शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 22:23 IST

केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देपशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभशेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यावर भर : सतीश सावंत

वैभववाडी : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून एखाद्या मोठ्या उद्योगपतीला कोट्यवधीचे कर्ज देण्यापेक्षा छोट्या छोट्या शेतकऱ्यांना शेती कर्जपुरवठा करण्यावर बँकेचा अधिक भर आहे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केले.

केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बँकेचे संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, रमेश तावडे, संभाजी रावराणे, नंदू शिंदे, प्रमोद गावडे, शरद सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुक्यातील वीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले.सावंत पुढे म्हणाले, केंद्र शासनाची पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजना प्रभावीपणे राबविणारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राज्यातील एकमेव बँक आहे. योजना शासनाची असली तरी ती शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध हेतूने पोहोचविणारी यंत्रणा सक्षम असणे आवश्यक असते. हे काम सध्या जिल्हा बँक करीत आहे. शेतकऱ्यांनी भातशेती, ऊसशेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करावेत. त्यातून आर्थिक उन्नती साधावी. या उद्देशानेच ही योजना राबविली जात आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी २ लाख व शेतीसाठी १ लाखापर्यंत कर्जाची मर्यादा आहे. ७ टक्के व्याजाने हे कर्ज दिले जाणार आहे. त्यातील ३ टक्के व्याज केंद्रशासन भरणार असून उर्वरित ४ टक्के व्याज शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. हे ४ टक्के व्याजही राज्य शासनाने भरावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सावंत यांनी सांगितले.कोरोनातही ७० टक्के परतफेड केलीकोरोनामुळे गेले चार-पाच महिने लॉकडाऊनची स्थिती आहे. तरीदेखील जिल्हा बँकेचा प्रमुख ग्राहक असलेला शेतकरी कर्जाची परतफेड करण्यात कुठेही कमी पडत नाही. यावर्षी कोरोनाचे संकट असतानाही ७० टक्के शेतकऱ्यांनी शेतीकर्जाची परतफेड केली असल्याचे सतीश सावंत यांनी स्पष्ट केले.योजनेइतकीच तिची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्षम हवी. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची तळमळ संचालक मंडळात हवी. तरच ती योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. हे काम जिल्हा बँक करीत आहे. त्यामुळे विरोधकांनी टीका करू नये, असे आवाहन बँकेचे संचालक दिगंबर पाटील यांनी केले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग