शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

Lok Sabha Election 2019    विरोधकांच्या गैरप्रचाराला  बळी पडू नका ! विनायक राऊत यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:44 IST

कणकवली :विरोधकांना लोकसभा निवडणुकीत आपला शंभर टक्के पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे शिवसेना - भाजप महायुती बाबत ते मतदारांमध्ये ...

कणकवली :विरोधकांना लोकसभा निवडणुकीत आपला शंभर टक्के पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे शिवसेना - भाजप महायुती बाबत ते मतदारांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या रक्तात बेईमानी भरलेली नाही. ते निष्ठावान कार्यकर्ते असून  विरोधकांच्या गैर प्रचाराला ते कधीही बळी पडणार नाहीत. असा ठाम विश्वास  रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला .

        कणकवली येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, राजश्री धुमाळे, जान्हवी सावंत, नीलम सावंत - पालव, शैलेश भोगले, सुशांत नाईक, संजय पडते, रमेश पावसकर, संदेश सावंत -पटेल, सुजित जाधव, गीतेश कडू ,  हर्षद गावडे, राजू राठोड, आंबडपाल सरपंच प्रणिता नाईक , धनंजय सावंत तसेच सेना - भाजपाचे नगरसेवक आदी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

        यावेळी विनायक राऊत म्हणाले, शिवसेना, भाजप व इतर पक्षांची महायुती व्हावी ही भारत मातेची इच्छा होती. त्यामुळे महायुती झाली आहे. सिंधुदुर्गचाच नव्हे तर देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर महायुतीची सत्ता पुन्हा येणे आवश्यक आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यानी एकदिलाने काम करावे आणि आपली  संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करावे. विरोधकांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने या लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत या नावाचा डमी उमेदवार उभा करण्याचे षढयंत्र रचले जात आहे. मात्र, जनता खऱ्या विनायक राऊतला चांगलीच ओळखत असल्याने काहीच फरक पडणार नाही असा टोलाही विनायक राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला .

         प्रमोद जठार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्यानाही आता उमका फुटू लागली आहे. हे महायुतीसाठी शुभ संकेत आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवाना बळी पडू नये. शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष व्हावा, त्यांच्यात मारामाऱ्या व्हाव्यात यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या डावपेचाना बळी पडू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आता राहिली नसून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी सर्वानी एकदिलाने काम करावे. शिवसेना- भाजप व इतर मित्र पक्षानी या निवडणुकीत आपल्या एकजुटीची ताकद दाखवून द्यावी .असे आवाहनही प्रमोद जठार यांनी यावेळी केले.

        भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांनीही कार्यकर्त्याना संबोधित करताना महायुतीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले.  आमदार वैभव नाईक यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना नंतर कणकवली शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

जोरदार घोषणा बाजी !

कोण आला रे कोण आला...शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना -भाजपा युतीचा..विजय असो, मोदी साहेब आगे बढो...शिवसेना तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

-फोटो ओळ-- कणकवली येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार विनायक राऊत यांनी कार्यकर्त्याना संबोधित केले. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूकsinghbhum-pcसिंघम