शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

Lok Sabha Election 2019 योग्य जागी नेम धरून बाण सोडा!  -दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:14 IST

अनिष्ट वृत्तीच्या विरोधात लढण्याचा कोकणी बाणा असून लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा महायुती तो निश्चितपणे दाखवेल. 

ठळक मुद्देएका बाणात तीन लक्ष्यभेद होतील आणि सिंधुदुर्गला लागलेले ग्रहण दूर होईल, असा टोला

कणकवली : अनिष्ट वृत्तीच्या विरोधात लढण्याचा कोकणी बाणा असून लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा महायुती तो निश्चितपणे दाखवेल.  विकासाबाबतीत विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी केवळ स्वत:चा विकास करणाºया विरोधकांना जिल्ह्यातील जनता कोणत्याही परिस्थितीत साथ देणार नाही. योग्यजागी नेम धरून बाण सोडा. एका बाणात तीन लक्ष्यभेद होतील आणि सिंधुदुर्गला लागलेले ग्रहण दूर होईल, असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना लगावला.

कणकवली तालुक्यातील वागदे येथे शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप  महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित प्रचारसभेत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, महिला जिल्हाध्यक्षा निलम सावंत-पालव, वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, विधानसभा संपर्क समन्वयक सचिन सावंत, महिला तालुकाध्यक्षा प्रतीक्षा साटम, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, रुपेश आमडोसकर, नगरसेवक सुशांत नाईक, अ‍ॅड. हर्षद गावडे, उमेश घाडीगांवकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले,  खासदार विनायक राऊत यांनी स्वत:चे राजवाडे बांधले नाहीत. मात्र, जिल्ह्यातील राजकारण्यांनी मुंबईत सात मजली घरे उभारली. हा पैसा आला कुठून याचा विचार होणे आवश्यक आहे. गडचिरोलीनंतर संवेदनशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख होती. मात्र ही ओळख मागील पाच वर्षांत पुसली गेली आहे.  विकासाबाबत राणे यांनी आमच्याशी विनाकारण स्पर्धा करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.स्वाभिमानवाल्यांचा खोडसाळपणायावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसेना-भाजपा युती अभेद्य आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेना, काँग्रेस आणि त्यानंतर आता स्वत:चा पक्ष स्थापन करणाºयांना येथील जनता किंमत देणार नाही. सेना-भाजपा महायुतीत संभ्रम निर्माण करण्यासाठी स्वाभिमानवाले खोडसाळपणा करीत आहेत. भाजपा आतून स्वाभिमानसोबत असल्याच्या थापा मारून मतदारांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र सेना-भाजपा युतीत गद्दारी होणार नाही. या निवडणुकीत मतदारच राणेंना अद्दल घडवतील. अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना आणि विकास हे समीकरण जुळले आहे. शिवसेना-भाजपा युती म्हणजेच विजय असल्याने आम्हांला आता केवळ मताधिक्य वाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत.जनता धडा शिकवेलआमदार वैभव नाईक म्हणाले,  शिवसेनेच्या काळातील जिल्ह्याचा विकास पहा. मग तुम्हांला फरक समजेल. आम्ही स्वत:च्या धंद्यांच्या वाढीसाठी राजकारण केले नाही. तर शासनाचा आणि जनतेचा फायदा कसा होईल याकडेच लक्ष दिले. त्यामुळे स्वार्थी राजकारण करणाºयांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग