शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

आतातरी शहाणे होऊया!

By admin | Updated: September 20, 2014 00:22 IST

पा च वर्षांनी पुन्हा एकदा ती संधी आली आहे. सामान्य नागरिक राजा होण्याची. एरवी ज्याला पिळले जाते, छळले जाते, ज्याची सर्वाधिक फसवणूक होते, त्या सर्वसामान्य माणसाला आता खूप भाव दिला जाणार

पा च वर्षांनी पुन्हा एकदा ती संधी आली आहे. सामान्य नागरिक राजा होण्याची. एरवी ज्याला पिळले जाते, छळले जाते, ज्याची सर्वाधिक फसवणूक होते, त्या सर्वसामान्य माणसाला आता खूप भाव दिला जाणार आहे. या दिवसात सर्वचजण झुकतील, रस्त्यात थांबून बोलतील. पण हे फसवं असेल आणि ते काही दिवसांसाठीच असेल. असल्या कसल्याही वागण्याला न भुलता आपल्याला आमदार कसा हवा आहे, हे निश्चित करून मतदानाला जायला हवं. आता मतदाराने शहाणे होण्याची वेळ आली आहे. केवळ निवडणुकीपुरतं राजा होऊन पाच वर्षे सरकारला बोल लावत बसण्यापेक्षा आताच शहाणे होऊन योग्य उमेदवार निवडणं हाच चांगला पर्याय असू शकतो.वर्षानुवर्षे आपण निवडणुकीला सामोरे जातो. आपणच आपले लोकप्रतिनिधी निवडतो आणि मग पाच वर्षे त्याच लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या सरकारला शिव्याशाप देत राहतो. आपणच त्यांना निवडून दिलंय, याचा लोकांना विसर पडतो. आपण त्यांना निवडून देताना डोळे बंद करून मतदान करत नाहीत ना? मग निवडून आल्यानंतर तेच लोक वाईट कसे ठरतात? याला कारण आपणच आहोत. आपण लोकप्रतिनिधी निवडून देताना आपल्या अपेक्षा काय आहेत, याचा विचार करत नाही. त्या अपेक्षा आपल्याकडे मत मागण्यासाठी आलेल्या उमेदवाराला, त्याच्या कार्यकर्त्यासमोर मांडत नाही. त्यावर आश्वासनं मिळाली असतील तर त्या आश्वासनांचं पुढे काय झालं, हे कधी विचारत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी आश्वासनं देत राहतात आणि आपण त्यांच्यामागून आंधळेपणाने धावत राहतो. त्यामुळेच मग सरकारला शिव्या देण्याची वेळ येत राहते.खरंतर मतदार म्हणून आपण कधी गांभीर्याने विचारच करत नाही. हवा कोणाची आहे? चलती कोणाची आहे? बडेजाव कोण दाखवतंय? ओळखीचा कोण आहे? जास्त कार्यकर्ते कोणाकडे आहेत? असले कुठलेही प्रश्न विचारात घेतले जातात. पण कुठला उमेदवार सुशिक्षित आहे? कोणाकडे चांगली दृष्टी आहे? विकासाची प्रत्येक उमेदवाराची कल्पना नेमकी काय आहे? त्या उमेदवाराचे चारित्र्य कसे आहे? त्या उमेदवाराचे आर्थिक व्यवहार कसे आहेत? उमेदवाराने आपल्या भागातील कोणत्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले आहे? त्याला कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात? त्या उमेदवाराचा पक्ष कोणता आहे? त्या पक्षाची धोरणे काय आहेत? पक्षाचा जाहीरनामा काय आहे? यासारख्या प्रश्नांवर आपण कधी विचारच करत नाही. यातल्या कितीशा प्रश्नांचे आपला उमेदवाराकडे उत्तर आहे, हे आपण विचारत नाही. न झालेल्या कामांचा जाब विचारत नाही. त्यामुळेच राजकीय पक्ष सर्वसामान्य माणसाला गृहीत धरतात. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं लोक पाच वर्षे लक्षात ठेवत नाहीत, हे साऱ्याच राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना माहिती आहे. त्यामुळे कधी-कधी आधीचीच आश्वासनं ते पुन्हा सांगतात किंवा नवीन सांगतात. पण ती कधी पूर्ण होत नाहीत. बरं त्यातली पूर्ण कुठली होतात, याचा विचारही आपण करत नाही.गटारे बांधणे, पाखाडी बांधणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे ही कामे महत्त्वाची आहेत. पण पुढची काही वर्षे लोकांच्या स्मरणात राहील, असे एखादे तरी काम त्या उमेदवाराने केले आहे का? हा प्रश्न स्वत:लाच विचारून पाहायला हवा. एखाद्याने अशी दीर्घकालीन उपयोगाची कामे केली असतील तर त्याला मते मागण्यासाठी दारोदार फिरावेही लागणार नाही. लोक स्वत:हून त्याच्या पाठीशी उभे राहतील. काही काही उमेदवारांना प्रचारासाठी मतदारसंघात जायलाही लागत नाही, असंही चित्र कुठे-कुठे दिसतं. पण असं सगळीकडेच होत नाही. आपण काहीच केलं नाहीये, याची जाणीव असल्याने उमेदवार घरोघरी जायच्या तयारीतच असतात.