शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

corona virus in shindhudurg - दीर्घ सुटीमुळे चाकरमान्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 16:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत सुटी असल्याने कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबई, पुणे आदी भागातून व्यक्तींचे गावी येणे वाढले आहे. तर परजिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींवर शनिवारपासून आंबोली आरोग्य केंद्राकडून होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदीर्घ सुटीमुळे चाकरमान्यांची संख्या वाढलीग्रामस्थांनी सहकार्य करावे : महेश जाधव

आंबोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत सुटी असल्याने कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबई, पुणे आदी भागातून व्यक्तींचे गावी येणे वाढले आहे. तर परजिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींवर शनिवारपासून आंबोली आरोग्य केंद्राकडून होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

होम क्वारंटाईन लावलेल्या व्यक्तींनी ३१ मार्चपर्यंत घरातून बाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. महेश जाधव यांनी दिली.आंबोली, चौकुळ व गेळे परिसरातील व्यक्ती पुणे व मुंबई येथून दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ साधा ताप व सर्दीलाही तपासणीसाठी आरोग्य केंद्रात धाव घेत आहेत. मात्र, आंबोली आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी आहेत. तर आंबोली आरोग्य केंद्रांतर्गत अनेक गावे असून अद्याप प्रत्येक ठिकाणी आरोग्य कर्मचारी जनजागृती तसेच सर्व्हेला पोहोचलेले नाहीत.

आंबोलीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी येथील आरोग्य केंद्रात अनुभवी एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाहीत. तपासणीसाठी लॅबही नसल्याने अनेक गैरसोयी भविष्यात होऊ शकतात. त्यामुळे आंबोली परिसराचे महत्त्व ओळखून येथे कोरोना साथ असेपर्यंत अनुभवी व जबाबदार एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.मुंबई, पुणे व आदी परिसरातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर स्टॅम्प दिसल्यास तत्काळ आंबोली ग्रामपंचायत किंवा आरोग्य केंद्रात माहिती द्यावी. तसेच गावातील व्यक्तींशी थेट संपर्क टाळावा, असे आवाहन डॉ.महेश जाधव व आंबोली टुरिझमकडून करण्यात आले आहे.ग्रामस्थांनी सहकार्य करावे : महेश जाधवकोरोना संक्रमित भागातून आलेल्या व्यक्तींची नोंद आंबोली आरोग्य केंद्रात केली आहे. तर अद्याप नोंद करण्याचे काम चालू असून बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तींवर होम क्वारंटाईन स्टॅम्प लावून योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. तसेच बाहेरून आलेल्या व्यक्तींनी व गावातील ग्रामस्थांनी कोरोनाबद्दल शासनाकडून देण्यात आलेली माहितीद्वारे स्वत:ची काळजी घ्यावी.

काही शंका वाटल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. साथ या परिसरात पसरू नये यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरोग्य सेवा देण्यासाठी तयार आहोत, असे आवाहन डॉ.महेश जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग