शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

शेतकऱ्यांसाठी ‘थोडी खुशी, बडा गम’

By admin | Updated: November 30, 2015 01:15 IST

भातपीक हंगाम उरकला : उन्हाळी शेतीकामांना वेग; खळ्यावरील मळणी इतिहासजमा

सुरेश बागवे -- कडावल--परिसरात खरीप भातपिकाचा यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला. पाऊस व सदृश वातावरणाने भातपिकाच्या अंतिम हंगामालाही शेतकऱ्यांसाठी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या भातपिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना ‘थोडी खुशी, बडा गम’चा अनुभव आला आहे. सध्यातरी भातकापणीचा हंगाम पूर्ण झाला असून उन्हाळी शेतीकामात शेतकरी गुंतला आहे. दरम्यान, यंदाही अनेक शेतकऱ्यांनी खळ्यावरच्या मळण्यांना ‘बगल’ दिली आहे.परिसरातील खरीप भातकापणीचे काम पूर्ण झाले आहे. भातकापणी संपल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी हा हंगाम शेतकऱ्यांसाठी विशेष सुखावह झाला नाही. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या प्रतिकूलतेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. भात लांबणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्यामुळे कामे बरेच दिवस खोळंबून राहिली. मधल्या काळात शेतीयोग्य पाऊस पडल्याने शेतकरी खुशीत होते. मात्र, नंतर भातकापणीवेळी पावसाने पुन्हा डोके वर काढले. सातत्याने काही दिवस पाऊस पडल्याने भातपिकाची मोठी हानी झाली. भाताबरोबरच सरलाही कुजून गेल्यामुळे पुढील काळात गुरांच्या वैरणीचीही चणचण भासणार आहे.निसर्गाच्या फटक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना यंदा भात बियाण्यांनीही दगा दिला. येथील शेतकऱ्यांनी यंदा सुधारित व संकरित भातबियाण्यांचा वापर पेरणीसाठी केला होता. यापैकी काही तुरळक बियाण्यांची उगवण योग्य प्रमाणात झाली नाही, तर काही संकरित बियाणी भेसळयुक्त सिद्ध झाली आहेत. पारंपरिक भाताच्या जातींसह एककाडीसारख्या काही संकरित वानांनी मात्र मदतीचा हात दिला आहे. एकंदरीत यंदाचा खरीप भात हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला. दरम्यान, पाऊस व पाऊससदृश वातावरण असूनही त्यास हुलकावणी देऊन शेतकऱ्यांनी भातकापणी पूर्ण केली आहे. आता ते उन्हाळी शेतीसंबंधीच्या नियोजनात गुंतले आहेत. खळ्यावरील मळणी इतिहासजमा पूर्वी शेतकरी भातकापणी हंगामात दिवसभरात भातकापणी, खळवटणी करून रात्री उशिरापर्यंत भाताची झोडणी करत असत. गवत वाळवण्यासारखी इतरही बरीच कामे त्यांना दिवसा करावी लागायची. दिवसभराच्या श्रमाने अंग तिंबून गेल्यानंतरही भल्या पहाटे खळ्यावर मळण्या काढल्या जात. पहिला कोंबडा आरवला की, साधारण: चार वाजता मळणीला बैल जुंपले जात. शेतकऱ्यांचा दिवस तेव्हा पहाटे चार वाजता सुरू होत असे. खांब्याभोवती मळणीचे बैल फिरू लागले की, खळ्यावर चैतन्य पसरे. काहीवेळा शेतकरी आळीपाळीने एकमेकांच्या खळ्यावर मळण्या काढत असत. यासाठी मग पाहुणचाराचे बेत आखले जात. अस्सल गावठी कोंबडीच्या फक्कड रश्श्यासह वड्यांवर आडवातिडवा हात मारला जाई. आता मात्र मळणी इतिहासजमा होऊ लागली आहे. मळणीविना खळे सुनेसुने होऊ लागले आहे.