शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

Lok Sabha Election 2019 प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी योजना--सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:41 IST

देशभरातील अनेक राज्यात प्रचारानिमित्त जाणे झाले. जनता नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत असे म्हणत आहे.  देशाचा विकास होत असताना कोकणचा विकास होणे आवश्यक आहे

ठळक मुद्देकणकवलीत महायुतीची प्रचारसभा; नेत्यांकडून विरोधकांचा समाचार

कणकवली : देशभरातील अनेक राज्यात प्रचारानिमित्त जाणे झाले. जनता नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत असे म्हणत आहे.  देशाचा विकास होत असताना कोकणचा विकास होणे आवश्यक आहे. कोकणात मासळीवर प्रक्रिया करणारे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यासाठी चिन, जपान, कोरीया येथील उद्योजकांना आमंत्रित केले आहे. कोकणातील प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याची योजना आम्ही आखली आहे. असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. 

शिवसेना, भाजपा, आरपीआय (आठवले गट), रासप महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा कणकवलीत गुरूवारी रात्री झाली. यावेळी प्रभू बोलत होते. सिंधुदुर्गात प्रक्रिया उद्योग नसल्याने येथील उत्पादने विदेशात निर्यात होत नाहीत. यावर आम्ही मार्ग शोधला आहे. त्यासाठी ठोस विकास आराखडा तयार केला आहे. यापुढील महिन्यात विदेशातील उद्योजक रत्नागिरी, सिंधुदुर्गात फळ आणि मासळीवर प्रक्रिया करणारे कारखाने उभारणार आहेत.

प्रक्रिया झालेली उत्पादने, बंदर आणि विमानाच्या माध्यमातून विदेशात निर्यात होतील आणि येथील प्रत्येक कुटुंबाला रोजगाराचे साधन मिळेल. लवकरच कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम पूर्णत्वास जाईल. त्यानंतर वैभववाडी-विजयदुर्ग अशी रेल्वे लाईन टाकून संपूर्ण घाटमाथा किनारपट्टीशी जोडला जाईल असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले, राणे कुटुंबाने सिंधुदुर्ग जिल्हा अशांत केला. र्सिधुदुर्गची तुलना गडचिरोली जिल्ह्याशी होवू लागली. मात्र, २0१४ च्या निवडणुकीत कोकणातील जनतेने येथील राडा संस्कृती हद्दपार केली. या संस्कृतीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे शांतता निर्माण करण्यासाठी राडा संस्कृती हद्दपार करूया.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आम्ही गेल्या पाच वर्षात राणेंच्या चौपट, पाचपट निधी आणला. त्याची तुलना राणे यांनी आणलेल्या निधीशी होवू शकत नाही. आम्ही आणलेल्या विकासनिधीमधून ते विकासकामांची उद्घाटने करत आहेत. त्यामुळे त्यांना त्याबाबत विचारणा करा. यावेळी केसरकर राणे कुटुंबावर जहरी टीका करता त्यांना पोपटाची उपमा दिली.

यावेळी प्रमोद जठार म्हणाले, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, विमानतळ, सागरी महामार्ग आदी कामे वेगाने होत आहेत. मोदी सरकारच्या दमदार कामगिरीमुळे कोकणच्या विकासाला गती मिळाली आहे.

संदेश पारकर म्हणाले, कणकवलीत खोटा आमदार आहे. प्रत्येक वेळी नवनवीन घोषणा केली जाते आणि जनतेला फसविले जाते. औषध आपल्या दारी, रिव्हर राफ्टींग, मोफत वायफाय आदी सर्व कार्यक्रम फेल गेले. तरीही आता ९00 कोटींचा कचरा प्रकल्प आणून जनतेची फसवणूक करीत आहेत.

चौकट

एलईडी फिशिंगला बसला पायबंद

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच सिंधुदुर्गातील एलईडी फिशींगला पायबंद बसला आहे.  एलईडी रोखण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मच्छिमार उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी तातडीने यंत्रणा हलविली. केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्याशी संपर्क केला. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम हे देखील मच्छिमारांच्या शिष्टमंडळासमवेत दिल्लीला गेले. त्यानंतर एलईडी फिशींगला पायबंद बसला आहे. गोव्यातील मोठे उद्योग लवकरच दोडामार्गमधील आडाळी एमआयडीसीमध्ये येणार आहेत.

राणेंवर टीका टाळली

यावेळी बोलताना शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, पुढचा पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळे कोकणचा आवाज दिल्ली दरबारी पोहोचण्यासाठी युतीच्या मागे राहणे गरजेचे आहे. असे सांगताना शासनाच्या गेल्या पाच वर्षातील कामांचा आढावा घेतला. मात्र, संपूर्ण भाषणात त्यांनी नारायण राणे किवा स्वाभिमान पक्षावर कोणतीही टीका केली नाही.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग