शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धरण प्रकल्पग्रस्तांची यादी निश्चित करावी

By admin | Updated: August 7, 2014 00:17 IST

संघर्ष समितीची मागणी

सिंधुदुर्गनगरी : तिलारी प्रकल्पग्रस्तांना शासनाने ‘वनटाईम सेटलमेंट’ अंतर्गत प्रत्येकी ५ लाख रूपये देण्याचे निश्चित केले आहे. मात्र ही रक्कम देण्यापूर्वी धरण प्रकल्पग्रस्तांची यादी निश्चित करावी, अशी मागणी तिलारी धरण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे.दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणासाठी काही गावांची जागा देण्यात आली आहे. या धरणाचे पाणी गोवा तसेच महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना मिळत आहे. मात्र, येथील प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या मुलांना नोकऱ्या द्याव्यात किंवा वनटाईम सेटलमेंटअंतर्गत काही रक्कम द्यावी, अशी मागणी सुरू होती. यासाठी तिलारी धरण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने कित्येक आंदोलने करण्यात आली. मात्र, शासकीय सेवेत सर्वांनाच समाविष्ट करून घेणे गोवा तसेच महाराष्ट्र शासनाला शक्य न झाल्याने अखेर दोन्ही राज्यांच्या राज्य शासनाने अजूनही शासकीय सेवेत संधी न मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांचा हा विषय ‘वनटाईम सेटलमेंट’द्वारे मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येकी ५ लाख रूपये रोख देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.वनटाईम सेटलमेंटद्वारे प्रत्येकी ५ लाख रूपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता या प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांची सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे असलेली यादी चुकीची आहे ती यादी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकडे १११० एवढ्या प्रकल्पग्रस्तांची यादी आहे. मात्र, प्रत्यक्षात १२३६ प्रकल्पग्रस्त प्रत्यक्ष असल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. बुधवारी संघर्ष समितीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. वनटाईम सेटलमेंटअंतर्गत गोवा राज्य सरकार ७५ टक्के रक्कम आणि महाराष्ट्र राज्य सरकार २५ टक्के रक्कम देणार आहे. संबंधित प्रकल्पग्रस्तांची यादी जिल्हा प्रशासन निश्चित करून शासनाकडे पाठविल्यानंतर प्रत्यक्षात कार्यवाहीस सुरूवात होणार आहे. (प्रतिनिधी)