शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोकणच नंबर १!

By admin | Updated: May 31, 2017 04:15 IST

बारावी निकालात कोकण विभागाचा निकाल ९५.२० टक्के इतका लागला असून, मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : बारावी निकालात कोकण विभागाचा निकाल ९५.२० टक्के इतका लागला असून, मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकाल १.९१ टक्के वाढल्याची माहिती मंडळाच्या विभागीय अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील एकूण ९ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. या मंडळामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. दोन्ही जिल्ह्यांतून ३२ हजार ३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ३० हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.१८ टक्के इतके आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून २० हजार ८२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १९ हजार ६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९४.४९ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११ हजार २३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १० हजार ८३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.५१ टक्के इतका लागला आहे. १०० टक्के निकालकोकण विभागात २४३ कनिष्ठ महाविद्यालये असून, ६० कनिष्ठ महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १४८ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ३२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९५पैकी २८ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे.