शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

तिलारी धरणात मुबलक पाणीसाठा

By admin | Updated: September 26, 2015 00:15 IST

प्रकल्प अधिकाऱ्यांची माहिती : कोनाळ कालव्याच्या मुख्य गेटचे दोन दरवाजे उघडले

कसई दोडामार्ग : चालू वर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने तिलारी मुख्य धरणात या वर्षी मुबलक पाणीसाठी होणार की नाही? अशी साशंकता निर्माण झाली होती. मात्र पावसाचे प्रमाण जरी क मी असले, तरी या धरणात आवश्यक पाणीसाठा झालेला आहे. १२.७० टिएमसी पाणीसाठा सद्यस्थितीत असून कोनाळ पुच्छ कालव्याच्या मुख्य गेटचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. ३१ आॅक्टोबरपर्यंत या धरणात स्थिर पाणीसाठा (१३.२० टिएमसी) होणार आहे, अशी तिलारी प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचा संयुक्त असा तिलारी प्रकल्प आहे. या तिलारी प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण झाल्यापासून या धरणात मुबलक पाणीसाठा साठविला जात आहे. या धरणातील पाणी गोवा राज्याला तसेच तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांना पुरविला जात आहे. तर याच पाण्याचा वापर कोनाळ महालक्ष्मी केंद्राला केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात या धरणात स्थीर पाणीसाठा साठवला जाऊन अतिरिक्त पाणी कोनाळ कालव्याच्या मुख्य गेटचे दरवाजे उघडे करुन तिलारी नदीत सोडले जाते. ३० जुलैपर्यंत ह्या धरणात पाणीसाठा होत असतो व ३१ जुलैला सर्व वक्रद्वारे बंद केली जात असून धरणातील अतिरिक्त पाणीसाठा ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडत असते. मात्र, यावर्षी निसर्गाच्या वातावरणात पूर्णत: बदल झाल्याने खुपच कमी प्रमाणात पाऊस कोसळला. तुरळक पडत असलेल्या पावसामुळे तिलारी धरणात पाणीसाठा होणार का? अशी एकप्रकारे या धरणातील पाण्यावर विसंबून असलेल्या गोवा व तालुक्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे धरण पाण्याने भरुन ओसंडून वाहत असे. मात्र यावर्षी सप्टेंबर महिना उजाडला तरी पावसाने काही जोर धरला नाही. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने भितीचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये पसरले होते. मात्र, गेल्या १५ तारखेपासून चार दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने धरण भरण्याची चिंता मिटली. सध्या या धरणात १२.७० टिएमसी एवढा पाणीसाठा आहे. कोनाळ पुच्छ कालव्याने मुख्य गेटच्या चार दरवाजांपैकी पहिला व चौथा वक्रद्वार ५ सेमींनी उघडे करण्यात आले असून ४.३८ घ.सें.मी. पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही दरवाजांचे मिळून ८.७४ घ.से.मी. एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच या धरणाच्या पाण्याचा वापर महालक्ष्मी विज निर्मिती केंद्राला चोवीस तास वापरावयास सुरू आहे. ३१ आॅक्टोबर अखेर या धरणातील पाणीसाठा स्थिर होईल अशी माहीती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)सुटकेचा नि:श्वासएकंदरीत यंदा धरण भरणार की नाही? मुबलक पाणी मिळणार की नाही? हे भेडसावनारे प्रश्न आता निकालात निघले असून दरवर्षी प्रमाणेच यंदाही नेहमीच्या वेळेत कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येईल, असे तिलारी प्रकल्पाच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी पुरवठ्याबाबत सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.