शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Lok Sabha Election 2019 योग्य जागी नेम धरून बाण सोडा!  -दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:14 IST

अनिष्ट वृत्तीच्या विरोधात लढण्याचा कोकणी बाणा असून लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा महायुती तो निश्चितपणे दाखवेल. 

ठळक मुद्देएका बाणात तीन लक्ष्यभेद होतील आणि सिंधुदुर्गला लागलेले ग्रहण दूर होईल, असा टोला

कणकवली : अनिष्ट वृत्तीच्या विरोधात लढण्याचा कोकणी बाणा असून लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा महायुती तो निश्चितपणे दाखवेल.  विकासाबाबतीत विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी केवळ स्वत:चा विकास करणाºया विरोधकांना जिल्ह्यातील जनता कोणत्याही परिस्थितीत साथ देणार नाही. योग्यजागी नेम धरून बाण सोडा. एका बाणात तीन लक्ष्यभेद होतील आणि सिंधुदुर्गला लागलेले ग्रहण दूर होईल, असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना लगावला.

कणकवली तालुक्यातील वागदे येथे शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप  महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित प्रचारसभेत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, महिला जिल्हाध्यक्षा निलम सावंत-पालव, वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, विधानसभा संपर्क समन्वयक सचिन सावंत, महिला तालुकाध्यक्षा प्रतीक्षा साटम, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, रुपेश आमडोसकर, नगरसेवक सुशांत नाईक, अ‍ॅड. हर्षद गावडे, उमेश घाडीगांवकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले,  खासदार विनायक राऊत यांनी स्वत:चे राजवाडे बांधले नाहीत. मात्र, जिल्ह्यातील राजकारण्यांनी मुंबईत सात मजली घरे उभारली. हा पैसा आला कुठून याचा विचार होणे आवश्यक आहे. गडचिरोलीनंतर संवेदनशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख होती. मात्र ही ओळख मागील पाच वर्षांत पुसली गेली आहे.  विकासाबाबत राणे यांनी आमच्याशी विनाकारण स्पर्धा करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.स्वाभिमानवाल्यांचा खोडसाळपणायावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसेना-भाजपा युती अभेद्य आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेना, काँग्रेस आणि त्यानंतर आता स्वत:चा पक्ष स्थापन करणाºयांना येथील जनता किंमत देणार नाही. सेना-भाजपा महायुतीत संभ्रम निर्माण करण्यासाठी स्वाभिमानवाले खोडसाळपणा करीत आहेत. भाजपा आतून स्वाभिमानसोबत असल्याच्या थापा मारून मतदारांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र सेना-भाजपा युतीत गद्दारी होणार नाही. या निवडणुकीत मतदारच राणेंना अद्दल घडवतील. अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना आणि विकास हे समीकरण जुळले आहे. शिवसेना-भाजपा युती म्हणजेच विजय असल्याने आम्हांला आता केवळ मताधिक्य वाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत.जनता धडा शिकवेलआमदार वैभव नाईक म्हणाले,  शिवसेनेच्या काळातील जिल्ह्याचा विकास पहा. मग तुम्हांला फरक समजेल. आम्ही स्वत:च्या धंद्यांच्या वाढीसाठी राजकारण केले नाही. तर शासनाचा आणि जनतेचा फायदा कसा होईल याकडेच लक्ष दिले. त्यामुळे स्वार्थी राजकारण करणाºयांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग