शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

तिलारी धरणात मुबलक पाणीसाठा

By admin | Updated: September 26, 2015 00:15 IST

प्रकल्प अधिकाऱ्यांची माहिती : कोनाळ कालव्याच्या मुख्य गेटचे दोन दरवाजे उघडले

कसई दोडामार्ग : चालू वर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने तिलारी मुख्य धरणात या वर्षी मुबलक पाणीसाठी होणार की नाही? अशी साशंकता निर्माण झाली होती. मात्र पावसाचे प्रमाण जरी क मी असले, तरी या धरणात आवश्यक पाणीसाठा झालेला आहे. १२.७० टिएमसी पाणीसाठा सद्यस्थितीत असून कोनाळ पुच्छ कालव्याच्या मुख्य गेटचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. ३१ आॅक्टोबरपर्यंत या धरणात स्थिर पाणीसाठा (१३.२० टिएमसी) होणार आहे, अशी तिलारी प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचा संयुक्त असा तिलारी प्रकल्प आहे. या तिलारी प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण झाल्यापासून या धरणात मुबलक पाणीसाठा साठविला जात आहे. या धरणातील पाणी गोवा राज्याला तसेच तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांना पुरविला जात आहे. तर याच पाण्याचा वापर कोनाळ महालक्ष्मी केंद्राला केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात या धरणात स्थीर पाणीसाठा साठवला जाऊन अतिरिक्त पाणी कोनाळ कालव्याच्या मुख्य गेटचे दरवाजे उघडे करुन तिलारी नदीत सोडले जाते. ३० जुलैपर्यंत ह्या धरणात पाणीसाठा होत असतो व ३१ जुलैला सर्व वक्रद्वारे बंद केली जात असून धरणातील अतिरिक्त पाणीसाठा ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडत असते. मात्र, यावर्षी निसर्गाच्या वातावरणात पूर्णत: बदल झाल्याने खुपच कमी प्रमाणात पाऊस कोसळला. तुरळक पडत असलेल्या पावसामुळे तिलारी धरणात पाणीसाठा होणार का? अशी एकप्रकारे या धरणातील पाण्यावर विसंबून असलेल्या गोवा व तालुक्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे धरण पाण्याने भरुन ओसंडून वाहत असे. मात्र यावर्षी सप्टेंबर महिना उजाडला तरी पावसाने काही जोर धरला नाही. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने भितीचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये पसरले होते. मात्र, गेल्या १५ तारखेपासून चार दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने धरण भरण्याची चिंता मिटली. सध्या या धरणात १२.७० टिएमसी एवढा पाणीसाठा आहे. कोनाळ पुच्छ कालव्याने मुख्य गेटच्या चार दरवाजांपैकी पहिला व चौथा वक्रद्वार ५ सेमींनी उघडे करण्यात आले असून ४.३८ घ.सें.मी. पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही दरवाजांचे मिळून ८.७४ घ.से.मी. एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच या धरणाच्या पाण्याचा वापर महालक्ष्मी विज निर्मिती केंद्राला चोवीस तास वापरावयास सुरू आहे. ३१ आॅक्टोबर अखेर या धरणातील पाणीसाठा स्थिर होईल अशी माहीती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)सुटकेचा नि:श्वासएकंदरीत यंदा धरण भरणार की नाही? मुबलक पाणी मिळणार की नाही? हे भेडसावनारे प्रश्न आता निकालात निघले असून दरवर्षी प्रमाणेच यंदाही नेहमीच्या वेळेत कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येईल, असे तिलारी प्रकल्पाच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी पुरवठ्याबाबत सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.