शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्यावरील’ कारवाईकडे लक्ष

By admin | Updated: December 9, 2014 23:19 IST

बंधाऱ्यांचे उद्दिष्ट : कृषी विभाग, सामाजिक वनीकरणचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने आतापर्यंत ६ हजार ७०० बंधाऱ्यांपैकी २४९६ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी विभाग व सामाजिक वनीकरण या दोन विभागांना त्यातीलच १७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून त्यांनी अद्यापपर्यंत एकही बंधारा पूर्ण केला नसल्याची बाब प्रशासनाच्या अहवालातून उघड झाली आहे. त्यामुळे या दोन विभागांवर प्रशासन कोणती कारवाई करते यावर लक्ष लागून राहिले आहे.साधारणत: मे अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भासण्यास सुरूवात होते. त्यातच यावर्षी पाऊसही कमी झाल्याने व भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्याने यावर्षीही मे अखेर पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षीही कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे ठरविले. त्यानुसार ६७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्टही प्रत्येक तालुक्यात विभागून दिले. आठ तालुक्यांना ५ हजाराचे टार्गेट तर राज्य शासनाच्या कृषी विभाग १५०० व सामाजिक वनीकरण विभागाला २०० असे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले. मात्र, तालुक्यातून ५ हजार बंधाऱ्यापैकी जवळजवळ ५० टक्के काम पूर्ण झाले असून २४९६ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. हे काम समाधानकारक आहे. मात्र, राज्य कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभाग या दोघांनी अद्यापही भोपळा फोडलेला नाही, अशी माहिती प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाली आहे. (प्रतिनिधी)लघुपाटबंधारे विभागाकडून पत्रकृषी व सामाजिक वनीकरण विभागाने अद्याप एकही बंधारा न घातल्याने लघुपाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून लक्ष वेधण्यात येणार आहे, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.कृषी विभाग निद्रीस्तचया ना त्या कारणाने नेहमीच टार्गेटवर असणारा राज्य शासनाचा कृषी विभाग बंधाऱ्याच्या बाबतीतही उदासीनच दिसून येत आहे. बंधाऱ्याच्या बाबतीत अद्यापही खाते न उघडल्याने ‘गोत्यात’ येणार आहे.प्रशासन कारवाई करणार?अद्यापही कृषी व सामाजिक वनीकरण विभागांनी कच्चे व वनराई बंधारे न बांधल्याने या विभागावर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन विभागांना हे बंधाऱ्यांचे उद्दिष्ट दिले होते. गतवर्षीही या दोन्ही विभागाकडून उदासीनताच दाखविण्यात आली होती. गतवर्षी कृषी विभागाने १५०० बंधाऱ्यांपैकी ४२१ तर सामाजिक वनीकरणने २०० पैकी ८४ बंधारे बांधले होते.तालुकाउद्दिष्टकच्चेवनराईएकूणटक्केवारीबंधारेबंधारेकणकवली८५०३२११९९५२०६१.१८कुडाळ८५०१६५१५४३१९३९.८८दोडामार्ग३००१५५५७०२३.३३वेंगुर्ला४००७०१७८२४४६२.००मालवण८००२३३६४२९७३७.१३देवगड७००६४१५८२२२३१.७१सावंतवाडी८५०४२६२५६६७७८.४७वैभववाडी३००७५७८१५३५१.००एकूण५०००९८५१५११२४९६४९.९२राज्य कृषी व सामाजिक वनीकरण विभागविभागउद्दिष्टसाध्यराज्यशासन कृषी १५०० ०सामाजिक वनीकरण२०० ०