शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोकणचं निसर्गवैभव मनोरुग्णालयाच्या भिंतींवर

By admin | Updated: April 27, 2015 00:13 IST

पर्यटन महोत्सव : तरूण कलाकारांच्या कुंचल्यात अप्रतिम कला...

रत्नागिरी : पर्यटन महोत्सवाचा प्रचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केली जात असताना शहरातील भिंतीवर पर्यटन स्थळांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. त्यामुळे शहर निश्चितच सुशोभित होणार आहेत. शहरातील अशा प्रकारच्या भिंती रंगवल्या किंवा एकापेक्षा अधिक बसेसची रंगरंगोटी केली किंवा महत्त्वाच्या जागा विकसित करून त्याठिकाणी पुतळे उभारले तर नक्कीच शहराचे रूपडे बदलण्यास मदत होईल.मे मध्ये होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. कोकणची ओळख दाखविणारे आंबे असो वा मासे यांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे किंवा कोकणचे सौंदर्य अभिव्यक्त करणाऱ्या कविता ठिकठिकाणी रंगविल्या तर नक्कीच शहरात येणाऱ्या पर्यटकांची उत्सुकता वाढेल. किंबहुना भविष्यात पर्यटकांची संख्यादेखील वाढेल.सध्या एकच शहरी बसेस रंगवण्यात आली आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या किंवा लांब पल्याच्या बसेस पैकी १० बसेस रंगवल्या तर जिल्ह्याच्या विविध ठिकाणाबरोबर अन्य जिल्ह्यातही प्रचार होण्यास मदत होईल. मात्र, याबाबत प्रशासनाने निर्णय घेणे गरजेचे आहे.त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या ठिकाणी जिल्ह्याची संस्कृती, व्यवसाय यांची ओळख होणारे पुतळे बसविले तर नक्कीच शहराची सांैदर्यवृध्दी होईल. जिल्हा प्रशासनाने स्थानिक कलाकारांच्या मदतीने मनोरूग्णालयाबाहेर असणाऱ्या भिंती रंगविण्यास प्रारंभ केला आहे. या भिंतीवर चित्रे रेखाटण्याचे काम देवरुखातील डी-कॅड तसेच सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट या संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. कोकणातील निसर्ग वैभव त्याचबरोबर संस्कृती आता रत्नागिरी शहरातील विविध भिंतींवर दिसणार असून पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन महोत्सव यशस्वी होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. (प्रतिनिधी)1भिंतीवर चित्रे रेखाटण्याचे काम देवरुखातील डी-कॅड तसेच सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. 2मे मध्ये होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. कोकणची ओळख दाखवणारे आंबे वा मासे यांची चित्रे रेखाटण्यात येत आहेत.