शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

कोकणात रेल्वेसंख्या दुप्पट करू

By admin | Updated: April 9, 2017 23:37 IST

सुरेश प्रभू; सौंदळ रेल्वे स्थानकाचे गोव्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन

राजापूर/पणजी : मागील पंचवीस वर्षांत कोकण रेल्वेच्या अनेक समस्या कायम होत्या. त्यापैकीच एक असलेल्या सौंदळ स्थानकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरणाचे प्रश्न येत्या काही वर्षांत मार्गी लागतील. तसेच या मार्गावरून दुप्पट संख्येने रेल्वे धावतील असा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकाचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते गोवा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले, त्यानंतर ते बोलत होते. ओणीमधील श्री गजानन मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, जिल्हा परिषदअध्यक्षा स्नेहा सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, शिक्षण सभापती दीपक नागले, राजापूरचे नगराध्यक्ष हनिफ काझी, कोकण रेल्वेचे प्रबंधक बाळासाहेब निकम, सौंदळ स्थानकासाठी आजवर सातत्याने प्रयत्न करणारे चंदूभाई देशपांडे, सभापती सुभाष गुरव उपस्थित होते. बहुतांशी राजापूर तालुक्याला उपयुक्त ठरेल, असे सौंदळ स्थानक असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी उपस्थितांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधताना स्पष्ट केले.मागील २५ वर्षांत कोकण रेल्वेबाबत अपेक्षित बदल झाला नाही, त्या समस्या सोडविण्याचे काम आपण करीत असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत, ती वेळीच मार्गी लागतील, असे सांगून भविष्यात या मार्गावरील धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गोवा येथून सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या स्थानकाचे उद्घाटन केले. याबाबतचा जाहीर कार्यक्रम ओणीत पार पडला. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सौंदळसाठी प्रयत्न करणारे चंदुभाई देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. केंद्र्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते सौंदळ स्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर सौंदळ स्थानकावरील तिकीट खिडकीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत यांच्या हस्ते पार पडले. (प्रतिनिधी)दोन रेल्वेगाड्यांना थांबासौंदळ स्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी दिवा-सावंतवाडी व रत्नागिरी-मडगाव अशा दोन पॅसेंजर गाड्या थांबतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे प्रबंधक बाळासाहेब निकम यांनी दिली. त्यानुसार सायंकाळी मुंबईवरून आलेली दिवा-सावंतवाडी ही गाडी थांबताच उपस्थित सौंदळ व परिसरवासीयांनी त्या गाडीला पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.