शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

भूसंपादनाचा तिढा बाकी, तरी चौपदरीकरणाचे भूमिपूजन?

By admin | Updated: January 15, 2016 00:18 IST

मुंबई-गोवा महामार्ग : जमीनमालक आंदोलनाच्या पवित्र्यात...

प्रकाश वराडकर-- रत्नागिरी --बहुचर्चित मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. मात्र, या चौपदरीकरणातील हरकतींचे अडथळे अद्याप दूर झालेले नाहीत. त्यामुळे केवळ भूमिपूजन करून चौपदरीकरणाचा मार्ग कसा काय मोकळा होणार, याचीच चर्चा सुरू आहे. अधिकारी स्तरावर यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जमीन मालकही आक्रमक झाले असून, आता त्यांच्या संघर्षाला राजकीय किनारही मिळाली आहे. जमीन मालकांच्या हरकतींचा निकाल लागण्याआधी व जमीनमालक आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच या हरकती, विरोधाला न जुमानता चौपदरीकरण सुरू करण्यात येणार काय, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. चौपदरीकरणात ज्यांच्या जागा, घरे, दुकाने जात आहेत, अशा शेकडो लोकांनी जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयांमध्ये हरकती नोंदविल्या आहेत. रत्नागिरीत या हरकतींवर सुनावणीही झाली आहे. त्यानंतर जमीन मालकांमध्ये अधिकच तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. चौपदरीकरणात चिपळुण, संगमेश्वर, पाली, लांजा या बाजारपेठा उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे या बाजारपेठा वाचविण्यासाठी जमीनमालक सरसावले आहेत. हा लढा लढण्यासाठी काही जमीन मालकांनी कायदेशीर तज्ज्ञांचीही मदत घेतली आहे. त्यामुळे जमीन संपादनाबाबतचा विषय गाजण्याची शक्यता आहे. एकीकडे हरकती दाखल असतानाच जमीनमालकांच्या बाजूने या लढ्यात माजी खासदार नीलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. चौपदरीकरणात जात असलेल्या जागेचा मोबदला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाप्रमाणेच मिळावा, यासाठी निलेश राणे आग्रह धरणार आहेत. त्यासाठी आंदोलनाचीही शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, त्यासाठी जमीन मालकांच्या समस्याही सोडविल्या जाव्यात, असे सध्याचे जनमत आहे.