शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गातील बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: December 4, 2014 00:54 IST

कुडाळ तालुक्यातील स्थिती : प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामेही नाहीत

कुडाळ : अवेळी पडणारा पाऊस व निसर्गातील बदललेल्या वातावरणामुळे यावर्षी कुडाळ तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातशेतीचे सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचे पंचनामेही झालेले नाहीत. त्यातच भात खरेदीचे दरही शासनाने कमी केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांनी केली आहे. याबाबत कुडाळ तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाऊस, बदलते वातावरण यामुळे आंबा, काजू, बागायतदारांनासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसला आहे. कलम बागेतील झाडांना मोहोर येण्याच्या वेळेलाच वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली आहे. येथील शेतकरी व बागायतदार देशोधडीला लागण्याची वेळ येऊन ठेपली असतानाही शासन स्तरातून या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जात नाही. कोकणातील शेतकरी, बागायतदार बदलत्या वातावरणाचा कसा सामना करतात, याबाबतची परिस्थिती सर्वज्ञात आहे. ही बाब शासन दरबारी पाठवून पाठपुरावा करावा, अशी मागणी बेळणेकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)