शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

शेतकऱ्यांसाठी ‘थोडी खुशी, बडा गम’

By admin | Updated: November 30, 2015 01:15 IST

भातपीक हंगाम उरकला : उन्हाळी शेतीकामांना वेग; खळ्यावरील मळणी इतिहासजमा

सुरेश बागवे -- कडावल--परिसरात खरीप भातपिकाचा यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला. पाऊस व सदृश वातावरणाने भातपिकाच्या अंतिम हंगामालाही शेतकऱ्यांसाठी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या भातपिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना ‘थोडी खुशी, बडा गम’चा अनुभव आला आहे. सध्यातरी भातकापणीचा हंगाम पूर्ण झाला असून उन्हाळी शेतीकामात शेतकरी गुंतला आहे. दरम्यान, यंदाही अनेक शेतकऱ्यांनी खळ्यावरच्या मळण्यांना ‘बगल’ दिली आहे.परिसरातील खरीप भातकापणीचे काम पूर्ण झाले आहे. भातकापणी संपल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी हा हंगाम शेतकऱ्यांसाठी विशेष सुखावह झाला नाही. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या प्रतिकूलतेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. भात लांबणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्यामुळे कामे बरेच दिवस खोळंबून राहिली. मधल्या काळात शेतीयोग्य पाऊस पडल्याने शेतकरी खुशीत होते. मात्र, नंतर भातकापणीवेळी पावसाने पुन्हा डोके वर काढले. सातत्याने काही दिवस पाऊस पडल्याने भातपिकाची मोठी हानी झाली. भाताबरोबरच सरलाही कुजून गेल्यामुळे पुढील काळात गुरांच्या वैरणीचीही चणचण भासणार आहे.निसर्गाच्या फटक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना यंदा भात बियाण्यांनीही दगा दिला. येथील शेतकऱ्यांनी यंदा सुधारित व संकरित भातबियाण्यांचा वापर पेरणीसाठी केला होता. यापैकी काही तुरळक बियाण्यांची उगवण योग्य प्रमाणात झाली नाही, तर काही संकरित बियाणी भेसळयुक्त सिद्ध झाली आहेत. पारंपरिक भाताच्या जातींसह एककाडीसारख्या काही संकरित वानांनी मात्र मदतीचा हात दिला आहे. एकंदरीत यंदाचा खरीप भात हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला. दरम्यान, पाऊस व पाऊससदृश वातावरण असूनही त्यास हुलकावणी देऊन शेतकऱ्यांनी भातकापणी पूर्ण केली आहे. आता ते उन्हाळी शेतीसंबंधीच्या नियोजनात गुंतले आहेत. खळ्यावरील मळणी इतिहासजमा पूर्वी शेतकरी भातकापणी हंगामात दिवसभरात भातकापणी, खळवटणी करून रात्री उशिरापर्यंत भाताची झोडणी करत असत. गवत वाळवण्यासारखी इतरही बरीच कामे त्यांना दिवसा करावी लागायची. दिवसभराच्या श्रमाने अंग तिंबून गेल्यानंतरही भल्या पहाटे खळ्यावर मळण्या काढल्या जात. पहिला कोंबडा आरवला की, साधारण: चार वाजता मळणीला बैल जुंपले जात. शेतकऱ्यांचा दिवस तेव्हा पहाटे चार वाजता सुरू होत असे. खांब्याभोवती मळणीचे बैल फिरू लागले की, खळ्यावर चैतन्य पसरे. काहीवेळा शेतकरी आळीपाळीने एकमेकांच्या खळ्यावर मळण्या काढत असत. यासाठी मग पाहुणचाराचे बेत आखले जात. अस्सल गावठी कोंबडीच्या फक्कड रश्श्यासह वड्यांवर आडवातिडवा हात मारला जाई. आता मात्र मळणी इतिहासजमा होऊ लागली आहे. मळणीविना खळे सुनेसुने होऊ लागले आहे.