शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा दुचाकीधारकांसह गाईवर हल्ला

By admin | Updated: November 21, 2015 00:16 IST

ओटवणे दशक्रोशीत मुक्त संचार : ग्रामस्थांत घबराट, वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

ओटवणे : हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर ओटवणे दशक्रोशीत पहिल्यापासून आहे. पण हे प्राणी थेट घरानजीक येऊन गुरांवर, मानवी वस्तीवर हल्ले करू लागल्याने भीतीचे सावट ग्रामस्थांवर पसरले आहे. बिबट्या तसेच पट्टेरी वाघाने दिवसाढवळ्या मंगळवारी असनिये येथील दुचाकीधारकांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच नांगरतास-सरमळे येथे गुरूवारी रात्री गाईवर हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ओटवणे दशक्रोशीतील ग्रामस्थांना जीव मुठीत धरूनच वस्तीत रहावे लागत आहे. याबाबत वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. दशक्र ोशीतील बिबट्याचा वावर कायमच आहे. पण वनविभागामार्फत याबाबत काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. असनिये येथील सतीश सुधाकर सावंत या मोटारसायकल चालवित असलेल्या युवकावर पहाटे बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. त्यापूर्वी नांगरतास-सरमळे येथील अंकुश कृृष्णा महाले या शेतकऱ्याचा बैल तसेच कोनशी येथील शेतकऱ्याचा बैल व शेळ्यामेंढ्या यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. काही काळ या भागात पट्टेरी वाघ आहे की नाही, याबाबत साशंकता होती. पण दाभिल येथील वस्तीच्या भागात पंजाच्या खुणा तसेच प्रत्यक्षदर्शीनी वाघ पाहिल्यानंतर वाघाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले. या वाघामुळे बरेच प्राणी दगावल्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सरमळे, नांगरतास, भालावल, सातोळी, बावळाट, दाभिल, विलवडे, कोनशी, तांबोळी, असनिये, घारपी ही गावे तशी डोंगरपट्ट्यात जंगलमय भागात येत असल्याने पहिल्यापासून येथे हिंस्त्र प्राणी राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. शिवाय या प्राण्यांचे वारंवार येथे दर्शनही झाले आहेच पण त्याचबरोबर अनेक जंगली प्राण्यांची शिकार या हिंस्त्र प्राण्यांनी केली असल्याचे येथील शेतकऱ्यांनी पाहिले आहे. पण भक्ष्याच्या शोधात आता हे प्राणी लोकवस्तीची वाट धरू लागले आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लोकवस्ती कमी आणि विरळ घरे या भागात असल्याने हे प्राणी न घाबरता घर-वस्तीवर चाल करून येत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे डोंगरपट्ट्यांचे होणारे आधुनिकीकरण आणि बेसुमार वृक्षतोड. परप्रांतीयांच्या हातातच हे डोंगर, जंगलभाग गेल्याने प्राण्यांकडे, लोकवस्तीकडे येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आणि सद्यपरिस्थितीत तरी येथील लोक दहशतीत वावरत असून, यावर काही उपाययोजना अंमलात आणण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. वनविभागानेही याची दखल घेऊन याबाबत तत्काळ कृती आमलात आणण्याची गरज आहे.गेल्या काही वर्षांपासून वाघाकडून तसेच हिंस्र व इतर प्राण्यांकडून गुरांवर तसेच माणसांवर हल्ले केले जात आहेत. पण हे सत्र आता खूपच वाढत चालले असल्याने कुणाचा तरी जीव गेल्यानंतर शासनाला जाग येणार काय? असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. प्रशासनाकडून अशी जर टाळाटाळ होत असेल तर नाईलाजास्तव ग्रामस्थांना कायदा हाती घ्यावा लागेल, अशा संतप्त प्रतिक्रियाही येथे उमटत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेऊन याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा बिबट्या मनुष्य वस्तीत येऊन हल्ले करण्याचा धोका आहे. वनविभागाने दखल घेण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)परप्रांतियांच्या कारनाम्याचे प्रकारदशक्रोशीत वाढत जाणारा परप्रांतीय केरळीयनांचा वावरच याला मूळ कारण असून या परप्रांतीयांकडून शेती-बागायतीच्या नावाखाली डोंगरपट्ट्यातील जनावरांना इलेक्ट्रिक शॉक, इजा पोहोचविणारी हत्यारे वापरून घाबरविले जात आहे. त्यामुळे प्राणी केरळीयनांनी उजाड केलेल्या डोंगरपट्ट्यात न थांबता वस्तीकडे आक्रमण करतात. त्यामुळे या केरळीयन परप्रांतीयांचा त्वरित बंदोबस्त करावा. नंतर या हिंस्र जनावरांचा हल्ला कमी होईल.- दीपक गावडे,घारपी, शिवसेना उपशाखाप्रमुख