शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेती, बागायतींचे लाखोंचे नुकसान

By admin | Updated: July 17, 2014 23:08 IST

तेरेखोल नदीला उधाण : सिमेंट काँक्रिटची भिंत बांधण्याची मागणी

बांदा : तेरेखोल नदीच्या उधाणामुळे बांदा येथील रामनगर, मिठगुळी परिसरातील शेकडो एकर शेती बागायती नदीपात्रात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.या परिसराला दरवर्षी तेरेखोल नदीच्या उधाणाचा फटका बसतो. आतापर्यंत शेकडो एकर शेती बागायती नदीच्या पाण्यात वाहून गेली आहे. यामुळे बांदा व आरोसबाग येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी आरोसबाग येथील संजय चांदेकर यांच्या बागायतीला या उधाणाचा फटका बसला. त्यांच्या बागायतीमधील चार माड व ९ पोेफळी नदीपात्रात वाहून गेल्या. तर कित्येक गुंठे बागायतींची जमीन खचली आहे.पावसाळ्यात तेरेखोल नदीपात्र दुथडी भरुन वाहते. नदीपात्रालगत शेतकऱ्यांनी नारळ, सुपारी, आंबा, फणस, सागवान बागायती फुलविल्या आहेत. तेरेखोल नदीचे पाणी या बागायतीत घुसत असल्याने येथील जमीन पूर्णपणे खचली आहे. यावर्षी नदीच्या उधाणाचा मोठा फटका बागायतींना बसला आहे.पावसाळ्याच्या दोन महिन्यातच शेकडो एकर बागायती नदीपात्रात वाहून गेली आहे. बांदा परीसरातील रामनगर, मिठगुळी परिसरातील नारळ, सुपारींची झाडे नदीपात्रात उन्मळून पडली आहेत. बांदा व आरोसबाग येथील शेतकऱ्यांच्या बागायती याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत.तेरेखोल नदीच्या उधाणामुळे या बागायतींना नेहमीच फटका बसत असल्याने याठिकाणी खारलॅण्ड बंधारा बांधण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. तीन वर्षापूर्वी याठिकाणी तीस मिटर लांबीचा बंधारा बांधण्यात आला. याचा फायदा देखील झाला. मात्र, रामनगर, मिठगुळीपर्यंत बंधारा बांधण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. मेरीटाईम बोर्डाने दरवर्षी तीस मिटर बंधारा बांधण्याचे प्रस्तावित केले. मात्र, गतवर्षी बंधारा बांधण्यास निधी मंजूर न झाल्याने संरक्षक भिंतीचे काम रखडले. यावर्षी मोठ्या प्रमाणात जमीन खचल्याने यावर्षी विशेष बाब म्हणून संरक्षक भिंत बांधून मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.लाकडी साकवही अडचणीतआरोसबाग ग्रामस्थ दरवर्षी बांद्यात येण्यासाठी उन्हाळ्यात तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने लाकडी साकव उभारतात. मात्र, साकव उभारताना बांद्याकडील नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात जमीन नदीपात्रात कोसळल्याने यावर्षी साकव बांधणे धोकादायक बनले आहे. अजून दोन महिने पावसाळा शिल्लक असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन खचण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षी आरोसबागवासीयांना बांद्यात येण्यासाठी होडीचाच आधार घ्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)