शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

आर्थिक मागास महामंडळातर्फे कर्ज

By admin | Updated: November 7, 2014 23:30 IST

बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदाराला पाच लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा

रत्नागिरी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदाराला पाच लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता बीज भांडवल कर्ज योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. याचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे. अर्थसहाय्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकेचा ६० टक्के सहभाग असून, अर्जदाराला ५ टक्के रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून भरावयाची आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते. या ३५ टक्के रकमेवर ४ टक्के व्याज आकारण्यात येते. बीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्षांचा असून, कर्ज वितरीत केल्यानंतर त्वरित दुसऱ्या महिन्यापासून महामंडळाच्या बीज भांडवलाची वसुली सुरु केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याचे वय १८ ते ४५ असावे. अर्जदाराचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदविलेले असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी ५५ हजार रुपये व ग्रामीण भागासाठी ४० हजार रुपयांच्या आत असावे. अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही बँकेची थकबाकीदार नसावी. त्याचे जिल्ह्यातील स्थायी वास्तव्य मागील तीन वर्षे असावे. अर्जदार कोणत्या संस्थेमार्फत विक्री करणार आहे, त्याचा तपशील देणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत बँकेचे ना देय प्रमाणपत्र, तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड व दोन वेगवेगळे जामीन देणे आवश्यक आहे. नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेप्रमाणे इतर कागदपत्र, करारपत्र, भाडेपावती, जागेबाबत पुरावा, तांत्रिक शिक्षणाचे प्रमाणपत्र, महानगरपालिका, ग्रामपंचायत परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट परवाना, डिलीव्हरी चलन आदी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)