शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

‘त्यांच्यावरील’ कारवाईकडे लक्ष

By admin | Updated: December 9, 2014 23:19 IST

बंधाऱ्यांचे उद्दिष्ट : कृषी विभाग, सामाजिक वनीकरणचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने आतापर्यंत ६ हजार ७०० बंधाऱ्यांपैकी २४९६ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी विभाग व सामाजिक वनीकरण या दोन विभागांना त्यातीलच १७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून त्यांनी अद्यापपर्यंत एकही बंधारा पूर्ण केला नसल्याची बाब प्रशासनाच्या अहवालातून उघड झाली आहे. त्यामुळे या दोन विभागांवर प्रशासन कोणती कारवाई करते यावर लक्ष लागून राहिले आहे.साधारणत: मे अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भासण्यास सुरूवात होते. त्यातच यावर्षी पाऊसही कमी झाल्याने व भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्याने यावर्षीही मे अखेर पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षीही कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे ठरविले. त्यानुसार ६७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्टही प्रत्येक तालुक्यात विभागून दिले. आठ तालुक्यांना ५ हजाराचे टार्गेट तर राज्य शासनाच्या कृषी विभाग १५०० व सामाजिक वनीकरण विभागाला २०० असे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले. मात्र, तालुक्यातून ५ हजार बंधाऱ्यापैकी जवळजवळ ५० टक्के काम पूर्ण झाले असून २४९६ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. हे काम समाधानकारक आहे. मात्र, राज्य कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभाग या दोघांनी अद्यापही भोपळा फोडलेला नाही, अशी माहिती प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाली आहे. (प्रतिनिधी)लघुपाटबंधारे विभागाकडून पत्रकृषी व सामाजिक वनीकरण विभागाने अद्याप एकही बंधारा न घातल्याने लघुपाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून लक्ष वेधण्यात येणार आहे, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.कृषी विभाग निद्रीस्तचया ना त्या कारणाने नेहमीच टार्गेटवर असणारा राज्य शासनाचा कृषी विभाग बंधाऱ्याच्या बाबतीतही उदासीनच दिसून येत आहे. बंधाऱ्याच्या बाबतीत अद्यापही खाते न उघडल्याने ‘गोत्यात’ येणार आहे.प्रशासन कारवाई करणार?अद्यापही कृषी व सामाजिक वनीकरण विभागांनी कच्चे व वनराई बंधारे न बांधल्याने या विभागावर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन विभागांना हे बंधाऱ्यांचे उद्दिष्ट दिले होते. गतवर्षीही या दोन्ही विभागाकडून उदासीनताच दाखविण्यात आली होती. गतवर्षी कृषी विभागाने १५०० बंधाऱ्यांपैकी ४२१ तर सामाजिक वनीकरणने २०० पैकी ८४ बंधारे बांधले होते.तालुकाउद्दिष्टकच्चेवनराईएकूणटक्केवारीबंधारेबंधारेकणकवली८५०३२११९९५२०६१.१८कुडाळ८५०१६५१५४३१९३९.८८दोडामार्ग३००१५५५७०२३.३३वेंगुर्ला४००७०१७८२४४६२.००मालवण८००२३३६४२९७३७.१३देवगड७००६४१५८२२२३१.७१सावंतवाडी८५०४२६२५६६७७८.४७वैभववाडी३००७५७८१५३५१.००एकूण५०००९८५१५११२४९६४९.९२राज्य कृषी व सामाजिक वनीकरण विभागविभागउद्दिष्टसाध्यराज्यशासन कृषी १५०० ०सामाजिक वनीकरण२०० ०