शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
4
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
5
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
6
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
7
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
8
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
9
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
10
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
11
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
12
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
13
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
14
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
15
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
16
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
17
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
18
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
19
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
20
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

कोकणकन्या लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी

By admin | Published: June 07, 2014 12:41 AM

सुमित्रा महाजन

सुभाष कदम ल्ल चिपळूणचिपळुणात केवळ तिचा जन्म नव्हे तर अख्खं बालपण गेलं. आजही तिच्या बोलण्यात या मातीचा गंध येतं राहतो, त्याच चिपळूणच्या माहेरवाशिण असलेल्या सुमित्रा महाजन यांना लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याचा मान मिळालाय. चिपळूणच्या या सुकन्येने एवढंच केलं नाही, तर या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करून सलग आठवेळा निवडून येण्याचा विक्रमही रचलाय.चिपळूण तालुक्यातील शिरळसारख्या डोंगराळ, दुर्गम भागात १२ एप्रिल १९४३ रोजी जन्मलेल्या सुमित्रा महाजन या येथेच वाढल्या. चिपळूणचे प्रसिद्ध वकील आप्पासाहेब साठे यांच्या त्या कन्या. लहानपणापासूनच सुमन साठे अभ्यासात हुशार होत्या. त्यांचे वक्तृत्व उत्तम होते. उत्तम नृत्यशैली आणि नाटकाची आवड असल्याने त्या नाटकातही काम करीत असत. शालेय जीवनात बापटआळीतील कन्याशाळेत त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूलमधून त्या मॅट्रिक (म्हणजेच त्यावेळच्या अकरावी) झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. केशव हेडगेवार यांनी त्यांचे वडील अ‍ॅड. आप्पासाहेब साठे यांना राष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या शाखेचे संघचालक केले. पुढे ते कोकण विभागाचे संघचालक झाले. महाजन यांचे भाऊ अरुण साठे हे आसाममध्ये संघाचे प्रमुख प्रचारक होते. त्यांचे मेहुणे व एकता मासिकाचे पहिले संपादक रामदास कळसकर यांनी १९६५ मध्ये येथील लोकसभेची निवडणूक लढविली होती. २९ जानेवारी १९६५ रोजी अ‍ॅड. महाजन यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. महाजन हे मूळचे दापोली तालुक्यातील केळशी गावचे रहिवासी. परंतु, उद्योग व्यवसायानिमित्त ते इंदोर येथे स्थायिक झाले होते. लग्नानंतर सुमित्रा महाजन इंदोरला गेल्या. तेथील विद्यापीठात वकिली करु लागल्या. लहानपणापासूनच संघाच्या प्रवाहात वाढल्याने पुढे त्या भारतीय जनता पक्षात सक्रीय झाल्या. १९८२ ते ८५ या कालावधीत नगरसेविका, तर १९८४-८५ मध्ये त्यांनी उपमहापौरपदही भूषविले. तीन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र, १९८९ पासून सलग ८ वेळा त्या लोकसभेत निवडून आल्या. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या महाजन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या राज्यमंत्री होत्या. चिपळूणमध्ये त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. सरोज नेने, भरत भागवत यांच्यासारख्या अनेक मित्रांचा ऊर आज भरुन आला आहे. इंदोरमध्ये स्थायिक होऊनही चिपळूणजवळचा त्यांचा ओलावा कायम राहिला. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. चिपळूणच्या साहित्य संमेलनातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांचा ऋणानुबंध आज कायम असल्याने चिपळूणवासीयांचा सन्मान झाला आहे.