शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

देवगड तालुक्यामध्ये तुरळक पाऊस

By admin | Updated: November 21, 2015 00:20 IST

आंबा कलमांना धोका : मोहोरावर तुडतुडे पडण्याची शक्यता; उत्पादक चिंतेत

देवगड : तालुक्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी अचानक तुरळक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे आंबा कलम मोहोरावर तुडतुडे पडण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्केच पाऊस पडल्यामुळे याचा परिणाम भातशेतीसह कलम बागायतीवर झाल्याचे सांगण्यात येते. आंबा कलमांना खत घातल्यावर योग्य प्रमाणात पाऊस लागतो. मात्र, कमी पाऊस झाल्याने खत विरघळले नसल्याने त्याचा विपरीत परिणाम आंबा कलमांवर झाला आहे.पहिल्या टप्प्यातील आंबा कलमांना मोहोर येण्यास सुरुवात होत असतानाच ढगाळ वातावरण व तुरळक प्रमाणात अचानक पाऊस पडल्याने याचा परिणाम आंबा पिकावर होऊ शकतो. सातत्याने पाऊस पडल्यास आंबा पीक धोक्यातही येऊ शकते.तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुड्यांचे प्रमाण वाढत जाते. यामुळे किटकनाशकांची फवारणी करावी लागते व औषधांचा खर्च वाढतो. अवकाळी पडलेल्या पावसामुळे बागायतदारांना असे दुष्परिणाम भोगावे लागतात. (प्रतिनिधी)