शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
5
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
6
Rold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
7
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
8
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
9
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
10
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
11
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
12
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
13
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
14
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
15
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
16
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
17
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
18
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
19
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
20
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

साहित्य दिंडीच्या सागरात न्हाली सुकळवाड-तळगावनगरी

By admin | Updated: November 15, 2015 23:46 IST

कोकण मराठी साहित्य परिषद : केशवसुत कोकण साहित्य यात्रा

मालवण : ढोल-ताशाच्या गजरात लेझीमच्या तालावर शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांसह साहित्यिक आणि नागरिकांच्या उपस्थित निघालेल्या साहित्य दिंडीने मालवण वेशीवरील सुकळवाड-तळगाव गावे साहित्य सागरात न्हाऊन निघाली. खासदार विनायक राऊत यांनी तळगाव गावी केलेल्या साहित्यिकांच्या स्वागताने परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक भारावून गेले. कोकण विशाल मनाचा प्रांत असल्याचे सांगत कोकणची साहित्य श्रीमंती आम्ही साहित्यिक वाढवतो. कोकणचा आर्थिक अनुशेष खासदार राऊत यांच्यासारखे प्रामाणिक लोकसेवक भरून काढत आहेत, अशा शब्दात कर्णिक यांनी भावना व्यक्त केल्या. कोकण मराठी साहित्य परिषदेचे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई-दादर येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी साहित्य यात्रा आयोजित केल्या जात आहेत. रविवारी सकाळी कणकवली-करूळ येथे उद्घाटन करण्यात आलेली केशवसुत कोकण साहित्य यात्रा दुपारी सुकळवाड-तळगावला पोहचली. यावेळी साहित्य यात्रेचे दमदार स्वागत करण्यात आले. सुकळवाड बाजारपेठ येथून साहित्याची पदयात्रा वाजत गाजत तळगाव वेशीवर पोहोचली. गावातील श्री देव रामेश्वर मंदिरात यानिमिताने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा सत्कार खासदार विनायक राऊत यांच्यासह गावच्यावतीने करण्यात आला. यावेळी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्यासह खासदार विनायक राऊत, विश्वस्त भास्करराव शेटये, अरुण नेरुरकर, माजी आमदार शिवराम दळवी, एल. बी. पाताडे, मालवणी कवी रुजारिओ पिंटो, नमिता कीर, एम. जी. मातोंडकर, सतीश गवाणकर, अनुपम कर्णिक, सुरेंद्र दळवी, वर्षा कुडाळकर, वृंदा कांबळी, वैशाली पंडित, अरुण मर्गज, जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत, मधुसूदन नानिवडेकर, कल्पना बांदेकर, प्रसाद दळवी, राजेश रेगे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, बबन शिंदे, हरी खोबरेकर, हर्षद गावडे, नागेंद्र परब, सुकळवाड सरपंच सचिन पावसकर, तळगाव सरपंच शारदा पेडणेकर, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, विद्याधर देसाई, रुपेश राऊळ, राजू शेट्ये आदी मान्यवर व साहित्यिक उपस्थित होते. यावेळी पेंडूर हायस्कूलच्या लेझीम पथकाने विविध कला सादर केल्या. (प्रतिनिधी)साहित्य संमेलनाची सलामीयावेळी बोलताना कर्णिक म्हणाले, साहित्यातून जीवन श्रीमंत होते. अंधाराची वाटही प्रकाशाकडे घेवून जाते. कोकणच्या ज्या गावाने खासदार, आमदार, महापौर दिले या छोट्याशा तळगाव गावात साहित्य यात्रेचे झालेले भव्य स्वागत म्हणजे मुंबईतील साहित्य संमेलन यशस्वीतेची सुरुवात म्हणावी लागेल. तर खासदार राऊत म्हणाले, साहित्य दिंडी आपल्या सिंधुदुर्गातून जात आहे याचा अभिमान आहे. साहित्याची वाटचाल अशीच सुरु राहील, भावी पिढीलाही साहित्याची ओळख जवळून होण्यासाठी सुकळवाड-तळगाव येथील शालेय विद्यार्थ्यांची सहल साहित्य पंढरी मालगुड-रत्नागिरी येथे नेली जाईल, असेही त्यांनी सांगितले.