शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

श्रेयवाद घेणाऱ्या आमदारांनी बैठकीत अवाक्षर काढले नाही!

By admin | Updated: October 4, 2015 23:34 IST

विजय केनवडेकर : मालवणचा विकास आराखडा जनतेला अपेक्षित

मालवण : शहरात विकास आराखड्याचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्गातील विविध प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीच्या माहितीवरून शिवसेना-भाजप यांच्यात श्रेयवाद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी मालवण शहर विकास आराखडा हरकती व सूचनांत योग्य बदल करून मालवणकरांना अपेक्षित आराखडा बनवला जाईल, त्यासाठी आराखडा रद्द करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्या बैठकीत शिवसेनेच्या पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदारांनी अवाक्षरही काढले नाही. त्यांना जनतेचा पुळका असता तर त्यांनी आराखडा रद्द करण्याची जबाबदारी का घेतली नाही, असा सवाल करीत केवळ श्रेयवादासाठी जनतेची दिशाभूल करणारी माहिती देत आहेत, अशी टीका भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांनी केली आहे. मालवण शासकीय विश्रामगृह येथे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी भाजप शहर अध्यक्ष दादा वाघ, गणेश कुशे, मनोज मोंडकर, महेंद्र पराडकर, आप्पा लुडबे आदी उपस्थित होते. केनवडेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी वृत्तपत्रांना दिलेली विकास आराखड्याची माहिती विसंगत आहे. त्यामुळे माहितीबाबत जनतेत चुकीचा अर्थ गेला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मंत्री प्रभू यांना विकास आराखडा अपेक्षित असणारा करण्यात येईल, असे सांगितले आहे. पुन्हा आराखडा तयार करण्यास मोठा अवधी जाणार असल्याने तुम्ही बदल सुचवा, सुधारित आराखडा मंजूर करण्याची जबाबदारी माझी असेही मुख्यमंत्री बैठकीदरम्यान म्हणाले होते. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी शहर विकास आराखड्याबाबत अवाक्षरही काढले नाही. जनतेची भूमिका मांडणे आवश्यक होते असाही टोला केनवडेकर यांनी शिवसेनेला लगावला. (प्रतिनिधी)खासदारांची भूमिका एका ओळीची मंत्री प्रभू यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आराखड्याबाबत ३८ पानी अहवाल सादर केला. आराखड्याच्या मुद्द्यानंतर आलेल्या पर्ससीन मासेमारीबाबत मच्छिमारांना त्रास होतो, हीच केवळ खासदार विनायक राऊत यांची एका ओळीची भूमिका होती. मच्छिमारांच्या मागणीनुसार त्यांना अपेक्षित असलेला सोमवंशी अहवाल कायद्यात बसवून अमलात आणावा, केरोसीनचा प्रश्न सुटावा याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडताना अधिवेशनात याबाबत चर्चा केली जाईल. जिल्ह्यातील वनसंज्ञा प्रश्न निकाली लागेल. सीआरझेड व सीव्हीसीएतून शिथिलतेबाबत प्रभू यांच्या पुढाकाराने १५ दिवसांत पंतप्रधान, केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे, असेही सांगितल्याचे केनवडेकर यांनी स्पष्ट केले.