शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अव्वल येण्यासाठी प्रयत्न करूया

By admin | Updated: October 1, 2015 22:41 IST

संदेश सावंत : कणकवली तालुका हागणदारीमुक्त घोषित

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा येत्या दोन महिन्यात हागणदारीमुक्त करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्याचबरोबर हा जिल्हा प्लास्टिकमुक्त करतानाच सर्वच क्षेत्रात प्रगती साधून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या सांघिक प्रयत्नांतून हे यश आपण निश्चितच मिळवू शकतो, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी व्यक्त केला.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हा परिषद व कणकवली पंचायत समिती यांच्यावतीने कणकवली तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यासाठी गुरुवारी येथील भगवती मंगल कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, समाजकल्याण समिती सभापती अंकुश जाधव, शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबासाहेब वर्देकर, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, विजय चव्हाण, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, तहसीलदार समीर घारे, माहिती उपसंचालक वर्षा शेडगे, जिल्हा माहिती अधिकारी सखाराम माने, सहाय्यक माहिती अधिकारी संध्या गरवारे यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना संदेश सावंत म्हणाले, कणकवली तालुका हागणदारीमुक्त होण्याचे श्रेय सर्वजण जरी मला देत असले तरी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सरपंच, इतर सदस्य व नागरिक यांचे ते श्रेय आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अभिनंदनास ते पात्र आहेत. या यशानंतर आता आपली जबाबदारी वाढली आहे. असलेल्या त्रुटी उर्वरित काळात दूर करण्याबरोबरच तालुका कायमस्वरूपी हागणदारीमुक्त राहण्यासाठी सर्वांनी दक्ष रहायचे आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईची झळ बसू शकते. त्यासाठी आतापासूनच नियोजन करून जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधावे लागतील, असेही ते म्हणाले.रणजित देसाई म्हणाले, कोकण हा सुसंस्कृत लोकांचा प्रदेश आहे. इतर भागांच्या तुलनेत तो स्वच्छ आहे. कुडाळ तालुका येत्या आठ दिवसांत हागणदारीमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर महिनाभरात संपूर्ण जिल्हाच हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.सतीश सावंत म्हणाले, कणकवली तालुका हा विकासात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. हा तालुका हागणदारीमुक्त झाल्याने जबाबदारीतून मुक्त झाल्याचे एका बाजूने वाटत असतानाच दुसऱ्या बाजूने जबाबदारी वाढली आहे. गावातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवकांचीही आहे. कणकवली तालुक्याला दिलेले एमआरजीएस अंतर्गत कामांचे उद्दिष्ट्यही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.शेखर सिंह म्हणाले, संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा आपल्याला मंत्र दिला. त्याचे आचरण करीत येत्या दोन महिन्यात जिल्हा हागणदारीमुक्त करायचा प्रयत्न आपण करूया. प्लास्टिक मुक्तीच्या दिशेनेही आपण वाटचाल करणे आवश्यक आहे. सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, सुनिल रेडकर, चंद्रसेन मकेश्वर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक बाबासाहेब वर्देकर यांनी केले तर आभार आस्था सर्पे यांनी मानले. सूत्रसंचालन शाम सावंत यांनी केले तर आभार राजेश कदम यांनी मानले. (वार्ताहर)दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महारॅलीहागणदारीमुक्त गाव झालेल्या ग्रामपंचायतींचा तसेच या अभियानात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्वांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी स्वच्छतेचा संदेश देणारी रॅली ढोलताशांच्या गजरात कणकवली शहरातून काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातून विविध चित्ररथ सहभागी झाले होते.कणकवली तालुका लोकराज्य ग्राम झाल्याचे माहिती उपसंचालक वर्षा शेडगे यांनी या कार्यक्रमा दरम्यान बोलताना जाहिर केले. सुरुवातीला प्रा. हरिभाऊ भिसे व विलास खानोलकर आणि सहकाऱ्यांनी स्वच्छतेचा संदेश देत उपस्थितांचे कलापथकाच्या माध्यमातून प्रबोधन केले.