शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

Lok Sabha Election 2019 विरोधकांनी फसवणूकीचे धंदे आता सोडावेत!-प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:15 IST

कणकवली :   सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील जनतेला  शांतता हवी आहे.शिवसेना भाजपच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गतीने होत आहे. त्यामुळे विकासकामात कोणी खीळ घालू नये. विरोधकांनी भूलथापा ...

ठळक मुद्देकणकवलीत महायुतीची पत्रकार परिषद -उद्धव ठाकरे १८रोजी कणकवलीत !

कणकवली :   सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील जनतेला  शांतता हवी आहे.शिवसेना भाजपच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गतीने होत आहे. त्यामुळे विकासकामात कोणी खीळ घालू नये. विरोधकांनी भूलथापा मारून जनतेची फसवणूक करण्याचे धंदे आता तरी सोडून द्यावे. अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली . 

   कणकवली येथील विजय भवन येथे महायुतीची पत्रकार परिषद मंगळवारी झाली .यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम पालव, सचिन सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, गीतेश कडू,तेजल  लिंग्रज , तेजस राणे आदी पदाधिकारी  उपस्थित होते. 

            यावेळी प्रमोद जठार म्हणाले ,सिंधुदुर्गात गाडी जाळणारी गॅंग आहे. कणकवलीतही गाडया जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु जाळपोळीचा त्यांचा हा शेवटचा प्रयत्न  आहे. यापुढे जनता ते खपवून घेणार नाही. राणेंच्या साम्राज्याचा कचरा २००९ साली  मी निवडून आलो त्यावेळी झाला. आता त्याच कचऱ्यावर ९०० कोटींचा प्रकल्प ते उभारत आहेत.

         शिवसेना भाजप मध्ये जे मतभेद होते ते दूर झाले आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या ज्या शंका होत्या त्या आम्ही दूर केल्या आहेत. विनायक राऊत यांनी देखील  खासदार निधीवर युतीतील सर्व पक्षांचा  अधिकार  आहे अशी ग्वाही दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

              ते पुढे म्हणाले, विनायक राऊत हे गरीब कुटूंबातून खासदार पदापर्यत पोहचले आहेत. गरिबीची लाज न बाळगता मुंबईत कपबश्या विकण्याचे काम त्यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चहा विकण्याचे काम केले असल्याने या दोन्ही नेत्यांना गरिबीची जाण आहे. त्यामुळे गरिबांसाठी ते चांगले काम करतील.

       वैभव नाईक म्हणाले,  ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत महायुती झाली तशीच विधानसभा निवडणुकीतही होईल. एकजुटीने विरोधकांना चारी मुंड्या चित करण्यात येईल. जनतेचे प्रश्न सोडविण्याचा  प्रयत्न आम्ही सातत्याने करीत आहोत. त्यामुळे विरोधकांनी नुसती टीका करीत बसण्यापेक्षा विकासाबाबत बोलावे.  

उद्धव ठाकरे १८रोजी कणकवलीत !

सिंधुदुर्ग -रत्नागिरी मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार खासदर विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी  शिवसेना ,भाजपा ,रिपाई, रासप महायुतीची जाहीर प्रचार सभा १८ एप्रिल  रोजी कणकवलीत होणार आहे.  या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, शिक्षणमंत्री विनोद तावडे , उद्योगमंत्री सुभाष देसाई,  मार्गदर्शन करणार आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक , आमदार प्रसाद लाड व महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी तसेच  कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती यावेळी प्रमोद जठार यांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग