शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी ‘थोडी खुशी, बडा गम’

By admin | Updated: November 30, 2015 01:15 IST

भातपीक हंगाम उरकला : उन्हाळी शेतीकामांना वेग; खळ्यावरील मळणी इतिहासजमा

सुरेश बागवे -- कडावल--परिसरात खरीप भातपिकाचा यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला. पाऊस व सदृश वातावरणाने भातपिकाच्या अंतिम हंगामालाही शेतकऱ्यांसाठी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंदाच्या भातपिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना ‘थोडी खुशी, बडा गम’चा अनुभव आला आहे. सध्यातरी भातकापणीचा हंगाम पूर्ण झाला असून उन्हाळी शेतीकामात शेतकरी गुंतला आहे. दरम्यान, यंदाही अनेक शेतकऱ्यांनी खळ्यावरच्या मळण्यांना ‘बगल’ दिली आहे.परिसरातील खरीप भातकापणीचे काम पूर्ण झाले आहे. भातकापणी संपल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी हा हंगाम शेतकऱ्यांसाठी विशेष सुखावह झाला नाही. हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या प्रतिकूलतेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. भात लांबणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्यामुळे कामे बरेच दिवस खोळंबून राहिली. मधल्या काळात शेतीयोग्य पाऊस पडल्याने शेतकरी खुशीत होते. मात्र, नंतर भातकापणीवेळी पावसाने पुन्हा डोके वर काढले. सातत्याने काही दिवस पाऊस पडल्याने भातपिकाची मोठी हानी झाली. भाताबरोबरच सरलाही कुजून गेल्यामुळे पुढील काळात गुरांच्या वैरणीचीही चणचण भासणार आहे.निसर्गाच्या फटक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना यंदा भात बियाण्यांनीही दगा दिला. येथील शेतकऱ्यांनी यंदा सुधारित व संकरित भातबियाण्यांचा वापर पेरणीसाठी केला होता. यापैकी काही तुरळक बियाण्यांची उगवण योग्य प्रमाणात झाली नाही, तर काही संकरित बियाणी भेसळयुक्त सिद्ध झाली आहेत. पारंपरिक भाताच्या जातींसह एककाडीसारख्या काही संकरित वानांनी मात्र मदतीचा हात दिला आहे. एकंदरीत यंदाचा खरीप भात हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला. दरम्यान, पाऊस व पाऊससदृश वातावरण असूनही त्यास हुलकावणी देऊन शेतकऱ्यांनी भातकापणी पूर्ण केली आहे. आता ते उन्हाळी शेतीसंबंधीच्या नियोजनात गुंतले आहेत. खळ्यावरील मळणी इतिहासजमा पूर्वी शेतकरी भातकापणी हंगामात दिवसभरात भातकापणी, खळवटणी करून रात्री उशिरापर्यंत भाताची झोडणी करत असत. गवत वाळवण्यासारखी इतरही बरीच कामे त्यांना दिवसा करावी लागायची. दिवसभराच्या श्रमाने अंग तिंबून गेल्यानंतरही भल्या पहाटे खळ्यावर मळण्या काढल्या जात. पहिला कोंबडा आरवला की, साधारण: चार वाजता मळणीला बैल जुंपले जात. शेतकऱ्यांचा दिवस तेव्हा पहाटे चार वाजता सुरू होत असे. खांब्याभोवती मळणीचे बैल फिरू लागले की, खळ्यावर चैतन्य पसरे. काहीवेळा शेतकरी आळीपाळीने एकमेकांच्या खळ्यावर मळण्या काढत असत. यासाठी मग पाहुणचाराचे बेत आखले जात. अस्सल गावठी कोंबडीच्या फक्कड रश्श्यासह वड्यांवर आडवातिडवा हात मारला जाई. आता मात्र मळणी इतिहासजमा होऊ लागली आहे. मळणीविना खळे सुनेसुने होऊ लागले आहे.