शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात रेल्वेसंख्या दुप्पट करू

By admin | Updated: April 9, 2017 23:37 IST

सुरेश प्रभू; सौंदळ रेल्वे स्थानकाचे गोव्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन

राजापूर/पणजी : मागील पंचवीस वर्षांत कोकण रेल्वेच्या अनेक समस्या कायम होत्या. त्यापैकीच एक असलेल्या सौंदळ स्थानकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरणाचे प्रश्न येत्या काही वर्षांत मार्गी लागतील. तसेच या मार्गावरून दुप्पट संख्येने रेल्वे धावतील असा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकाचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते गोवा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले, त्यानंतर ते बोलत होते. ओणीमधील श्री गजानन मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, जिल्हा परिषदअध्यक्षा स्नेहा सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, शिक्षण सभापती दीपक नागले, राजापूरचे नगराध्यक्ष हनिफ काझी, कोकण रेल्वेचे प्रबंधक बाळासाहेब निकम, सौंदळ स्थानकासाठी आजवर सातत्याने प्रयत्न करणारे चंदूभाई देशपांडे, सभापती सुभाष गुरव उपस्थित होते. बहुतांशी राजापूर तालुक्याला उपयुक्त ठरेल, असे सौंदळ स्थानक असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी उपस्थितांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधताना स्पष्ट केले.मागील २५ वर्षांत कोकण रेल्वेबाबत अपेक्षित बदल झाला नाही, त्या समस्या सोडविण्याचे काम आपण करीत असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत, ती वेळीच मार्गी लागतील, असे सांगून भविष्यात या मार्गावरील धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गोवा येथून सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या स्थानकाचे उद्घाटन केले. याबाबतचा जाहीर कार्यक्रम ओणीत पार पडला. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सौंदळसाठी प्रयत्न करणारे चंदुभाई देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. केंद्र्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते सौंदळ स्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर सौंदळ स्थानकावरील तिकीट खिडकीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत यांच्या हस्ते पार पडले. (प्रतिनिधी)दोन रेल्वेगाड्यांना थांबासौंदळ स्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी दिवा-सावंतवाडी व रत्नागिरी-मडगाव अशा दोन पॅसेंजर गाड्या थांबतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे प्रबंधक बाळासाहेब निकम यांनी दिली. त्यानुसार सायंकाळी मुंबईवरून आलेली दिवा-सावंतवाडी ही गाडी थांबताच उपस्थित सौंदळ व परिसरवासीयांनी त्या गाडीला पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.