शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

भाट्ये बीचवर रंगला विद्यार्थ्यांचा कुंभमेळा

By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST

चिमुकल्यांचा शिल्पाविष्कार : वाळू शिल्प अभ्यासातून विद्यार्थ्यांनी दिला मूर्तिमंत कलेचा आस्वाद

रत्नागिरी : चिमुकल्या हातानी वाळूचे छोटे छोटे ढीग तयार करणे, त्यांना विविध आकार देणे, वाऱ्याने व उन्हाने वाळू उडू नये, यासाठी पाण्याचा स्पे्र फवारणे, रांगोळीे किंवा रंग वापरून रेखाटलेल्या शिल्पाला सुशोभित करण्याचा प्रयत्न सुरू होता. मध्येच शिक्षकदेखील विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत होते. निमित्त होते अभ्यासजत्रेचे. भाट्ये बीचवर जणू विद्यार्थ्यांचा कुंभमेळाच आयोजित केला असल्याचे एकंदर गर्दीवरून दिसून येत होते.विद्यार्थ्यांना ज्ञान, रचनावादी दृष्टीकोनातून कृतीद्वारा व अनुभवाधिष्ठीत शिक्षण मिळावे, यासाठी भाट्ये येथील निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन कृतीव्दारा दालने उभारण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग प्रथमच करण्यात आला असल्याने जिल्हाभरातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी एकत्रित येऊन विविध विषयांवरील रेखाटलेली वाळू शिल्प लक्ष वेधून घेत होती.लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर आदि लोकनेते अंधश्रध्दा निर्मूलन, शिक्षणाचे महत्त्व, भारत माता, ग्रहमंडळ, मंगलयान, रत्नागिरी जिल्हा, प्रचितगड, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वच्छ भारत सुंदर भारत, व्हेल मासा, ए टू झेड वर्णमाला, झाडे लावा झाडे जगवा, पानांचे अंतरंग, व्यसनाचे दुष्परिणाम आदी विविध विषयांवर वाळूपासून सुरेख शिल्प रेखाटण्यात आली होती. दुपारचे तीव्र ऊन व वाऱ्यामुळे वाळू उडून जाऊ नये, याकरिता शिक्षक, विद्यार्थी अधूनमधून शिल्पावर पाणी फवारताना दिसत होते.याशिवाय काही विद्यार्थ्यांनी खाद्य पदार्थ, तर कुणी पुस्तक विक्री, हस्तकलेच्या विविध वस्तू विक्रीचे स्टॉल्स लावले होते. काही विद्यार्थ्यानी तर स्वत: काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडले होते. काही विद्यार्थ्यांनी तर चक्क केळी, नारळ विक्रीला ठेवली होती. सकाळपासून भाट्ये किनारा गर्दीने फुलला होता.सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवात विद्यार्थी, पालक, शिक्षक सहभागी झाले होते. आकाशात उंच पतंग उडविण्याची मजा विद्यार्थ्यांनी घेतली. भाट्ये येथे बीचवर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या अनबळÞ शिल्पाला अनेकांनी दाद दिली. या शिल्पातून सामाजिक विषमतेवर प्रकाश झोत टाकण्यात आला. क्रांतिकारकांच्या स्मृतीही जपल्या गेल्या. सांस्कृतिक ्आदानप्रदान करणारी शिल्पेही यावेळी साकारण्यात आली. या ठिकाणी परिसरातील पर्यटनप्रेमीनी भेट दिली व शिल्पकारांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)विद्यार्थी रमले शिल्पविश्वातविद्यार्थी रमले ज्ञान, रचनावादी अनुभव विश्वात.विविध वस्तूंमधून रेखाटलेल्या शिल्पानी लक्ष वेधले.नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून राज्यात प्रथमच कृतीद्वारा वाळू शिल्प.