शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

corona virus in shindhudurg - दीर्घ सुटीमुळे चाकरमान्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 16:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत सुटी असल्याने कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबई, पुणे आदी भागातून व्यक्तींचे गावी येणे वाढले आहे. तर परजिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींवर शनिवारपासून आंबोली आरोग्य केंद्राकडून होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदीर्घ सुटीमुळे चाकरमान्यांची संख्या वाढलीग्रामस्थांनी सहकार्य करावे : महेश जाधव

आंबोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत सुटी असल्याने कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबई, पुणे आदी भागातून व्यक्तींचे गावी येणे वाढले आहे. तर परजिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींवर शनिवारपासून आंबोली आरोग्य केंद्राकडून होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

होम क्वारंटाईन लावलेल्या व्यक्तींनी ३१ मार्चपर्यंत घरातून बाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. महेश जाधव यांनी दिली.आंबोली, चौकुळ व गेळे परिसरातील व्यक्ती पुणे व मुंबई येथून दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ साधा ताप व सर्दीलाही तपासणीसाठी आरोग्य केंद्रात धाव घेत आहेत. मात्र, आंबोली आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी आहेत. तर आंबोली आरोग्य केंद्रांतर्गत अनेक गावे असून अद्याप प्रत्येक ठिकाणी आरोग्य कर्मचारी जनजागृती तसेच सर्व्हेला पोहोचलेले नाहीत.

आंबोलीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी येथील आरोग्य केंद्रात अनुभवी एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाहीत. तपासणीसाठी लॅबही नसल्याने अनेक गैरसोयी भविष्यात होऊ शकतात. त्यामुळे आंबोली परिसराचे महत्त्व ओळखून येथे कोरोना साथ असेपर्यंत अनुभवी व जबाबदार एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.मुंबई, पुणे व आदी परिसरातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर स्टॅम्प दिसल्यास तत्काळ आंबोली ग्रामपंचायत किंवा आरोग्य केंद्रात माहिती द्यावी. तसेच गावातील व्यक्तींशी थेट संपर्क टाळावा, असे आवाहन डॉ.महेश जाधव व आंबोली टुरिझमकडून करण्यात आले आहे.ग्रामस्थांनी सहकार्य करावे : महेश जाधवकोरोना संक्रमित भागातून आलेल्या व्यक्तींची नोंद आंबोली आरोग्य केंद्रात केली आहे. तर अद्याप नोंद करण्याचे काम चालू असून बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तींवर होम क्वारंटाईन स्टॅम्प लावून योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. तसेच बाहेरून आलेल्या व्यक्तींनी व गावातील ग्रामस्थांनी कोरोनाबद्दल शासनाकडून देण्यात आलेली माहितीद्वारे स्वत:ची काळजी घ्यावी.

काही शंका वाटल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. साथ या परिसरात पसरू नये यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरोग्य सेवा देण्यासाठी तयार आहोत, असे आवाहन डॉ.महेश जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग