शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उडी मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
5
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
6
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
7
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
8
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
9
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
10
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
11
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
12
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
13
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
14
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
15
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
16
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
17
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
18
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
19
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
20
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन

मीठ उत्पादक आर्थिक अडचणीत कामगारांची कमतरता

By admin | Updated: May 31, 2014 01:13 IST

शिरोडा मिठागरात १0२ मेट्रीक टन मिठाचे नुकसान

अभिजीत पणदूरकर / शिरोडा इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात सन १९३० साली झालेल्या ऐतिहासिक मीठ सत्याग्रहामुळे राष्टÑीय दर्जाचे महत्त्व प्राप्त झालेल्या मिठागरांवरील मीठ उत्पादन घेणारे मीठ उत्पादक निसर्गाचा अनियमितपणा व मिठागरांमध्ये काम करणार्‍या कामगारांची कमतरता या समस्यांमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच अवकाळी पडलेल्या पावसामुळे शिरोडा येथील १0२ मेट्रीक टन मिठाचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मीठ उत्पादन घेण्याचा हंगाम प्राथमिक स्वरुपात सुरू होतो. त्यानंतर मीठ तयार करण्यासाठी समुद्राचे खारे पाणी साठविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे चौकोनी वाफे तयार करण्यात येतात. त्या चौकोनी वाफ्यात समुद्राचे खारट पाणी साठविले जाते. या प्राथमिक तयारीसाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी जातो. त्यानंतर एक महिन्यानंतर फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष मीठ उत्पादन घेण्यास सुरुवात होते. हा हंगाम पाऊस सुरू होईपर्यंत जून महिन्यापर्यंत चालतो. मीठ तयार होण्यासाठी मिठागरातील खारट पाण्याला १६ डिग्री उष्णता मिळणे आवश्यक असून मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मात्र, अधिक उष्णता मिळाल्याने मिठागरातील पाण्याचे बाष्पीभवन लवकर होते. त्यामुळे मीठ लवकर तयार होऊन उत्पादनाचा वेग वाढतो. या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणांवर मीठ उत्पादन होत असते. मात्र, यावर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यातील मीठ उत्पादन घेतल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुख्य हंगामातील पूर्ण मे महिन्यात मीठ उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. परंतु मेच्या अखेरीस पाऊस न लागल्यास जूनच्या सुरुवातीपर्यंत मीठ उत्पादन करणे शक्य होणार आहे. १0२ मेट्रीक टन मिठाचे नुकसान मे महिन्यात पाऊस पडल्याने शिरोडा येथील मिठागरातील १०२ मेट्रिक टन मीठ उत्पादनाचे नुकसान झाले आहे. याबाबत अहवाल पाठविल्याची माहिती शिरोडा येथील मीठ इन्स्पेक्टर बी. एस. शिंदे यांनी दिली.