आता उमेदवारांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरोघरी प्रचारफेऱ्या सुरू होतील. त्यांना प्रश्न विचारायला हवेत. महागाईला जबाबदार कोण आहे, ती कमी होणार की अशीच उत्तरोत्तर वाढत जाणार, याची उत्तरे त्यांच्याकडून घ्यायला हवीत. प्रचार करणं ही साधी बाब नाही. पुढची पाच वर्षे आपलं सर्वस्व याच लोकांच्या हातात आपण सोपवत असतो. एकवेळा खायची भाजी विकत घेताना आपण कितीतरी तपासून घेतो. पण पाच वर्षासाठीचा आमदार निवडताना आपण तपासणी करायची नाही?आताच्या निवडणुकीत फसव्या प्रचारात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे, तो म्हणजे व्हॉटस् अ‍ॅप. या माध्यमातून बेधडकपणे वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या जातात. पण त्या तपासून पाहायला हव्यात. एकाचवेळी हजारो लोकांपर्यंत जाणारे हे माध्यम खूपच फसवे आहे. त्यात चांगली-चांगली माणसं विशिष्ट उमेदवाराची भलावण करतात आणि अनेक सामान्य माणसं त्याला भुलतात. या माध्यमावरून पसरवले जाणारे समज-गैरसमज हा विषय तर अभ्यासाचाच आहे. व्हॉटस्अ‍ॅपवर ग्रुप करून प्रचार करण्याची मोहीम सगळीकडेच राबवली जाते. खरंतर लोकांपर्यंत कामाच्या माध्यमातून पोहोचायचं असतं. पण दीर्घकालीन उपयोगाची, माणूस जगवण्यासाठी उपयोगी पडणारी कामे सांगताच येत नाहीत. त्यामुळे मग इतर आधार घ्यावे लागतात.आपल्या भागात गेल्या पाच वर्षात कोणता उद्योग आला आहे का? लोकांचे जीवनमान उंचावण्यारे काम उमेदवाराने केले आहे का? यावर प्राधान्याने विचार करायला हवा. नकाराधिकाराचे बटण वापरणं म्हणजे आपण लोकशाहीबाबत जागे आहोत, असं म्हणणं चुकीचं आहे. यापैकी कोणीही नाही, हा मुद्दा निवडून सध्यातरी काहीच साध्य होणार नाही. नकाराधिकार वापरणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी त्याची दखल आत्तातरी घेतली जाणार नाहीये. त्यामुळे आपल्या प्रश्नांपैकी जास्तीत जास्त उत्तरे ज्या उमेदवाराकडून मिळतील, त्या उमेदवाराची निवड करणे हाच पर्याय राहतो. वासरात लंगडी गाय शोधण्याचाच प्रकार होतो, काही ठिकाणी. पण सध्यातरी त्यावर पर्याय नाही. एखादा उमेदवार लोक नाकारत असतील तर तो बदलण्याची तयारी पक्षाने करायला हवी. तसा बदल होत नसेल तर त्याबाबतचा निर्णय तुम्हीआम्हीच घ्यायचा आहे.आताची लोकसभा निवडणूक वगळली तर गेल्या काही वर्षात मतदानाचा ओघ कमी होऊ लागला आहे. मतदानाला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. हे जे काय चालले आहे, ते आपल्यासाठी नाही, त्याच्याशी आपला संबंध नाही, असं मानणारा एक मोठा बुद्धीवादी वर्ग आहे. हा वर्ग पंतप्रधानांच्या धोरणांवर गप्पा मारतो. पण प्रत्यक्षात मतदानाला जात नाही. अशांबाबतही निवडणूक आयोग आणि सरकारने अधिक कठोर भूमिका घ्यायला हवी. नाहीतर मतदानाचा वेग पुन्हा खाली यायला वेळ लागणार नाही. देशभरात अब्जावधी रूपये निवडणूक कामासाठी खर्च होतात. किमान त्यासाठी तरी मतदानाचं प्रमाण वाढला हवं. लोकसभा निवडणुकीपासून एक गोष्ट प्राधान्याने पुढे आली आहे की लोक जागे होऊन विचार करू लागले आहेत. नवी पिढी सर्व अंगांनी विचार करणारी आहे. पण नुसतं जागं होऊ चालणार नाही. जागं होण्याबरोबरच शहाणंही व्हायला लागणार आहे. नुसता विचार करून चालणार नाही. विचार करण्याबरोबरच विचारण्याचं धाडस बाळगायला हवं. लोकसभेला मतदानाची टक्केवारी थोडीफार वाढली होती. ती अजून वाढणे गरजेचे आहे. सगळंच राजकारण वाईट नाही. त्यात चांगलेही लोक आहेत. आणि जे वाईट आहेत, त्यांना बदलण्याची ताकद सर्वसामान्यांच्या मतामध्येच आहे. ही ताकद ओळखून शहाणं होऊया... किमान या निवडणुकीपासून तरी...