शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 योग्य जागी नेम धरून बाण सोडा!  -दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:14 IST

अनिष्ट वृत्तीच्या विरोधात लढण्याचा कोकणी बाणा असून लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा महायुती तो निश्चितपणे दाखवेल. 

ठळक मुद्देएका बाणात तीन लक्ष्यभेद होतील आणि सिंधुदुर्गला लागलेले ग्रहण दूर होईल, असा टोला

कणकवली : अनिष्ट वृत्तीच्या विरोधात लढण्याचा कोकणी बाणा असून लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा महायुती तो निश्चितपणे दाखवेल.  विकासाबाबतीत विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी केवळ स्वत:चा विकास करणाºया विरोधकांना जिल्ह्यातील जनता कोणत्याही परिस्थितीत साथ देणार नाही. योग्यजागी नेम धरून बाण सोडा. एका बाणात तीन लक्ष्यभेद होतील आणि सिंधुदुर्गला लागलेले ग्रहण दूर होईल, असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना लगावला.

कणकवली तालुक्यातील वागदे येथे शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप  महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित प्रचारसभेत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, महिला जिल्हाध्यक्षा निलम सावंत-पालव, वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, विधानसभा संपर्क समन्वयक सचिन सावंत, महिला तालुकाध्यक्षा प्रतीक्षा साटम, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, रुपेश आमडोसकर, नगरसेवक सुशांत नाईक, अ‍ॅड. हर्षद गावडे, उमेश घाडीगांवकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले,  खासदार विनायक राऊत यांनी स्वत:चे राजवाडे बांधले नाहीत. मात्र, जिल्ह्यातील राजकारण्यांनी मुंबईत सात मजली घरे उभारली. हा पैसा आला कुठून याचा विचार होणे आवश्यक आहे. गडचिरोलीनंतर संवेदनशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख होती. मात्र ही ओळख मागील पाच वर्षांत पुसली गेली आहे.  विकासाबाबत राणे यांनी आमच्याशी विनाकारण स्पर्धा करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.स्वाभिमानवाल्यांचा खोडसाळपणायावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसेना-भाजपा युती अभेद्य आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेना, काँग्रेस आणि त्यानंतर आता स्वत:चा पक्ष स्थापन करणाºयांना येथील जनता किंमत देणार नाही. सेना-भाजपा महायुतीत संभ्रम निर्माण करण्यासाठी स्वाभिमानवाले खोडसाळपणा करीत आहेत. भाजपा आतून स्वाभिमानसोबत असल्याच्या थापा मारून मतदारांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र सेना-भाजपा युतीत गद्दारी होणार नाही. या निवडणुकीत मतदारच राणेंना अद्दल घडवतील. अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना आणि विकास हे समीकरण जुळले आहे. शिवसेना-भाजपा युती म्हणजेच विजय असल्याने आम्हांला आता केवळ मताधिक्य वाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत.जनता धडा शिकवेलआमदार वैभव नाईक म्हणाले,  शिवसेनेच्या काळातील जिल्ह्याचा विकास पहा. मग तुम्हांला फरक समजेल. आम्ही स्वत:च्या धंद्यांच्या वाढीसाठी राजकारण केले नाही. तर शासनाचा आणि जनतेचा फायदा कसा होईल याकडेच लक्ष दिले. त्यामुळे स्वार्थी राजकारण करणाºयांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग