शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडत; पुरेसे उपजिल्हाधिकारीच नाहीत

By admin | Updated: September 7, 2016 23:53 IST

नियुक्त्या करणार कशा? : पंचायत समित्यांसाठी सात उपजिल्हाधिकारी

रत्नागिरी : २६ जिल्हा परिषदा आणि २९७ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ आॅक्टोबर रोजी पंचायत समिती निर्वाचक गणाची सोडत तहसीलदारांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. मात्र, या सोडतीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्रत्येक पंचायत समितीसाठी एक उपजिल्हाधिकारी नियुक्त करावा लागणार आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह््यात नऊ पंचायत समित्या असून, उपजिल्हाधिकारी केवळ सातच असल्याने हे नियुक्तीचे गणित जिल्हाधिकारी कसे जुळविणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि २९७ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याअंतर्गत ५ आॅक्टोबर रोजी पंचायत समिती निर्वाचक गणाची सोडत तहसीलदारांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. मात्र, या सोडतीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक पंचायत समितीसाठी एक उपजिल्हाधिकारी नियुक्त करावा, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. रत्नागिरीसाठी १३ उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु, त्यापैकी केवळ सातच उपजिल्हाधिकारी सध्या कार्यरत आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन विभाग, रोजगार हमी योजना विभाग, पुनर्वसन विभाग यांचे उपजिल्हाधिकारी तसेच खेड, राजापूर आणि दापोली येथील उपविभागीय अधिकारी अशा एकूण सात उपजिल्हाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, गेल्या काही कालावधीपासून निवडणूक विभाग, भूसंपादन विभाग, सामान्य प्रशासन, पुरवठा विभाग, रत्नागिरीचे आणि चिपळूणचे उपविभागीय अधिकारी अशी सहा पदे रिक्त आहेत. पुरवठा विभागाचे अधिकारी बिरारी यांची बदली होऊन दीड वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदकुमार जाधव सेवानिवृत्त होऊन दहा महिने झाले आहेत. मात्र, अजूनही ही पदे शासनाकडून भरण्यात आलेली नाहीत.‘रोहयो’ उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पुरवठा विभागाचा तर पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवडणूक विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.रत्नागिरीचे प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे आणि चिपळूणचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांची बदली झाल्याने सध्या राजापूरचे प्रांत सुशांत खांडेकर यांच्याकडे रत्नागिरीचा तर दापोलीचे प्रांत जयकृष्ण फड यांच्याकडे चिपळूणचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५ आॅक्टोबर रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षणाबाबतची जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठीची सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तर पंचायत समिती निर्वाचक गणाची सोडत तहसीलदारांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पंचायत समितीवर उपजिल्हाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र, सध्या जिल्ह््यात सातच उपजिल्हाधिकारी कार्यरत असल्याने जिल्हाधिकारी या नियुक्त्या कशा करणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनातील अनेक महत्वाच्या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याला आपल्या पदाबरोबरच अतिरिक्त पदाचा कार्यभार पेलावा लागत आहे. त्यामुळे जनतेच्या कामांचा खोळंबा होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. परंतु, पुरवठा विभाग तसेच निवडणूक विभाग वर्षभरापासून अधिकाऱ्यांविना असूनही शासनाला अद्यापही जाग आलेली नाही. लोकप्रतिनिधींकडूनही याबाबत गांभीर्याने पाहिले जात नाही.