर्गातील बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: December 4, 2014 00:54 IST

कुडाळ तालुक्यातील स्थिती : प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामेही नाहीत

कुडाळ : अवेळी पडणारा पाऊस व निसर्गातील बदललेल्या वातावरणामुळे यावर्षी कुडाळ तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातशेतीचे सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामेही झालेले नाहीत. त्यातच भात खरेदीचे दरही शासनाने कमी केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांनी केली आहे. याबाबत कुडाळ तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाऊस, बदलते वातावरण यामुळे आंबा, काजू, बागायतदारांनासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसला आहे. कलम बागेतील झाडांना मोहोर येण्याच्या वेळेलाच वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली आहे. येथील शेतकरी व बागायतदार देशोधडीला लागण्याची वेळ येऊन ठेपली असतानाही शासन स्तरातून या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जात नाही. कोकणातील शेतकरी, बागायतदार बदलत्या वातावरणाचा कसा सामना करतात, याबाबतची परिस्थिती सर्वज्ञात आहे. ही बाब शासन दरबारी पाठवून पाठपुरावा करावा, अशी मागणी बेळणेकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)