शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

प्रदेशाध्यक्ष बदलासाठी कोणत्याही टोकाला जाऊ

By admin | Updated: March 23, 2017 23:43 IST

नीलेश राणे यांचा इशारा : अशोक चव्हाण काँग्रेस संघटनेसाठी दुखणे

रत्नागिरी : कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण हे राज्यभरातील कॉँग्रेस संघटनेसाठी दुखणे बनले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या दोन वर्षांत जे अध्यक्ष देऊ शकले नाहीत, ते राज्यात कॉँग्रेसचे काय भले करणार? हे प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत. रत्नागिरीला जिल्हाध्यक्ष मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. आम्ही टाळे लावू शकतो, गाड्या अडवू शकतो, टिळक भवनसमोर उभे राहू शकतो, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला. कॉँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते गुरुवारी प्रथमच रत्नागिरीत आले होते. राणे यांनी यावेळी प्रदेश नेतृत्वावर खरपूस टीका केली. पदाचा राजीनामा का दिला? याची कारणे मी प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रत्नागिरीला जिल्हाध्यक्ष द्या, अशी मागणी करतो आहोत. त्यामुळे जिल्हा कार्यकारिणी, स्थानिक कमिट्या स्थापन करता येतील व पक्ष संघटना बळकट करता येईल, हे आमचे म्हणणे होते. मात्र, आधीच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर दोन वर्षे चव्हाणांना जिल्हाध्यक्षच सापडला नाही, ही कॉँग्रेससाठी मोठी शोकांतिका आहे. राज्यभरातील इतर कॉँग्रेसजनांकडूनही प्रदेशाध्यक्षांबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य वाटले नाही. म्हणूनच अशा कमिटीत राहणे अपमानास्पद वाटले. ा) राज्यभरातील इतर कॉँग्रेसजनांकडूनही प्रदेशाध्यक्षांबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे अशा नेतृत्वाखाली काम करणे योग्य वाटले नाही. म्हणूनच अशा कमिटीत राहणे अपमानास्पद वाटले. हे प्रदेशाध्यक्ष उर्वरित महाराष्ट्रात संघटनेचे काय भले करणार? असा सवालही त्यांनी केला. मी राजीनामा दिला असला तरी कॉँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. माझ्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. माझे पद महत्त्वाचे नाही. कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नसेन तर पद कशासाठी हवे, असा सवालही त्यांनी केला. यावेळी राणे म्हणाल, पक्ष हा कार्यकर्त्यांसाठी चालवावा. नेत्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी नको. जिल्ह्यात, राज्यात भाजप व सेना पुढे जात असताना कॉँग्रेस मात्र पिछाडीवर गेली आहे. कॉँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना दिशा देणारे नेतृत्वच नाही. पक्षाने मला अनेक पदे दिली आहेत. त्यामुळे कॉँग्रेस पक्षात मी काल होतो, आज आहे व पुढेही असेन. रत्नागिरीला कोणीही जिल्हाध्यक्ष द्यावा, ही मागणी घेऊन मी दोनदा प्रदेशाध्यक्षांकडे गेलो होतो. मात्र, त्यांचे म्हणणेच कळत नाही. केंद्रीय निरीक्षक मोहन प्रकाश यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची नावे पाठविली असल्याचे चव्हाण म्हणतात. मात्र, खरेच अशी नावे त्यांनी पाठविली की नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. रत्नागिरीला कोणीही जिल्हाध्यक्ष द्या. तसे दोन ओळीचे पत्र पाठवा. आम्ही तो अध्यक्ष मान्य करू. मात्र, दिलेला पदाचा राजीनामा परत घेणार नाही, असेही राणे म्हणाले. (प्रतिनिधी)..तर दुसऱ्या पक्षात वाजत गाजत जाऊमाजी मुख्यमंत्री नारायण राणे कॉँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत विचारता नीलेश राणे म्हणाले, कॉँग्रेस नेते नारायण राणे यांना बंद खोलीत निर्णय घेण्याची सवय नाही व गरजही नाही. ते याच पक्षात राहणार आहेत. याबाबत कॉँग्रेस पक्षातीलच काहीजणांकडून मुद्दाम अफवा पसरविल्या जात आहेत. आम्हाला जर दुसऱ्याच पक्षात जायचे असेल तर गुपचूप जाणार नाही, वाजत गाजत जाऊ, असेही ते म्हणाले.