शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

Lok Sabha Election 2019 विरोधकांनी फसवणूकीचे धंदे आता सोडावेत!-प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:15 IST

कणकवली :   सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील जनतेला  शांतता हवी आहे.शिवसेना भाजपच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गतीने होत आहे. त्यामुळे विकासकामात कोणी खीळ घालू नये. विरोधकांनी भूलथापा ...

ठळक मुद्देकणकवलीत महायुतीची पत्रकार परिषद -उद्धव ठाकरे १८रोजी कणकवलीत !

कणकवली :   सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील जनतेला  शांतता हवी आहे.शिवसेना भाजपच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गतीने होत आहे. त्यामुळे विकासकामात कोणी खीळ घालू नये. विरोधकांनी भूलथापा मारून जनतेची फसवणूक करण्याचे धंदे आता तरी सोडून द्यावे. अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली . 

   कणकवली येथील विजय भवन येथे महायुतीची पत्रकार परिषद मंगळवारी झाली .यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम पालव, सचिन सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, गीतेश कडू,तेजल  लिंग्रज , तेजस राणे आदी पदाधिकारी  उपस्थित होते. 

            यावेळी प्रमोद जठार म्हणाले ,सिंधुदुर्गात गाडी जाळणारी गॅंग आहे. कणकवलीतही गाडया जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु जाळपोळीचा त्यांचा हा शेवटचा प्रयत्न  आहे. यापुढे जनता ते खपवून घेणार नाही. राणेंच्या साम्राज्याचा कचरा २००९ साली  मी निवडून आलो त्यावेळी झाला. आता त्याच कचऱ्यावर ९०० कोटींचा प्रकल्प ते उभारत आहेत.

         शिवसेना भाजप मध्ये जे मतभेद होते ते दूर झाले आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या ज्या शंका होत्या त्या आम्ही दूर केल्या आहेत. विनायक राऊत यांनी देखील  खासदार निधीवर युतीतील सर्व पक्षांचा  अधिकार  आहे अशी ग्वाही दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

              ते पुढे म्हणाले, विनायक राऊत हे गरीब कुटूंबातून खासदार पदापर्यत पोहचले आहेत. गरिबीची लाज न बाळगता मुंबईत कपबश्या विकण्याचे काम त्यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चहा विकण्याचे काम केले असल्याने या दोन्ही नेत्यांना गरिबीची जाण आहे. त्यामुळे गरिबांसाठी ते चांगले काम करतील.

       वैभव नाईक म्हणाले,  ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत महायुती झाली तशीच विधानसभा निवडणुकीतही होईल. एकजुटीने विरोधकांना चारी मुंड्या चित करण्यात येईल. जनतेचे प्रश्न सोडविण्याचा  प्रयत्न आम्ही सातत्याने करीत आहोत. त्यामुळे विरोधकांनी नुसती टीका करीत बसण्यापेक्षा विकासाबाबत बोलावे.  

उद्धव ठाकरे १८रोजी कणकवलीत !

सिंधुदुर्ग -रत्नागिरी मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार खासदर विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी  शिवसेना ,भाजपा ,रिपाई, रासप महायुतीची जाहीर प्रचार सभा १८ एप्रिल  रोजी कणकवलीत होणार आहे.  या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, शिक्षणमंत्री विनोद तावडे , उद्योगमंत्री सुभाष देसाई,  मार्गदर्शन करणार आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक , आमदार प्रसाद लाड व महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी तसेच  कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती यावेळी प्रमोद जठार यांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग