शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

Lok Sabha Election 2019 योग्य जागी नेम धरून बाण सोडा!  -दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:14 IST

अनिष्ट वृत्तीच्या विरोधात लढण्याचा कोकणी बाणा असून लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा महायुती तो निश्चितपणे दाखवेल. 

ठळक मुद्देएका बाणात तीन लक्ष्यभेद होतील आणि सिंधुदुर्गला लागलेले ग्रहण दूर होईल, असा टोला

कणकवली : अनिष्ट वृत्तीच्या विरोधात लढण्याचा कोकणी बाणा असून लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा महायुती तो निश्चितपणे दाखवेल.  विकासाबाबतीत विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी केवळ स्वत:चा विकास करणाºया विरोधकांना जिल्ह्यातील जनता कोणत्याही परिस्थितीत साथ देणार नाही. योग्यजागी नेम धरून बाण सोडा. एका बाणात तीन लक्ष्यभेद होतील आणि सिंधुदुर्गला लागलेले ग्रहण दूर होईल, असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना लगावला.

कणकवली तालुक्यातील वागदे येथे शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप  महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित प्रचारसभेत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, महिला जिल्हाध्यक्षा निलम सावंत-पालव, वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, विधानसभा संपर्क समन्वयक सचिन सावंत, महिला तालुकाध्यक्षा प्रतीक्षा साटम, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, रुपेश आमडोसकर, नगरसेवक सुशांत नाईक, अ‍ॅड. हर्षद गावडे, उमेश घाडीगांवकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले,  खासदार विनायक राऊत यांनी स्वत:चे राजवाडे बांधले नाहीत. मात्र, जिल्ह्यातील राजकारण्यांनी मुंबईत सात मजली घरे उभारली. हा पैसा आला कुठून याचा विचार होणे आवश्यक आहे. गडचिरोलीनंतर संवेदनशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख होती. मात्र ही ओळख मागील पाच वर्षांत पुसली गेली आहे.  विकासाबाबत राणे यांनी आमच्याशी विनाकारण स्पर्धा करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.स्वाभिमानवाल्यांचा खोडसाळपणायावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसेना-भाजपा युती अभेद्य आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेना, काँग्रेस आणि त्यानंतर आता स्वत:चा पक्ष स्थापन करणाºयांना येथील जनता किंमत देणार नाही. सेना-भाजपा महायुतीत संभ्रम निर्माण करण्यासाठी स्वाभिमानवाले खोडसाळपणा करीत आहेत. भाजपा आतून स्वाभिमानसोबत असल्याच्या थापा मारून मतदारांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र सेना-भाजपा युतीत गद्दारी होणार नाही. या निवडणुकीत मतदारच राणेंना अद्दल घडवतील. अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना आणि विकास हे समीकरण जुळले आहे. शिवसेना-भाजपा युती म्हणजेच विजय असल्याने आम्हांला आता केवळ मताधिक्य वाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत.जनता धडा शिकवेलआमदार वैभव नाईक म्हणाले,  शिवसेनेच्या काळातील जिल्ह्याचा विकास पहा. मग तुम्हांला फरक समजेल. आम्ही स्वत:च्या धंद्यांच्या वाढीसाठी राजकारण केले नाही. तर शासनाचा आणि जनतेचा फायदा कसा होईल याकडेच लक्ष दिले. त्यामुळे स्वार्थी राजकारण करणाºयांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग