शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पाहरा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

प्रयोगशाळा आता पाणीपुरवठ्याकड

By admin | Updated: December 29, 2014 00:02 IST

जिल्हा परिषद : अहवाल उशिरा येऊ लागल्याने आरोग्य विभागाकडील काम काढले..

रहिम दलाल - रत्नागिरी -ग्रामीण भागाच्या गावातील पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येतात़ त्याचे अहवाल आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतून उशिरा येऊ लागल्याने दूषित पाण्यावर उपाययोजना करणे कठीण झाले़ त्यामुळे आता या प्रयोगशाळा आरोग्य विभागाकडून पाणी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या आहेत़ शासनाने या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच दि़ १ जानेवारी, २०१५ पासून करण्यात येणार आहे़ राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळणाऱ्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी या प्रयोगशाळांवर करण्यात येतो़ दरवर्षी हा निधी पाणी पुरवठा विभागाकडून आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात येतो़. शासनाच्या आरोग्य विभागाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पाण्यातून विषबाधा, साथीचे आजार पसरण्याच्या घटना वाढल्याने रत्नागिरी जिल्हावगळता राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागावर टीका होऊ लागली़ दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवते़ त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील विहिरी, बोअरवेल्सच्या पाण्याची पातळी तळ गाठते़ तरीही तेथील पाणी उपसा सुरु असतोच़ तेथील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा विभागाकडे असते़ आरोग्य विभागाचे कर्मचारी ग्रामीण भागातील गावामध्ये फिरुन प्रत्येक महिन्याला पाणी नमुने गोळा करतात़ ते नमुने पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी देतात़ त्याचा अहवाल जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे आल्यानंतर दूषित पाणी नमूने आढलेल्या त्या-त्या ग्रामपंचायतींना पाणी शुध्दिकरणाच्या सूचना दिल्या जातात़ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाण्याच्या माध्यमातून साथीचे आजार पसरण्याची गेल्या वर्षभरात एकही घटना घडलेली नाही़ मात्र, राज्याच्या इतर काही जिल्ह्यांमध्ये दूषित पाण्यातून साथींचे आजार पसरण्याच्या घटना घडत असतात़ औद्योगिकीकरणामुळे नद्या, तलाव, जलस्त्रोत दूषित होण्याचे घटना वाढत आहेत़ यातील पाणी नमुने तपासणीचे काम वेळेवर करण्यात येत नसल्याने प्रदूषणाबाबत आरडाओरड सुरु असते़ जिल्ह्यात रत्नागिरीत जिल्हास्तरीय आणि ४ उपविभागीय प्रयोगशाळा अशा एकूण ५ पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आहेत़ या प्रयोगशाळांसह तेथील कर्मचारीवर्ग आणि साधनसामुग्री दि़ १ जानेवारी, २०१५ पासून एकाच छत्राखाली आणून पाणी पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत़ पाणीपुरवठा विभागाकडे या प्रयोगशाळा वर्ग झाल्याने दूषित पाण्यांचे नमुने सिध्द झाल्यानंतर त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची प्रक्रिया काही कालावधीतच पूर्ण करणे सोपे होणार आहे.तपासणी प्रयोगशाळाजिल्ह्यामध्ये आजघडीला खालीलप्रमाणे पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आहेत़ रत्नागिरी- जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, रत्नागिरी़, मंडणगड- उपविभागीय प्रयोगशाळा, ग्रामीण रुग्णालय, भिंगळोली.दापोली- उपविभागीय प्रयोगशाळाग्रामीण रुग्णालय, दापोली़, चिपळूण- उपविभागीय प्रयोगशाळाग्रामीण रुग्णालय, कामथे़,लांजा- उपविभागीय प्रयोगशाळा, ग्रामीण रुग्णालय, लांजा़ ३ टक्के निधी प्रयोगशाळांवर खर्चीराष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळणाऱ्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी या प्रयोगशाळांवर खर्च करण्यात येतो़ दरवर्षी हा निधी पाणी पुरवठा विभागाकडून आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात येतो़