शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य दिंडीच्या सागरात न्हाली सुकळवाड-तळगावनगरी

By admin | Updated: November 15, 2015 23:46 IST

कोकण मराठी साहित्य परिषद : केशवसुत कोकण साहित्य यात्रा

मालवण : ढोल-ताशाच्या गजरात लेझीमच्या तालावर शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांसह साहित्यिक आणि नागरिकांच्या उपस्थित निघालेल्या साहित्य दिंडीने मालवण वेशीवरील सुकळवाड-तळगाव गावे साहित्य सागरात न्हाऊन निघाली. खासदार विनायक राऊत यांनी तळगाव गावी केलेल्या साहित्यिकांच्या स्वागताने परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक भारावून गेले. कोकण विशाल मनाचा प्रांत असल्याचे सांगत कोकणची साहित्य श्रीमंती आम्ही साहित्यिक वाढवतो. कोकणचा आर्थिक अनुशेष खासदार राऊत यांच्यासारखे प्रामाणिक लोकसेवक भरून काढत आहेत, अशा शब्दात कर्णिक यांनी भावना व्यक्त केल्या. कोकण मराठी साहित्य परिषदेचे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई-दादर येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी साहित्य यात्रा आयोजित केल्या जात आहेत. रविवारी सकाळी कणकवली-करूळ येथे उद्घाटन करण्यात आलेली केशवसुत कोकण साहित्य यात्रा दुपारी सुकळवाड-तळगावला पोहचली. यावेळी साहित्य यात्रेचे दमदार स्वागत करण्यात आले. सुकळवाड बाजारपेठ येथून साहित्याची पदयात्रा वाजत गाजत तळगाव वेशीवर पोहोचली. गावातील श्री देव रामेश्वर मंदिरात यानिमिताने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा सत्कार खासदार विनायक राऊत यांच्यासह गावच्यावतीने करण्यात आला. यावेळी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्यासह खासदार विनायक राऊत, विश्वस्त भास्करराव शेटये, अरुण नेरुरकर, माजी आमदार शिवराम दळवी, एल. बी. पाताडे, मालवणी कवी रुजारिओ पिंटो, नमिता कीर, एम. जी. मातोंडकर, सतीश गवाणकर, अनुपम कर्णिक, सुरेंद्र दळवी, वर्षा कुडाळकर, वृंदा कांबळी, वैशाली पंडित, अरुण मर्गज, जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत, मधुसूदन नानिवडेकर, कल्पना बांदेकर, प्रसाद दळवी, राजेश रेगे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, बबन शिंदे, हरी खोबरेकर, हर्षद गावडे, नागेंद्र परब, सुकळवाड सरपंच सचिन पावसकर, तळगाव सरपंच शारदा पेडणेकर, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, विद्याधर देसाई, रुपेश राऊळ, राजू शेट्ये आदी मान्यवर व साहित्यिक उपस्थित होते. यावेळी पेंडूर हायस्कूलच्या लेझीम पथकाने विविध कला सादर केल्या. (प्रतिनिधी)साहित्य संमेलनाची सलामीयावेळी बोलताना कर्णिक म्हणाले, साहित्यातून जीवन श्रीमंत होते. अंधाराची वाटही प्रकाशाकडे घेवून जाते. कोकणच्या ज्या गावाने खासदार, आमदार, महापौर दिले या छोट्याशा तळगाव गावात साहित्य यात्रेचे झालेले भव्य स्वागत म्हणजे मुंबईतील साहित्य संमेलन यशस्वीतेची सुरुवात म्हणावी लागेल. तर खासदार राऊत म्हणाले, साहित्य दिंडी आपल्या सिंधुदुर्गातून जात आहे याचा अभिमान आहे. साहित्याची वाटचाल अशीच सुरु राहील, भावी पिढीलाही साहित्याची ओळख जवळून होण्यासाठी सुकळवाड-तळगाव येथील शालेय विद्यार्थ्यांची सहल साहित्य पंढरी मालगुड-रत्नागिरी येथे नेली जाईल, असेही त्यांनी सांगितले.