शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 22:23 IST

केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देपशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभशेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यावर भर : सतीश सावंत

वैभववाडी : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून एखाद्या मोठ्या उद्योगपतीला कोट्यवधीचे कर्ज देण्यापेक्षा छोट्या छोट्या शेतकऱ्यांना शेती कर्जपुरवठा करण्यावर बँकेचा अधिक भर आहे, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे व्यक्त केले.

केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बँकेचे संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, रमेश तावडे, संभाजी रावराणे, नंदू शिंदे, प्रमोद गावडे, शरद सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात तालुक्यातील वीसपेक्षा अधिक शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले.सावंत पुढे म्हणाले, केंद्र शासनाची पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजना प्रभावीपणे राबविणारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राज्यातील एकमेव बँक आहे. योजना शासनाची असली तरी ती शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध हेतूने पोहोचविणारी यंत्रणा सक्षम असणे आवश्यक असते. हे काम सध्या जिल्हा बँक करीत आहे. शेतकऱ्यांनी भातशेती, ऊसशेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करावेत. त्यातून आर्थिक उन्नती साधावी. या उद्देशानेच ही योजना राबविली जात आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी २ लाख व शेतीसाठी १ लाखापर्यंत कर्जाची मर्यादा आहे. ७ टक्के व्याजाने हे कर्ज दिले जाणार आहे. त्यातील ३ टक्के व्याज केंद्रशासन भरणार असून उर्वरित ४ टक्के व्याज शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. हे ४ टक्के व्याजही राज्य शासनाने भरावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सावंत यांनी सांगितले.कोरोनातही ७० टक्के परतफेड केलीकोरोनामुळे गेले चार-पाच महिने लॉकडाऊनची स्थिती आहे. तरीदेखील जिल्हा बँकेचा प्रमुख ग्राहक असलेला शेतकरी कर्जाची परतफेड करण्यात कुठेही कमी पडत नाही. यावर्षी कोरोनाचे संकट असतानाही ७० टक्के शेतकऱ्यांनी शेतीकर्जाची परतफेड केली असल्याचे सतीश सावंत यांनी स्पष्ट केले.योजनेइतकीच तिची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सक्षम हवी. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची तळमळ संचालक मंडळात हवी. तरच ती योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. हे काम जिल्हा बँक करीत आहे. त्यामुळे विरोधकांनी टीका करू नये, असे आवाहन बँकेचे संचालक दिगंबर पाटील यांनी केले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग